wacom cinteq pro 13 ड्रॉइंग टॅब
माझ्या मुलीने wacom cinteq pro 13 हा ड्रॉंईंग टॅब तिच्या मैत्रिणीकडून ५० हजाराला विकत घेतला. मैत्रिणीकडे तो मॅक वर चालू होता असे तिने सांगितले. मुलगी पंजाबमधे होती. मी तो आणून दिलेला टॅब तसाच पॅक मधे असल्याने जसाच्या तसा पाठवला. मला त्यातील तांत्रिक ज्ञान नसल्याने मी चेक केला नाही. मुलीकडे डेल चा विंडोज चा लॅपटॉप आहे. त्यावर विंडोज १० आहे. तिला वाटले हा जोडला कि लगेच चालू होईल. पण तसे झाले नाही. नेटवरुन माहिती घेतल्यावर त्याप्रमाणे इन्स्टॉलेशन केले. पण डिस्प्ले कॉंपिटिबिलिटी इश्यु येत आहे. ड्रायव्हरही अपडेट केलेत. पण कॉंपेटॅबिलिटी इश्यू येत आहे.
लंगडा (गूढकथा)
लंगडा (गूढकथा)
त्याने पुन्हा एकदा आवाज दिल्यावर मात्र, माझा नाईलाज झाला. मी जागेवर थांबलो. तो दुडक्या चालीत माझ्याकडे येत होता. तो डाव्या पायाने लंगडा असावा. आपला डावा हात गुढग्याच्या थोडा वर टेकवून, तो माझ्या दिशेने येऊ लागला. मला नवल वाटले. कोण पाठीमागून आवाज देतोय, म्हणून मी वैतागलो होतो. पण आता ही त्याची लंगडी स्थिती पाहून, मला उगीच थोडासा खेद वाटून गेला. याच्याशी नारमाईने वागायला हवे, असे उगीचच वाटून गेले. आमच्यातले ते वीस पंचवीस मीटरचे अंतर कापायलही, त्याला बराच वेळ लागला. तो माझ्याजवळ आला. माझ्याकडे बघून त्याच्या चेहऱ्यावर काहीसे समाधान उमटून गेले.
आपल्या सुंदर बिनडोक पणाचे रहस्य काय?
लहानपणी, मराठीतला एक सिनेमा, वारंवार बघण्यात आला आणि तो म्हणजे, "सामना"
चित्रपटाचे आकलन फार उशीरा झाले. पण डायलाॅग मात्र कायमचे लक्षांत राहिले.
शिक्षण नावाचा टाईमपास करत असतांना, हे डायलाॅग, खूप लोकांना ऐकवले ....
स्वतःला सर्वज्ञ समजणारा माणूस, तोंडघशी पडला की, खालील डायलाॅग ऐकवायचा ...
"गर्व ही सुद्धा एक प्रकारची वस्तुस्थिति आहे."
बेकार असतांना, कुणी विचारले की सध्या काय करतोस? तर खालील डायलाॅग ऐकवायचा ....
गुरुवार गुंज आणि गुरू
गुरुवार गुंज आणि गुरु.
वीज नव्हती, टिव्ही नव्हते ,त्या काळात गावात रात्री लवकरच शांतता होई.संध्याकाळी कामावरून घरी परतलेले लोक थकलेले असत.दिवे लागण झाली की थोड्याच वेळात जेवणखाणे आटोपून बहुतेक जण झोपी जात.रात्री आठ साडेआठचे सुमारास सगळीकडे चिडीचूप.कुठे पोथी,भजन वगैरे सुरू असे ते आणि दर गुरुवारी रात्री देशमुख गल्लीत 'दत्त पंचपदी 'होई,तेवढेच अपवाद.तिथे मात्र उशीरा पर्यंत जाग असे. ज्या घरी पंचपदी असे ते घर गॅसबत्तीने उजळून निघे. जेवणे आटोपून लोक रात्री आठचे दरम्यान पंचपदी साठी जमा होत. बैठकीत चौरंगावर दत्ताची तसबीर मांडून पुजा केली जाई.
आपल्या पैकी कुणाला, थेट शेतकरी वर्गा कडून, शेतमाल खरेदी करायची इच्छा आहे?
https://misalpav.com/node/47970
ह्या विषयावरील चर्चा वाचली. एक जाणवले की, सगळ्यांनाच, शेतकरी वर्गाला, मनापासून मदत करायची इच्छा आहे.
माझ्या ओळखीत, काही शेतकरी आहेत, जे स्वतः काही गोष्टी पिकवतात किंवा Process करून विकतात.
काही लोकांना मी वैयक्तिक रित्या ओळखतो, काहींना, What's App मुळे ओळखतो.
मी जसे जमेल तसे, फोन नंबर आणि ते काय विकतात? सांगत जाईन.
1. दामले आडनावाचे एक गृहस्थ, नैसर्गिक रित्या आंबे लागवड करतात. मी स्वतः त्यांची शेती बघून आलो आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके, वापरत नाहीत.
फोन नंबर देतो .... 9405767101
2.
पौष शुद्ध १५ अर्थात शाकंबरी पौर्णिमा
मागे पुराणकाळी पृथ्वीवर अवर्षण पडले ते १०० वर्षे चालले. अन् त्यामुळे समस्त मानव प्रजाती अन्नावाचून नष्ट होण्याची भिती निर्माण झाली. मानवाची अन्नासाठी वणवण सूरू झाली.पौष शुद्ध १५ अर्थात शाकंबरी पौर्णिमा जिजामाता जयंती
पौष शुद्ध १५
अर्थात शाकंबरी पौर्णिमा
जिजामाता जयंती
मागे पुराणकाळी पृथ्वीवर अवर्षण पडले अन् समस्त मानव प्रजाती अन्नावाचून नष्ट होण्याची भिती निर्माण झाली. मानवाची अन्नायाठी वणवण सूरू झाली. केवळ मानवच नाही तर सकल प्राणीमात्र अन्नावाचून तडफडू लागला अन् नष्टत्वाच्या फेऱ्यात सापडला.
अशा भयाण काळी साक्षात आदिशक्ती जगद्जननी भगवतीचे मातृहृदय तळमळून जागे झाले. आपल्या लेकरांचे दु:ख तिला पाहवेना, सोसवेना. त्याच्या दु:खावर फुंकर घालून ते शांत करण्यासाठी आवश्यकता होती अन्नाची त्यासाठी भगवतीनेच अवतार धारण केला.
आज काय घडले... पौष शु. १३ केशवस्वामींचे निधन !
शके १६०४ च्या पौष शु. १३ रोजी समर्थपंचायतनांतील प्रसिद्ध सत्पुरुष
भागानगरकर केशवस्वामी हे समाधिस्थ झाले!
महाराष्ट्रांतील संतांत तीन पंचायतने प्रसिद्ध आहेत.
मिसळपाव