`मिपा'वर गोंधळ.. (शिर्षक संपादीत)
`मिपा'चे वेगळेपण आणि वैशिष्ट्य पाहून मी या संकेतस्थळावर आलो. इथे प्रत्येकाला आपली मते, विचार मोकळेपणाने मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, असेही जाणवत होते. पण या स्वातंत्र्याचा काही जण दुरुपयोग करीत आहेत, असे दिसते.
कुणा महाभागाने आजच ५ कविता आणि विषय वेगवेगळ्या शीर्षकाखाली दिले आहेत.
मध्यंतरी मुंबई हल्ल्याच्या वेळी तर नवनवे विषय टाकण्याची अहमहमिकाच लागली होती. एका दिवशी शिवराज पाटलांच्या राजीनाम्याचे तीन-तीन विषय होते!
एखाद्या विषयावर सांगोपांग चर्चा घडवण्यापेक्षा विषय टाकण्यात आघाडी घेण्याची स्पर्धाच त्यात दिसते. `मिपा'कारांनाही हे अपेक्षित नसावे, असे वाटते.
हा विषय तात्यांशीही आधी बोललो आहे.
मिसळपाव