Skip to main content

महाराष्ट्र दर्शन - अंबाजोगाई /भाग १

लेखक स्पा यांनी बुधवार, 17/11/2010 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
कल्याण स्टेशनातून "देवगिरी एक्स्प्रेस" सुटली, आणि आपण निदान एक आठवडा तरी मुंबईच्या मगरमिठीतून सुटलो , या भावनेने " हुश्श " केले...... कामाची आणि बाकीची सगळी " टेन्शन" सोडून फक्त धमाल करायची असं ठरवलंच होतं. गाडी सकाळी बरोबर ५ ला औरंगाबाद ला पोहोचली अनपेक्षितपणे वादळी गडगडाटासह "वरुण राजा" स्वागताला आला होता. मराठवाड्याच्या उष्णतेने पोळून निघण्याच्या तयारीने आलेल्या आम्हाला हा सुखद धक्काच होता. कडाक्याची थंडी पडली होती .. (बहुतेक रात्रभर पाऊस पडलेला असणार.....) आम्ही कुडकुडत बाहेर पडलो. MTDC बुक केलेलं होतंच, पण त्याआधी नातेवाईकांकडे उतरलो.

भस्म्या

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 17/11/2010 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
मधुकर घुसळे ह्यांचं एक सुंदर गाण मराठी चित्रपटात आहे. >>>डोक फ़िरलं या बयेच डोक फ़िरल या हाताला धरलया म्हणते लगीन ठरलय या ह्या चालीवर विडंबन (त्या गाण्याचे नव्हे!), समाजात माजलेल्या भस्म्या रोगावर विडंबन सादर करीत आहे. भ्रष्टाचाराला सगळेच नावे ठेवतात, अगदी तडस लागे पर्यंत चरत असतांना देखील.
काव्यरस

पुढचे पाऊल

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 17/11/2010 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
http://72.78.249.107/esakal/20101116/5396894299098665752.htm वरील बातमी बघा. मुस्लिम पुरुषाने मोबाईलवर तीन वेळा तलाक म्हटले तर इस्लामी कायद्याप्रमाणे तो तलाक ग्राह्य धरला जाईल. पत्नीची ऐकूच आले नाही वगैरे सबब चालणार नाही. इस्लाम हा नव्या तंत्रज्ञानापासून अलिप्त आहे असे समजणार्‍यांना ही एक जोरदार चपराक आहे. इस्लामही नव्या युगाच्या नव्या तंत्रांचा आपल्या धर्माच्या रुढींमधे समावेश करतो. किती किती छान! असे कळते की फेसबुकवर बायकोच्या वॉलवर तलाक तलाक तलाक असे लिहिल्यास ते ग्राह्य आहे का याविषयी मौलवी चर्चा करत आहेत.

हैयोंच्या अभ्यासपुर्ण लेखनानंतर

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 17/11/2010 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
काय लावलय हे ओकांनी नाडीपुराण असा सामान्य वाचकांचा ग्रह होणे स्वाभाविक आहे.
तथापि, हैयो हैयैयो हे भारतीय व परदेशी भाषातज्ञ तर आहेतच शिवाय ७० पेक्षा जास्त प्राचीन ग्रंथम पासून ते फारसी, अरबी लिपींचे तज्ञ अभ्यासक आहेत.

शाहीद - एक करूण कहाणी

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 16/11/2010 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
भवानी तीर्थंकरच्या डायरीतील एक पानः लक्षवेधी: हे डायरीतील एक पान आहे. त्यामुळे इथे छायाचित्र टाकता येणार नाही. वास्तविक शाहीदला ते हवं होतं, पण डायरीतल्या पानासोबत छायाचित्र म्हणजे संपादकीय (तेच ते, अग्रलेख किंवा उग्रलेख) चौकटी असं वाटायला नको, असं आमच्या पत्रकार मित्राचं मत झालं.

नाग !!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 16/11/2010 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
नाग जेव्हा सरपटत जातो तेव्हा खरेच नाही कळत मला की तो नाग आहे की साप आहे ? तुम्हाला कळतो का तो काय आहे ते ? साप की नाग ? कधी बघितलाय का त्याला सरपटताना ..? नि अचानक फणा काढताना ? ***** सळसळ सळकताना विजेच्या वेगाने नि फणा काढून जाभाड पसरताना ? अगदी वीतभर फणा नि पसरलेला आक्राळविक्राळ जबडा एखादे पाखरू ,उंदीर कसा भयभीत नि मत्रमुग्ध होऊन जातो त्याच्या नजरेच्या टप्प्यात नि जागच्या जागी कसे खिळून जातो त्याच्या जबड्यात कसा शिरतो अलगद आपले प्राण त्याच्या हवाली करत ? ****** मी पाहिलेय भर दुपारी बारा वाजता एका सरड्याला हताशपणे ...!! आपले प्राण त्याच्या हवाली करताना ….!!! मी बघितलाय ह्या त
काव्यरस

आई !!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 16/11/2010 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
किती काळ गेला तुला जाऊन तुझी आठवण येत नाही असे होत नाही. पण तुझ्या आठवणीने डोळ्यात पाणी येते असे पण आता होत नाही !!
काव्यरस

शोंदेष, चोमचोम, मिष्टीदोई आणि रोशोगुल्ला

लेखक अर्धवट यांनी मंगळवार, 16/11/2010 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
*हे प्रवासवर्णन नाही, माझ्या आवडत्या शहराविषयीचा कृतज्ञतालेखच म्हणा हवे तर*
एका मुठीत लॅटपॉटची बॅग, दुसर्‍या मुठीत जीव आणि पोटाने सामानाची ट्रॉली ढकलत नेताजी सुभाषचंद्र विमानतळाच्या बाहेर आलो तेव्हा समोर गच्च गर्दीमधून भरधाव वेगाने पिवळ्या टॅक्सी जात होत्या, आणि एक टॅक्सी ड्रायवर तिथे माणसांना एका हाताने थोपवून गाड्यांना पुढे सोडत होता. मी ह्याचा अर्थ लावत असतानाच त्याचे शब्द कानावर पडले "जोल्दी जोल्दी जोल्दी... जोल्दी चोलो.. दो चार मर गया तो भी प्रोब्लेम नोई.. जोल्दी चोलो" माझं भारतातलं दुसरं सर्वात आवडतं शहर म्हणजे कोलकोता.

हलक्या फुलक्या पिसासारखे फुलपाखरू !!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 16/11/2010 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
हलक्या फुलक्या पिसासारखे फुलपाखरू पंखावर मस्त रंगीत ठिपका गिरकी घेत झुलत असते फुलांच्या गंध भारल्या स्वप्नात फुले खुणावतात फुलपाखराना खुळावतात त्याला आपल्या मत्त गंधाने फुलपाखरू धुंद ! मंत्रमुग्ध !! खेचले जातात आपोआप नकळत स्पर्श करते फुलांना फुलपाखरू एक शहारा फुलाच्या रोमारोमात अग आईग केवढा काटा फुलला माझ्या गर्भ कोशात सरसरून !! पाकळी पाकळी मत्त असते रेशीम रेशीम मस्त मुलायम पाकळीच्या स्पर्श सुखाने फुलपाखरू जाते मत्त होऊन आस कळीला जन्म घालण्यास फुले जातात वेडात हरवून नि ध्यान लागते फुलपाखराला दोघेही जातात स्वप्नात हरवून ...!!!!
काव्यरस

विसर- भुकेचा

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 16/11/2010 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
सौन्दर्या पुढे कधी कधी भूकेचा सुद्धा विसर पडू शकतो हे दाखवणारी काव्य-कथा. नानाविध रंगांनी भरला पुष्पसुगंधे साज बहरला दवबिंदूंना लेऊनी सजला आसमंत अमृते नाहला फ़ूलपाखरे अहा नाचती कणाकणाने मधू प्राशती पराग प्रेमे वाटत सुटती पुष्पावरुनी पुष्पावरती मउ रेशमी झाल खुणावे नारींगी पंखात झुलावे घटकेसाठी शांत बसावे चंचल हे भ्रमण विसरावे बसुन मजेने पंख हलविले फ़ुलपाखरू तिथे थबकले लावण्याला फ़ुलही भुलले उराउरी भेटण्या विसरले जरा बागडून उडून जाई फ़ुल अचलसे भुलुनी राही भ्रमर अवचिते तेथे येई नारींगी पदरात विसावी फ़ूल येतसे भानावरती क्षुधा उफ़ाळे आतुन वरती आनंदे भ्रमरा अलिंगती शोषुन जीवन भुक शमविती