Skip to main content

आकाश से गिरी मैं, इक बार कट के ऐसे ..

लेखक आनंदयात्री यांनी बुधवार, 16/04/2008 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
तुला आठवतय तु लहानपणी कशी असशील हे पहायची खुप उत्सुकता होती मला, गोल चेहर्‍याचे गोबर्‍या गालांची गोरी गोरी , अगदी लहानपणी तर नाक नसेलच तुला ! असे म्हटले की खुदकन हसायचीस तु. तुला आठवतो का ग आपला एखादा प्रवास ? मला खिडकीचीच जागा हवी म्हणुन हट्ट असायचा तुझा, अन जागा मिळाल्यावर काय तो ओसंडुन वहाणारा आनंद. गाडी हलली - जssरा गार वारा लागला की बोलता बोलता आपसुक डोळे मिटायचे तुझे आणी माझ्या खांद्यावर तुझे डोके अलगद विसावायचे.

आत्मानंदी शिष्य, आत्मज्ञानी गुरु! ;))

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 16/04/2008 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख संत तात्याबा महाराजांच्या आश्रमातर्फे आजच प्रकाशित करत आहोत! ;) राम राम मंडळी, नुकताच मिपाचे एक सन्माननीय सभासद ठणठणपाळ यांची नचिकेत्याचे आख्यान ही ष्टोरी वाचनात आली. नचिकेता नांवाचा एक इसम यमाकडे जातो आणि कथेशेवटी यम नचिकेत्याच्या वैराग्याचे कौतुक करतो आणि त्याला आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान सांगतो, अशी ही कथा आहे. या कथेवरून आमचेही दोन शिष्य मध्यंतरी आत्मानंदाच्या शोधात आम्हाला शोधत शोधत ठाण्याला आले होते आणि आम्हीही त्यांच्यावर अनुग्रह केला होता व आत्मानंदाची अनुभूती दिली होती ती ष्टोरी आठवली!

ये मेरी दुनिया नहीं !

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 16/04/2008 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
रसिक वाचक हो ,मी माझ्या कंपनी तर्फे गेल्या वर्षी इटाली-मिलान येथे गेलो होतो.सगळेच लोक जे इथे हसतमुख असायचे , ते तिकडे जाऊन अर्ध्या हळकुंडाने पिवळे व्हायचे ! प्रत्येकाच्या चेहेर्‍यावर "मीच शहाणा!" चे भाव असायचे , प्रत्येकाला आपल्याला मिळत असलेल्या २३ यूरो "खर्ची" मधून जास्तीत जास्त यूरो कसे वाचवता येतात याचीच जास्त "चिंता".या जगात प्रत्येक शेरास सव्वा-शेर असतोच हे ह्यांच्या गावीच नाहे जणू !

आभास

लेखक सुवर्णमयी यांनी बुधवार, 16/04/2008 02:36 या दिवशी प्रकाशित केले.
आभास आभास फक्त होता, मी थांबले कितीदा माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला? मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा पत्ता जुनाच होता, रस्ता तसाच होता मुद्दाम आठवांना त्या टाळले कितीदा होऊन वाघ फिरणे होते तसे नफ्याचे ( गाढव मनात त्याच्या ओशाळले कितीदा) नव्हते म्हणे कुणाच्या यादीत नाव माझे मुद्दाम त्यास त्यांनी डागाळले कितीदा सोनाली जोशी
Taxonomy upgrade extras

"टिंग्या" एक ह्रद्यस्पर्श अनुभव.

लेखक प्रगती यांनी मंगळवार, 15/04/2008 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
आजच "टिंग्या" हा प्रकाश हाडवळे यांचा चित्रपट पाहिला. खेडेगावाचं व तेथिल ग्रामिण जीवनाचं नितांतसुंदर चित्रण केलं आहे. एक सरळ साधी कथा आहे टिंग्या व त्याचा बैल पतिंग्या याची, बरोबरोनी आजच्या शेतकर्‍याचं दाहक वास्तव आपल्या समोर येतं. ओतुर जवळच्या मांडवा या खेडेगावात ही कथा घडते, लावणी चे दिवस असताना अचानक टिंग्याच्या दोन बैलांपैकी एक बैल (पतिंग्या) बसतो म्हणजेच कामाला निरुपयोगी होतो.

मी पाहिलेला मृत्यू

लेखक आंबोळी यांनी मंगळवार, 15/04/2008 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी थोडक्यात मरता मरता वाचलो.... काळ आला होता पण वेळ आली नव्हती... असले वाक्प्रचार आपण बर्‍याच वेळा वापरतो / ऐकतो. पण खरेच कधी कधी अगदी जिवावरचा प्रसंग ओढवलेला आसतो. माझ्या आयुष्यातले असे 2 प्रसंग येथे सांगतो. आपल्यालाही असे अनुभव आले असतील तर जरूर सांगा. तसा जन्माला येताना मी गुदमरलो होतो, काळानिळा पडलो होतो, थोडक्यात वाचलो, अशी आख्यायिका माझी आजी, आई आमच्याविषयी सांगतात पण तो प्रसंग नीट आठवत नसल्याने येथे तपशीलवार देत नाही. पण थोडक्यात मरता मरता मी जन्माला आलो असे म्हणता येईल. मी साधारण 6-7 वर्षाचा आसताना आम्ही एका वाड्यात माडीवर राहात होतो.

नचिकेत्याचे आख्यान

लेखक ठणठणपाळ यांनी मंगळवार, 15/04/2008 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपाच्याच एका सभासदाच्या मागणीवरून नचिकेत्याचे आख्यान इथे छापत आहे. मला माहिती असलेली गोष्ट मी माझ्या शब्दात सांगायचा प्रयत्न केला अहे. लिखाणासाठी मुद्दामच मराठी प्रमाण भाषा वापरली आहे.) नचिकेत्याचे आख्यान नचिकेत्याची गोष्ट कठ नामक उपनिषदात आढळते. नचिकेत्याचे वडील उद्दालक ऋषींनी एकदा विश्वजीत यज्ञाची तयारी केली होती. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे यज्ञ करणार्‍या ब्राम्हणांना गायी दान कराव्या लागत. उद्दालक ऋषींनी सगळ्या म्हातार्‍या झालेल्या आणि दूध आटलेल्या गायी देण्याचा सपाटा लावला. बापाची ही लबाडी नचिकेत्याच्या लक्षात आली.

एप्रिल फळ (५)

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 14/04/2008 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
आंबे चिरुन ,तुकडे करुन फोडी करुन , घोळुन चोखुन, रस काढुन, आटवुन , उन्हात वाळवुन, बर्फी करुन, दुधात मिसळून, वाफवुन, उकडुन,कच्चे , पिकलेले, ड्राय करुन, पाकात मुरवुन, मसाल्यात मुरवुन असे अनेक प्रकारे खाल्ले जातात. पण् इतर आंब्याला भाजी मधे टाकण्याचा अगोचर् पणा कोणी कधी केला नाही. सिकंदर् समोर इभ्या राहीलेल्या पोरस् राजाच्या भाषेत म्हणायचे झाले तर् सम्राटाला सम्राटासारखेच् वागवले जाते. नाही म्हणायला गुजराती लोकांत् "फ़जितो" नामक् आंब्याचे कढी सारखे पेय केले जाते. नावावरुन् कल्पना करायला गेलो तर फ़जिती च् होते.