Skip to main content

प्ले लिस्ट

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 31/05/2020 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
दररोज भेटणारी माणसं आणि प्ले लिस्टमधली गाणी यांच्यात मला कमालीचं साम्य वाटतं. नव्या माणसाला भेटण्याचा अनुभव एखादं नवं गाणं ऐकण्यासारखाच असतो की. कधी ते माणूस/गाणं इतकं भावतं की आपल्या प्ले लिस्ट मध्ये त्यांच एक हक्काचं स्थान तयार होतं. काही गाणी मात्र आपण आयुष्यात एकदाच ऐकतो आणि काही व्यक्तींशी आपला संबंध येतो तो ही आयुष्यात एकदाच. ती गाणी ऐकण्याची किंवा त्या व्यक्तीला भेटण्याची परत इच्छा होत नाही. याचा अर्थ त्या गाण्यात/माणसात काही कमी होतं असा मुळीच नाही. फारफारतर त्यांची आणि आपली 'ट्युनिंग' जमली नाही इतकंच.

नक्की प्रॉब्लम काये ?

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 31/05/2020 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
एकतर २/४ जण सोडले तर इथे कुणाशी व्यक्तिगत ओळख नाही. त्यात फक्त २ जण मला प्रत्यक्ष भेटलेत. त्यात एक माझा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि दुसर्‍याशी आंतरजालीय ओळख आहे. सांगायचं कारण असं की फोकस कायम लेखनावर आहे. कुणाशीही व्यक्तिगत मित्रत्व किंवा शत्रुत्व नाही. ____________________________________________ १. देवभोळे लोक : जगातले ९०% लोक देवभोळे आहेत. संकेतस्थळ हा त्याच समाजाचा फोरम आहे. देव ही मानवी कल्पना आहे आणि मेंदूपलिकडे त्याला काही अस्तित्व नाही. अस्तित्व रहस्यमय आहे पण ते स्वयंभू आहे. थोडक्यात ते चालवणारा असा कुणी नाही. देव ही कल्पना आहे म्हटल्यावर हे ९०% लोक खवळतात.

धग

लेखक रातराणी यांनी रविवार, 31/05/2020 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
" संपूर्ण मानवजातीसमोर न भूतो न भविष्यती असे संकट उभे ठाकले असताना आपल्या देशातील सरकार आपल्याच देशबांधवांबाबत इतके निष्काळजी कसे असू शकते? फक्त ते गरीब आहेत म्हणून? त्यांच्या राहण्याचा तसाही काही ठावठिकाणा नव्हताच मग आता तरी त्यांची चिंता कशाला करा? की मग जातायत तर जाईनात का...उद्या त्यांच्या ओस पडलेल्या वस्त्यांवर टोलेजंग इमारती बांधून आपले तळवे चाटणाऱ्या अधिकारी, मंत्र्यांच्या पुढच्या पिढीची सोय करायची आहे? मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे असं आम्हाला लहानपणापासून शिकवण्यात आलं. मग आजचे राजकारणी नक्कीच मनुष्य नाहीत. एक सत्ता सोडली तर इतर काहीही त्यांना प्रिय नाही.

खासियत खेळियाची - श्रीमंत थोरले वॉ साहेब

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 30/05/2020 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
बॅलन्स - समतोल - संतुलन - ईक्विलिब्रियम हा सृष्टीचा नियम आहे. एकीकडे झीज झाली की दुसरीकडे भर पडतच असते, कुठे थंडी पडली तर अजून कुठे उष्णतेची लाट आलेली असते. इतकंच काय एखाद्या घरी आज जेवणात मीठ कमी पडलं तर कुणाकडे जेवण खारट झालेलंच असतं. आज जरी कंटाळ्यातून असं गूढ गहन बोलत असलो तरी ह्या फिलोसॉफीचा शोध मला काही वर्षापूर्वीच लागला होता. "धूम ३" बघत होतो आणि एकदम न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडावं तसा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. "राम और श्याम"घ्या "सीता और गीता", "चालबाज", "अप्पू राजा", "कमीने", "किशन कन्हैय्या" अगदी "शर्मिली" सुद्धा.

"सद्गुरू"वाचोनी सापडली सोय

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 30/05/2020 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणीचा काळ सुखाचा असे जरि कुणी म्हणती काळ-काम-वेगाच्या गणिते तेव्हा छळिले किती ! मात्र अता "सद्गुरू" म्हणती की "काळ असे हो भास" ऐकुनी अमृतवाणी, सोडिला सुटकेचा निश्वास झंझट "काळा"चे गेले की "काम-वेग" मग उरे गणित गहन त्याचे सोडविण्या अहोरात्र मी झुरे काम-वेग गणिताची चर्चा कशी सदगुरूपाशी? (अध्यात्माच्या शिखरावर ते! का भ्रष्टावे त्यांसी?) अध्यात्मातील पेच नवा हा रोज अम्हाला छळतो रजनीशांचे ग्रंथ उशाशी घेऊनी सध्या निजतो!

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ४ - फ्रेशर्स की बकरे.

लेखक श्रीकांतहरणे यांनी शनिवार, 30/05/2020 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी, मनिष अन राहुल्या, अकोल्यातल्या, तापडीयानगरच्या भाड्याच्या घरात राहाले आलो. घरमालकान, दोन टोलेजंग लोखंडी पलंग दिले होते, म्हणजे, मले आता, ढाराढूर लोळाले, ऐसपैस जागा भेटली होती. एक थंडगार पाण्याच मडक, बाकी आमच्या ब्यागा ठेवाले लय जागा होती. फक्त प्रॉब्लेम एकच, अन तोई लय डेंजर. आंघोळ कराले, घरमालकाच्या घरात मागच्या दरवाजातून आत बाथरूमध्ये जायच होत. आला ना इज्जतीचा सवाल? मंग काय, अंघोळीले पण पुरा ड्रेस घालून, चोरावाणी घुसाचं, अन चोरावाणीच बाहेर पडाच. एव्हडं फुल ड्रेसिंग करून, त आम्ही कॉलेजाले पण जात नोतो.