Skip to main content

डोक्यात तिडिक आणणारे मिपाकर - भाग ९

लेखक अवलिया यांनी बुधवार, 23/02/2011 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग - http://misalpav.com/node/16898 ***
माझ्या लहानपणच्या ज्या आठवणी अजून लक्षात आहेत त्यातली अगदीच लख्ख आठवणारी आठवण म्हणजे, संध्याकाळी आजीबरोबर विठोबाच्या देवळात जाणे. आमच्या गोरेगावात घरापासून अगदीच जवळ अशी तीन चार देवळं होती. एक अगदीच जवळ असणारं दुर्गादेवीचं. दुसरं म्हणजे गोगटेवाडीतलं गणपतीचं, पण ते जरा लांब. आणि तिसरं हे गवाणकर वाडीतलं विठोबाचं. आजी हिंडती फिरती असे पर्यंत वारानुसार, तिथीनुसार रोज संध्याकाळी देवळात जायची. विठोबाच्या देवळात जायचं म्हणजे आरे रोड ओलांडावा लागायचा. त्यावेळी तिला सोबत लागायची.

कान्हा

लेखक कोमल यांनी बुधवार, 23/02/2011 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणाच गाण तुझ्या ओठी सुरु होत, ऊन पावसाशी झिम्मा, मन खेळत बसतं॥ इन्द्रधनुच्या कमानीत तुझी कमनीय काया, माझ्या मनाला मोहते,तुझी सप्तरंगी छाया॥ ओठी बासरी तुझ्या, तिचे वेडे खुले सुर, चिंब पावसात भिजे, मन बनून मयूर॥ माथ्यावरी सजे मोरपिसं, जणू पाचूचा खड़ा, आला बघा गं सयांनो, माझा कान्हा-सावला॥ त्याच्या सोनेरी देहाची, सोन्या सारखी किरणे, तशी सोनेरी शेवंती, गाते पहाटेचे गाणे॥ माझ्या सावल्या देहात, "सावल्या"चेच चैतन्य, दर्पणात पाहे मी, माझ्या सावल्या चे बिंब॥ नाही मी राधा, अन मीरा ही नाही तरी तुझीच आस कान्हा धरून मी राही... तरी तुझीच वाट कान्हा पाहत मी राही॥
काव्यरस

[ज्योतिष] दिनांक ५ मार्च २०११ रोजी होणारी मिश्र फलदायी अमावस्या

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 23/02/2011 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ५ मार्च २०११ रोजी सायन मीन राशीत १४ अंश ०० मि वर अमावस्येची चंद्र-सूर्य युती होत असून ही अमावस्या मंगळाशी सात अंशात युती करते. ही युती फार तीव्र म्हणता येणार नाही. पण गोचर मंगळाचा गोचर प्लुटोशी लाभ योग होत असल्याने अडकून पडलेली कामे मार्गी लावायला जी ऊर्जा लागते ती या अमावस्यामुळे बर्‍याच जणाना मिळू शकेल. पण काही जणाना गोचर शनीशी अमावस्येने केलेल्या quincunx (मला याचे मराठी नाव माहित नाही) या योगामुळे काही जणाना अमावस्या त्रासदायक ठरायची शक्यता आहे अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com

मासे २१) कोलिम

लेखक जागु यांनी बुधवार, 23/02/2011 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
कोलीम समुद्रात तसेच खाडीत मिळतो. समुद्रातील कोलीम पांढरट असतो तर खाडीतला काळा असतो. खाडीतल्या कोलमाला जास्त चव असते. कोलीम म्हणजे कोलंबीच्या जन्माची पहिली स्टेप. कोलिमाचे कालवण मी अजुन ऐकले नाही पण कोलिमाची वडी करतात. सुक्या कोलमाच्या पापडासारख्या पण थोड्या जाड वड्या बाजारात विकत मिळतात. त्यांना पेंडी म्हणतात. त्या पेंडी तव्यावर किंवा चुलीत भाजुन खायला मजा येते. पहिला कोलीम निवडून घ्यायचा. एक माचिसची/अगरबत्तीची काडी घेउन किंवा बोटाने थोडे थोडे कोलीम सारुन (तांदूळ निवडतो तसे) कोलीम निवडावा लागतो. त्यात कधी कधी पाखर असतात किंवा काही प्लास्टिक वगैरे मिक्स झालेले असतात म्हणून.

सार्‍या जातींना खड्यात जावूद्या

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 23/02/2011 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
सार्‍या जातींना खड्यात जावूद्या
सार्‍या जातींना खड्यात जावूद्या आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||धृ|| नका कुणी हो जातपात मानू नव्या कल्पना अंमलात आणू जुने विचार मसणात जावूद्या आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||१|| ह्या जातींनी काय नाय केलं माणसामाणसात भांडन लावून दिलं सख्खेशेजारी वैरी होती एकमेकांचे गळे कापती मी उच्च तू निच ते म्हणती असलं वाईट वागणं तुम्ही थांबवा या जातींना खड्यात जावूद्या ||२|| ब्राम्हण, मराठा, शिंपी, सोनार तेली तांबोळी कुणगर, महार कोळी कोष्टी कोकणा भामटा भिल्ल रामोशी मातंग बेमटा किती जात
काव्यरस

सिंहगडवरचा सुर्यास्त

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी बुधवार, 23/02/2011 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
शिवजयंतीला सिंहगडावर गेलो होतो . तिथे सुर्यास्ताला घेतलेली काही छायाचित्रे .. गडावर पोहोचेपर्यंत सूर्याने क्षितिजावरून कल्टी मारली होती. सूर्य मावळला होता पण अजून त्याच्याकडून क्षितिजावर विस्कटलेले रंग आवरायचे राहिलेच होते. आम्ही जमेल तेवढे रंग आमच्या कॅमेऱ्यात भरून घेतले.

प्रिय विनील,

लेखक श्रावण मोडक यांनी बुधवार, 23/02/2011 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
ओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा यांचे, त्यांच्यासमवेत असणारे अभियंता पवित्र माझी यांच्यासह, माओवाद्यांनी अपहरण केले. विनील यांचे मलकनगिरीतील काम असे आहे, की त्यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांचा प्रभाव असूनही आदिवासीच रस्त्यावर आले आहेत. फक्त आदिवासीच नव्हे, तर सर्वदूर समाजही. नेमकं काय घडतं आहे तिथं? सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं? ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे सचिन जाधव यांनी विनिलला उद्देशून लिहिलेलं हे खुलं पत्र.

मैत्रिणींच्या tips हव्या आहेत.

लेखक Pearl यांनी बुधवार, 23/02/2011 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
माझी १ मैत्रिण गेली ३/४ वर्षे SFO ला रहात आहे. तिला थोडे दिवसांपूर्वि मुलगा झाला.(C-section) It is her first baby. तिची आई भारतातून गेली आहे महिन्याभरापूर्वि तिला मदत म्हणून. New Born Mother साठी हा सगळा अनुभव खूप वेगळा असतो आणि आयुष्यात खूप उलथापालथ घडवून आणणारा असतो. त्या प्रसंगी अनुभवी लोकांच्या सल्ल्याची खूप गरज असते. अनुभवाचा खूप फायदा होतो. भारतातले अनुभव आणि US मधले अनुभव खूप वेगळे असणार. (कारण तिथे स्वयंपाक, घरकाम, बाळाची आंघोळ यासाठी कामाची बाई मिळणे अवघड आणि महाग आहे.

तुला कसली रे एवढी घाई ?

लेखक विश्वेश यांनी बुधवार, 23/02/2011 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी नेहमीप्रमाणे घाई घाई ने आवरले आणि निघालो तेव्हा बायकोने विचारले ... तुला कसली रे एवढी घाई ? निघण्याची घाई, मला जगण्याची घाई ... आयुष्याची पाने मला उलटायची घाई हसायची घाई, मला रडायची घाई ... चार पावले चालताच मला पडायची घाई खायची घाई, मला पिण्याची घाई ... कोणी काही देवो, मला घेण्याची घाई जिंकायची घाई, मला हरायची घाई ... कुठे जातो माहित नाही, पण धावायची घाई भेटीची घाई, मला गाठीची घाई ... ऐन तारुण्यातच मला साठीची घाई सवयीची घाई, मला सवयीची घाई ... मरणाची घाई ... मला सरणाची घाई ... मला सरणाची घाई ...

व्य॑गचित्र - बहुजन समाजाची आजची स्थिती

लेखक प्रदिप आवाड यांनी बुधवार, 23/02/2011 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
माफ करा..... स॑गणक लाइट गेल्याने ब॑द पड्ला होता अन नेमक॑ व्य॑गचित्र डकवायचे रहीले होते.... हे घ्या परत..... प्रदिप आवाड