Skip to main content

भाषाशुद्धी, शुद्धलेखन, मते-मतांतरे वगैरे वगैरे...

लेखक ॐकार यांनी बुधवार, 28/05/2008 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
शुद्धलेखन, भाषाशुद्धी इ. इ. संदर्भात मिसळपाव वर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा लक्षात घेता बरीचशी मते पूर्वग्रहदूषित आहेत हे मला जाणवते. एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून खालील काही प्रश्न्नांची उत्तरे स्वतःशी पडताळून पहावीत. १) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का?

महाराष्ट्राची जिवनरेखा........

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 28/05/2008 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राची जिवनरेखा........ नाही पणती नाही चिरा !! कालच्या लोकसत्ता मधील या बातमीने लक्ष वेधुन घेतले. याचा घोषवारा असा होता की ३१ मे ला आपल्या एस्.टी ला ६० वर्षे पुर्ण होणार आहेत. मात्र म.रा.प.म. आणी राज्य शासन यांना याचे अजिबात सोयर सुतक नाही. वाईट वाटले ही बातमी वाचुन. १ जुन १९४८ ला पुणे - अहमदनगर मार्गावर एस्.टी ची पहिली बस धावली. तेव्हापासुन आजपर्यंत आपल्या असंख्य बसेसद्वारे महाराष्ट्राच्या काना़कोपर्‍यात पोहचलेले एस्.टी चे जाळे अचंबीत करणारे आहे. लहाणपणी एस्.टी शी माझे जिव्हाळ्याचे नाते होते.

आमची संगीता

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 28/05/2008 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
अणुशक्तीनगरातली वसाहत वसवायला नुकतीच सुरुवात झाली होती त्या सुमारासच आम्ही तिथे रहायला गेलो. त्या काळात वाहतूकीची आणि संपर्काची फारशी साधने उपलब्ध नव्हती. सगळेच रहिवासी नव्याने आलेले असल्यामुळे विशेष ओळखी नव्हत्या. त्यामुळे आपण आपल्या माणसांपासून दूर कुठल्या आडरानांत रहात असल्यासारखे वाटायचे. त्या कॉस्मोपॉलिटन वस्तीत आपल्या लोकांसारखी दिसणारी, बोलणारी आणि वागणारी माणसे भेटली की जरा चांगले वाटत असे. त्या काळात तिथे लिमये कुटुंबाची अशीच भेट झाली आणि स्नेह जमला. श्रीयुत त्यांच्या कामात मग्न असायचे तसेच त्यांना ब्रिज, बॅडमिंटन वगैरे खेळांची आवड होती. सौ. गृहकृत्यदक्ष गृहिणी होत्या.

अनादि मी अनंत मी...

लेखक विकास यांनी बुधवार, 28/05/2008 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला, मारील रिपू जगती असा कवण जन्मला... असे म्हणणार्‍या आणि लहानपणीच शिवाजीच्या थाटात "देशाच्या स्वातंत्र्याकरता मारीता मारीता मरेतो झुंझेन" अशी शपथ घेणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज म्हणजे २८ मे ला, १२५ वी जयंती आहे. आज म.टा. मधे त्यांच्यावर विशेष ऑनलाईन पुरवणी काढण्यात आली आहे. त्यातील श्री. भारतकुमार राउत यांचा "तात्यांच्या सहवासात" हा लेख वेगळ्याच अनुभवावर आधारीत असल्याने वाचनीय वाटला.

सहज

लेखक चेतन यांनी मंगळवार, 27/05/2008 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
सहज अशी ही कल्पना कवितेत उमलावी | शब्दांच्या या विश्वात सहजपणे रमावी || कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा | सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा || ~X( सहज सहज करताकरता हे काय झाले? शब्द कसे वाढले? हे सहजच् नाही कळाले सहजच् मनातुन ते, कागदावर (जालावर) उतरले वाचुन बघितल्यावर हे, हात सहजच् कपाळाकडे वळाले... :T सहज चेतन
Taxonomy upgrade extras

२६ जुलै २००५ एक अनुभव !!

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 26/05/2008 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
आता काही दिवसात पाऊस चालु होईल. पावसाळा हा सर्वांना आवडतो. माझ्यासकट सर्वांच्या रम्य आठवणी पावसाशी निगडीत असतात मग ते पावसात मनसोक्त भिजणे असो वा केलेला एखादा सुंदर प्रवास असो. २६ जुलै २००५ पासुन मात्र मुंबईकरांना पाऊस म्हणले की एक प्रकारची सुप्त भीती वाटू लागली आहे. 'न भुतो न भविष्यती!' अशा प्रकारचा झालेला पाऊस जो मी अनुभवला तो शेअर करण्याचा एक प्रयत्न .