Skip to main content

प्रा. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली

लेखक कपिलमुनी यांनी मंगळवार, 20/05/2025 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय खगोलशास्त्र आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्र यांचे दिग्गज प्रा. जयंत नारळीकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ भारतीय विज्ञानच नाही तर जागतिक विज्ञानसमाजानेही एक महान विचारवंत, संशोधक आणि समाजसुधारक गमावला.

स्वर आले दुरूनी...विडंबन (सर आले दुरूनी)

लेखक OBAMA80 यांनी रविवार, 18/05/2025 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन सर आले दुरूनी विझल्या सगळ्या त्या सिगरेटी सर आले दुरूनी विझल्या सगळ्या त्या सिगरेटी सर आले दुरूनी निघती ठसके जोराचे तशात घाबरल्या पोरांचे कुजबुजही थांबली पोरींची पाचावर बसली सगळ्यांची ऐशा रमलेल्या त्या स्थानी.. बोचती सरांचे ते कटाक्ष संपले, गालावर हासू मावळले होता हृदयाची दो शकले बोटातुन सिगरेट ओघळले घाली फुंकर हलकेच कुणी.. सर आले दुरूनी सर आले दुरूनी अवसान पायीचे मग(पूर्ण) गळे प्रतिसाद कसा द्यावा न कळे विचारांनी पुन्हा मग (सारे) घाबरले शोधूया चुगली का केली कुणी .. सर आले दुरूनी विझल्या सगळ्या त्या सिगरेटी सर आले दुरूनी विझल्या सगळ्या त्या सिगरेटी सर आले दुरूनी
काव्यरस

कामधेनु : गोमय वसते लक्ष्मी

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 17/05/2025 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
गाय ही कामधेनु आहे. गायीची उत्तम रीतीने सेवा केली तर गाय आपल्या सेवकाला अन्न, वस्त्र, निवारा प्रदान करते. आपल्या धार्मिक ग्रंथात गायीच्या शरीरात 33 कोटी देवता राहतात असे म्हंटले आहे. कथा आहे, जेंव्हा लक्ष्मी मातेने गायींना विचारले, मी तुमच्या शरीरात कुठे निवास करू, तेंव्हा गायी म्हणल्या माता लक्ष्मी तुम्ही आमच्या पवित्र गोमय अर्थात गायीच्या शेणात आणि गोमूत्रात निवास करा. आपल्या देशात गौ आधारित अर्थव्यवस्था होती. आपल्या संस्कृतीत गौ दान करण्याची परंपरा होती. ऑपरेशन फ्लड काळात लाखो शेतकर्यांना सरकारने गायी प्रदान केल्या.

तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत (ऐसी अक्षरे -२५)

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 15/05/2025 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
अतत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत हे संशोधक डॉ .बी. आर जोशी अगदीच छोटेखानी पुस्तक वाचले. भारतीय तत्त्वज्ञान परंपरांपैकी एकाही तत्त्व‌ज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी जन्म पुरेसा नाही, हे पुन्हा पटले.

वायुसेनेतील आठवणी – भाग २ कॉपल पांडे गायब झाला होता!

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 15/05/2025 02:14 या दिवशी प्रकाशित केले.

वायुसेनेतील आठवणी – भाग २ कॉपल जी.एस. पांडे

कॉपल पांडे गायब झाला होता!

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पोचल्यावर मी लगेच शोध घेतला की पांडेचं काय झालं? स्टाफने सांगितलं, "सर, काल खूप गोंधळ झाला. एक कॉर्पोरल विमानात चोरून बसायचा प्रयत्न करत होता, त्याला एअर फोर्स पोलिसांनी पकडलं. त्याला खाली उतरवलं आणि विमान १५ मिनिटं लेट झालं. नाव माहित नाही, पण तो कदाचित गार्डरूममध्ये असेल." आवाज ताठ आणि रूक्ष होता. गार्डरूमचे वॉरंट ऑफिसर जेव्हा माझ्या स्टाफने संपर्क केला, तेव्हा त्याने सांगितलं, "आत्ता ड्युटी घेतली आहे. लवकरच कळवतो." पांडे कुठे आहे याचा काहीच पत्ता लागत नव्हता.

भारताची स्क्रॅमजेट तंत्रज्ञानातील यशस्वी वाटचाल

लेखक कपिलमुनी यांनी बुधवार, 14/05/2025 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
भारताची स्क्रॅमजेट तंत्रज्ञानातील यशस्वी वाटचाल: DRDO ची मोठी कामगिरी स्क्रॅमजेट (Supersonic Combustion Ramjet) तंत्रज्ञान हे एक क्रांतिकारी पाऊल आहे, जे वाहनांना हायपरसोनिक वेगाने—म्हणजे मॅक 5 पेक्षा जास्त (6,100 किमी/तास) प्रवास करण्यास सक्षम करते. भारताच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे, ज्यामुळे भारताला हायपरसोनिक तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये स्थान मिळाले आहे.या लेखामध्ये DRDO च्या स्क्रॅमजेट यशाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे , या प्रयोगाच्या यशाचा भारतीय सैन्याच्या भविष्यावर होणारा

भुलेश्वर मंदिर सौंदर्य

लेखक Bhakti यांनी बुधवार, 14/05/2025 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
१ भुलेश्वर मंदिर हे मंगलगड किंवा दौलतमंगल किल्ला नावाच्या डोंगरी किल्ल्यावर(पुणे जिल्हा) वसलेले आहे. १३ व्या शतकात यादव राजवंशातील राजा कृष्णदेवराय यांनी या मंदिराची पुनर्बाधणी केली. नंतर मराठ्यांनी त्यांच्या राजवटीत त्याची भर घातली. भुलेश्वर मंदिर खूप वेळा नष्ट आणि पुनर्बाधणी करण्यात आले आहे.

आव्वाज आव्वाज..

लेखक आजी यांनी मंगळवार, 13/05/2025 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या सोसायटीत सगळे बंगलेच आहेत. आपापली घरं फक्त कामवाल्यांसाठी उघडून आणि त्या कामं करून गेल्यावर ती पुन्हा बंद करून सगळ्या गृहिणी टीव्हीवर, आणि आताशा ओटीटीवर सिनेमे किंवा हिंदी भाषेतल्या कौटुंबिक मालिका बघत बसतात. पण त्या अधुनमधून बंगल्याबाहेरही पडतात. भिशी,किटी पार्टी, हळदीकुंकू,बारशी, वाढदिवस,भजन, सत्यनारायणाची पूजा, इत्यादी त्या थाटामाटात आणि एकत्र येऊन साजरे करतात. यात थोडा बदल म्हणून मी त्यांना घरपोच लायब्ररी चालू करणे, रीडर्स क्लब, साहित्य कट्टा, चांगल्या वक्त्यांची भाषणे, चांगल्या गायकांच्या गाण्याचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम सुचवून पाहिले पण त्याला शून्य प्रतिसाद मिळाला.

मोदींचे भाषण आणि त्यावर घेतलेले बालीश आक्षेप

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 13/05/2025 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
मोदींचे भाषण आणि त्यावर घेतलेले बालीश आक्षेप https://youtu.be/oq35bx7ktEM?si=SHdxD8Kmglr2iXD5 माझी उत्तरे प्रश्न १ - समझौत्याची घोषणा भारत आणि पाक यांच्या ऐवजी त्रयस्थ पक्षाने करणे केव्हाही हितावह. जो पक्ष समझौत्याची भाषा करतो तो कमकुवत मानला जाऊ शकतो. भारताने अशी घोषणा केली असती तर पाकला आयते कोलीत मिळाले असते. प्रश्न २ भारताच्या परराष्ट्र नीतीची कोणतीही अडचण झाली असे मला वाटत नाही. कोणत्याही युद्धात सन्मान्य माघार विजया इतकीच महत्त्वाची असते.