Skip to main content

आत्ममग्न

लेखक चित्रा यांनी बुधवार, 16/03/2011 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियकरामागून जातेस नीऑन रंगांच्या दरवाज्यातून बेदरकारपणे - होतेस स्वार - गार वार्‍यावर, मागे उडणारी रंगीत वस्त्रे सावरण्याची शुद्ध नाही तुला कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे? * एकटीच असतेस पांढर्‍या गजांच्या खिडकीसमोर निर्विकारपणे - शहारतेस - गार वार्‍याने, पारदर्शक वस्त्रांतून काटकुळे अंग दिसू नये याची शुद्ध नाही तुला कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे? *
काव्यरस

आठवणी ... !!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 16/03/2011 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणी असतात मनात दडलेल्या येतात अचानक नकळत मनाच्या काठावर अलगद पावलांनी नि येतात समोर अनाहुतपणे..... आठवणी कधीकधी भासाच्या कधीकधी त्रासाच्या मनात रुजलेल्या पिंपळाच्या झाडासारख्या खोल पसरलेल्या घट्ट खोल मुळांच्या काही आठवणी नाजूक प्रेमाच्या अलगद मोरपिसी आठवणीच्या अल्लड पाउस नि तिच्या सोबत चिंब चिंब भीजल्याच्या गरमागरम चहाच्या आठवणी नाही होत कधी शिळ्या नाही उडत त्याचा रंग त्या असतात रंगीत आंबट चिंबट मस्त चवीच्या …! आपले जुने मातिचे घर आठवणीतून अलगद येते वर ती श्रावणातील सकाळ परीक्षेचा पेपर....
काव्यरस

कुठे गेली सगळी माणसे

लेखक निनाव यांनी बुधवार, 16/03/2011 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे गेली सगळी माणसे नाहिच कसे कुणी मज दिसेना? तो पान वाला पण दिसत नाहिये आज ज्याच्या दुकाना च्या बाहेर उभे राहुन विविध आकॄत्यांमधे ...धुर उडायचे ओठांचे चंबु मग शुन्यात बसायचे बाजार ही रिकामेच दिसते आहे आज कुणास ठाउक का? न ते आवाज न ते गोंगाट सगळे संपले कि..विकले गेले आज? तिथं त्या कडु-लिंबाच्या बाजुला असायचा एक -बस-थांबा तो ही दिसत नाहिये मला प्रवासी गेले आहेत निघुन कि संपले आहे प्रवास? डोंबारीच दिसत आहेत फक्त आज ओसाड रस्त्यांवर मला तोल सांभाळतांना हसत आहेत का त्या दोरी चीच आहे कास? मारुन पाहिल्या हाका त्यांना पण कुणी काही बाहेर येईना जात नसेल का माझा आवाज कि यायचेच नसेल त्यांना? कुठ

पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- १)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 16/03/2011 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
ईशान्य भारतातील जनजातींचे पुनरुत्थान ही विश्वास कल्याणकर यांचा धागा वाचल्यावर मला मागच्या वर्षी महाराष्ट्र टाइम्स मधे आलेली लेखमाला आणि लोकप्रभामधील एका लेखाची आठवण झाली. हे लेख मी संकलीत करून ऑर्कुटवर एका समुहावर ठेवले होते.

हुताशनी ( शिमगा )

लेखक स्वप्निल रत्नाकर भायदे. यांनी मंगळवार, 15/03/2011 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदू पंचागा प्रमाणे फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा महिना या महिन्यामधील मुख्य एकच सण शिमगा होय. साधारण पणे फल्गुन शुक्ल पंचमी पासून पौर्णिमेपर्यत हा उत्सव स्थळ कालपरत्वे थोड्या फार फरकाने भारतात सर्वत्र साजरा करण्यात येतो.अशा उत्सवात सामिल होऊन व आपल्या मनावरचा भार हलका करीत व प्रसन्न मनाने आपल्या कर्तव्यकर्मा कडे नव्या उत्साहाने वळूया व हा सण योग्य मर्यादा सांभाळून आनंदाने साजरा करूया. हिंदू पंचागा प्रमाणे फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा महिना या महिन्यामधील मुख्य एकच सण शिमगा होय.

problem loading page.

लेखक निवेदिता-ताई यांनी मंगळवार, 15/03/2011 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळपासून काय झाले होते, इथे येताच आले नाही- problem loading page. असे येत होते

त्सुनामी

लेखक वर्षा म्हसकर-नायर यांनी मंगळवार, 15/03/2011 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा पुन्हा तू येतोस तुझा मीट्ट अंधार, गडद काळोख घेउन पुन्हा पुन्हा ते पाशवी, ऋद्र, आक्राळ -विक्राळ विद्रुप क्षण होऊन पुन्हा मी लढते, जीव तोडुन सत्याची अखंड तेवणारी ज्योत घेऊन, स्वत:तील सत्व जपत तू घोंघावत येतोस सुनामी सारखा आपल्या आक्राळ विक्राळ, विद्रुप विनाशकारी लाटेत मला संपवून टाकायला पण मी जिवाच्या आकांताने लढते स्वत:च्या आत्म्यात तेवणा-या सत्याच्या ज्योतीच्या आधाराने लढते लढते लढते त्या आक्राळ विक्राळ विनाशकारी सुनामीला पुन्हा एकदा परतवून लावते माझा मेंदु पुन्हा थोडा मरतो पण मी जिवंत रहाते मी पुन्हा त्या जिवनरुपी वेताळाला अन्गावर घेवुन पुढच्या प्रवासाला निघते
काव्यरस

आयुष्याची दोरी

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 15/03/2011 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याची दोरी हे सजीवसंख्येचे नियमन करणार्‍या मृत्यो, कधीही, कुठेही आणि कसेही आयुष्याची दोरी कापून टाकण्याचे तुझे अधिकार मान्य आहेत मला पण सन्मानाने मरण्याचे अधिकार मलाही असावेत की नाही? हे “जीवन” तुझे असले तरी “मी” तर “माझा” आहे ना? तुझ्यामुळे आयुष्य सरणार असले तरी मी मात्र उरणारच आहे.

यावे तरी तु का समोर

लेखक निनाव यांनी सोमवार, 14/03/2011 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
यावे तरी तु का समोर जवळ मज नसतांना तहानले मन माझे नयन हे भिजतांना अजुनच कमी होते अंतर तु लांब जातांना आठवेस तु अधिकच मी तुज विसरतांना शब्द अबोल करणारे वियोगात मी लिहितांना कंठी दाटून येतात ह्रदयातुनी उतरतांना का असावी अशी ही वेदना न दिसे कुणास दुखतांना श्वासही करते परके मला तु जवळ नसतांना!
काव्यरस