Skip to main content

आजतकचा कौल - आवाहन

लेखक आनंदयात्री यांनी गुरुवार, 23/10/2008 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
आजतक या न्युज चॅनेलने इथे मनसेवर बंदी घालावी की नाही असा कौल सुरु केला आहे. त्यांना बहुदा उद्याची हेडलाईन बनवायला भातमीची भ्रांत पडली असावी, कारण बर्‍याच दिसात बच्चनला काय सर्दी झाली नाहिये अन एखाद्या सिनेतारकेच्या कुत्तरड्याला तापही भरला नाहीये. तर सांगायचा मुद्दा असा की आपण मराठी माणसाने तिथे जाउन दाखवुन द्यायला हवे की आपल्याला काय हवे आहे ते, नायतर उद्या त्यांना बोंबाबोंब करायला आहेच .." देखिये जनता की आवाज !! लोग चाहते है म न से पार पाबंदी लगे !" चला तर मग ..

भाषा - फ्रेन्चचा ढासळता बुरुज

लेखक सुनील यांनी गुरुवार, 23/10/2008 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात एक घटना घडली. जगाच्या दृष्टीने म्हटले तर अगदीच क्षुल्लक वाटणारी. भारतातील वृत्तपत्रात तर शेवटच्या पानावरदेखिल तिला स्थान मिळाले नसावे. पण फ्रान्समध्ये मात्र त्या घटनेने मोठा गदारोळ उठला. अशी काय होती ती घटना? रवांडा हा अफ्रिकेतील एक टिनपाट देश. अधिकृत भाषा फ्रेन्च. पण गेल्याच महिन्यात रवांडा सरकारने इंग्लीश ही अधिकृत भाषा करण्याचे संकेत दिले. येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळांत फ्रेन्चऐवजी इंग्लीश शिकविण्याचे ठरविले. आणि फ्रान्समध्ये हलकल्लोळ माजला! आपल्या भाषेविष्यी, जगातील तिच्या स्थानाविषयी फ्रान्स अतिशय हळवा आहे.

फक्त विचारच करा, खरे होवू नये अशी प्रार्थना करा

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी गुरुवार, 23/10/2008 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
विचार करा (फक्त विचारच करा, खरे होवू नये अशी प्रार्थना करा) की जर महिला पुरुषांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या तर काय काय घडेल? त्याचा हा विनोदी आढावा.... पुण्यात महिलांची पुरुषांवर लाटणे फेक. अनेक पुरुष डोक्यावर टेंगुळ येवून जखमी. अनेक पुरुष घरी जायला घाबरत आहेत. अनेक दिवस ऑफिसातच मुक्काम ठोकून. काही पुरुषांना या आंदोलनाची आधीपासूनच कल्पना असल्याने ते पोळपाट बॅगेत लपवूनच ऑफिसला निघाले होते.

मनुवादी आचरटपणा

लेखक द्विज यांनी गुरुवार, 23/10/2008 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
शुद्धलेखनावर आलेल्या एका प्रतिक्रियेला प्रतिसाद
मनुवादी आचरटपणा तुम्ही कपडे न घालता बाजारातुन हिन्डता का ? मग शारदेचा अपमान का करावा शुद्धलेखनाला मनुवादी आचरटपणा म्हणण्यापुर्वी स्वतः नागडे फिरुन दाखवा अशुद्ध लेखनाला विरोध नाही माझा माझा रोष आहे त्याला मनुवादी म्हणण्याला तुला जन्म दिला तेव्हा वासनावादी म्हणाला होतास का तुझ्या बापाला मनु माझा पुर्वज होता तो हसतोय तुझ्या या स॑भ्रमाला कारण द्विज रुपी
Taxonomy upgrade extras

मराठी तरुणांसाठी नोकरी-उद्योग देणारा वेबमंच

लेखक अभिरत भिरभि-या यांनी बुधवार, 22/10/2008 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी तितुका मेळवावा. महाराष्ट्र धर्म वाढवावा सध्याच्या काळात मराठी तरुणांसाठी रोजगार हा ज्वलंत प्रश्न बनल्याचे दिसते आहे. ही नाराजी ग्रामीण व शहरी अशा दोन्ही स्तरावर जाणवते आहे. बर्‍याचदा आपण आपल्या नोकरी / व्यवसायाच्या निमित्ताने खुल्या झालेल्या जागा दिसतात; पण तुमच्या परिचयाचा कोणी उमेदवार माहिती नसल्याने ही संधी लायक व गरजु तरुणांपासुन वंचित राहते. मिपावर आपण आपली भाषिक/सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी येथे येतो. अप्रत्यक्षपणे येथे नेटवर्क तयार होते.

आम्ही बाराक ओबामाला मत देऊन पण टाकलं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 22/10/2008 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
"अजून ४ नोव्हेंबर उजाडायचा आहे.तो मतदानाचा दिवस आहे मग त्या अगोदर मत देणं कसं शक्य आहे?" असं आपण म्हणाल.पण खरं सांगू हीच तर अमेरिकेत गम्मत आहे.इथे स्वातंत्र्याला सिमा नाही.मात्र फक्त ते सर्व कायद्दात असलं पाहिजे.हम करे सो कायदा नाही चालत.आणि तसा काही अन्याय वाटला तर जा कोर्टात आणि मांडा तुमची कैफियत.कोर्टपण तत्पर असतं.

शंभर प्रश्न हवे आहेत.

लेखक रामदास यांनी बुधवार, 22/10/2008 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
कोजागीरी या विषयावर मी आणि माझे शास्त्री स्नेही बोलत होतो. रात्री लक्ष्मी येते आणि को जागर्ती ? असा प्रश्न विचारते आणि जे लोक जागे असतील त्यांचे घरी येते वगैरे माहीती होतीच पण मी शास्त्रींना विचारले यापेक्षा काहीतरी वेगळे कारण असावे असं वाटतं मला , तुम्ही काही माहिती सांगू शकाल का? शास्त्री हसले आणि म्हणाले होय . मनाला पटेल अशी एक कारण परंपरा या कोजागीरीच्या पाठीमागे आहे.त्यांनी सांगीतलेली माहीती अशी: शरदात दोन पौर्णीमा येतात. आश्वीनी नक्षत्रात कोजागीरी आणि कृत्तीका नक्षत्रावर कार्तीकी पौर्णीमा. आश्वीनी नक्षत्राचे स्वामी अश्वीनीकुमार .देवांचे वैद्य. कृत्तीकेचे स्वामी अग्नी.

विलास देशमुखांना खुले पत्र !

लेखक मयुरेशवैद्य यांनी बुधवार, 22/10/2008 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
विलास देशमुखांना खुले पत्र. बहुतेक वेळा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना "माननीय" असे संबोधण्याची प्रथा आहे. पण आपणाबाबत आता असे म्हणावेसे वाटेनासे झाले आहे. गेल्या काही वर्षात आपण व आपल्या पक्षाने महाराष्ट्राचे नक्की काय भले केले काही कल्पना नाही. मुंबईत बड्या बिल्डरांचे मॉल्स आलेत, गिरणगावातून मराठी हद्दपार होतेच आहे, शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे, विजेचा प्रश्न तसाच, टाटांची नॅनो महाराष्ट्राला हुलकावणी देऊन गुजराथाला निघून गेली. गेली काही वर्ष आपण मुंबईला शांघाय करण्याच्या वावड्या उठविल्या होत्या.

रेल्वे भरती ची माहिती हवी.

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 22/10/2008 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी माझ्या एका सहकार्‍याशी ( तसा तो सिंधी आहे आणि गुजरात मध्ये पूर्वी नौकरी करीत असे) रेल्वे भरती कशी होते याबद्दल चर्चा करत होतो. त्या माहितीच्या आधारे हा लेख लिहित आहे. माझे समज ( याबद्दलच्या माहिती फक्त काही प्रांतातच येतात, त्या प्रांताच्या लोकांना वेगळी अशी वागणुक / सवलत मिळते, नेहमीप्रमाणे मराठी लोकाना डावलले जाते, अश्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रात कधीच येत नाही, रेल्वे ही काय एका विशिष्ठ प्रातांचीच मक्तेदारी आहे काय? इत्यादी इत्यादी मी मुद्दे मांडले.) त्यावर त्याचे उत्तर मी मराठीत देत आहे -> अश्या परिक्षा देशातल्या वेगवेगळ्या भागात होत असतात.