Skip to main content

टवाळखोरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"!

लेखक पिवळा डांबिस यांनी सोमवार, 27/06/2011 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज ओळख करून घेऊ, मिपावर जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"! इतिहासात पाहिले असता, मिपाची तात्याची गादी गेल्यावर टवाळखोर लोकांना मिपावर वाली उरला नाही. टवाळखोरांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सामान्य मिपाकर तर हुच्चभ्रूंच्या चालीरितींकडे आकृष्ट होऊ लागले होते. मिपावरील साहित्यावरचा हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी आणीबाणीच्या काळा आधी उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर यांनी जमात-ए-कंपूची स्थापना भांडुप, मुंबई येथे केली. ही संस्था तळागाळातील टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणण्याचे काम करते. हिची कोणतीही उपसंस्था नाही.

आर डी: ७२

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 27/06/2011 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
पंचमदा असते तर आज ७२ वर्षांचे झाले असते. पण खरं सांगू? ७२ काय, किंवा १०० काय, मला व्यक्तिशः हा माणूस कधीच वृद्ध वाटला नसता. इतकं चिरतरूण संगीत प्रसवणारा जादुगार वयातीतच. वो जितना जिया, सही जिया! हा लेख खास तुमच्या आठवणींचा बांध उघडण्यासाठी, मी देतोय ती केवळ झलक आहे या किमयागाराची, तुमच्याही आवडीची गाणी येऊ द्यात प्रतिसादातः मला चटकन आठवणार्‍या चित्रपटांमधील प्रत्येकी एक सुंदर गीत देतो आहे (एकच गीत सुंदर? कसं शक्य आहे?

वैचारीक भिन्नता

लेखक शुचि यांनी सोमवार, 27/06/2011 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
लॉबसंग रांपा चं "यु फॉरेव्हर" पुस्तक बरेच दिवसांनी परत एकदा वाचनात आलं. यातील एक लेख आहे "ऑरा" या विषयावर. मानवी शरीराभोवती असणारे वलय जे सामान्य डोळ्यांना दिसू शकत नाही परंतु "कर्लियन फोटोग्राफी" ने दिसू शकते. लेखकाने एक मुद्दा मांडला आहे की - २ व्यक्तींचे ऑरा काही बिंदूंना अगदी व्यवस्थित जुळतात तर काही बिंदूना "टँजेन्शिअल" छेदून जातात. जितके अधिक ते जुळतात तितकी आपल्याशी समविचारी अशी ती व्यक्ती असते. आणि जितक्या अंशात छेदून जातत तितकी आपली मते फारकत घेतात. मला या मुद्द्यात तथ्य वाटते. अगदी निकटच्या व्यक्तींशी देखील १००% कधीच पटत नाही.

कौस्तुभ "आयर्नमॅन" राडकर

लेखक श्रीरंग यांनी सोमवार, 27/06/2011 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
नाईस - फ्रांस येथे २६ जून रोजी पार पडलेली "आयर्नमॅन" ही ट्राएथ्लॉन स्पर्धा ११ तास ४६मि. इतक्या वेळेत पूर्ण करून पुण्याच्या कौस्तुभ राडकर याने ५०७ वा क्रमांक मिळवला. ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणारा तो आजपर्यंतचा एकमेव भारतीय ट्राएथ्लॉनपटू आहे. एवढेच नव्हे, तर ही अत्यंत कठीण स्पर्धा पूर्ण करण्याची ही त्याची चौथी वेळ आहे. आयर्नमॅन विषयी : आयर्नमॅन ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक समजली जाते.

अन... हात तुझा हातात.

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 27/06/2011 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
उधाणलेला समुद्र, बेफान लाटा, गार वारा, अन... अन... हात तुझा हातात. पौर्णिमेची रात्र, खिडकीखाली नक्षत्रांचा सडा पायी घेऊन उभा पारिजात, मंत्रमुग्ध सुगंध, अन... अन... हात तुझा हातात. पावसाची रिपरिप, अंगावर कोसळणाऱ्या सरी अथांग भिजलेलो मी, अन... अन... हात तुझा हातात थकलेला जीव, खोलीभर अंधार. एकटेपणाची बोचरी जाणीव, अन... अन... हात तुझा हातात घाबरलेलो मी, बिथर्लेलो मी, कुशीत डोकं ठेऊन रडणारा मी, अन... अन... हात तुझा हातात बागेत खेळणारी आपली छकुली, दुडक्या चालीने दवडणारी ती, कौतुकाने पाहणारा मी, अन... अन...
काव्यरस

खिद्रापूर चा कोपेश्वर मंदिर ( माहिति सोबत )

लेखक शाहिर यांनी सोमवार, 27/06/2011 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
खिद्रापूर : कृष्णा नदी तीरावर वसलेले सुंदर पण भग्न मंदीर .. या मे महिन्या मध्ये भेटीचा योग आला ..११ व्या शतकाच्या सुरुवातीला हे मंदीर शिलाहार राजा ( गन्दारादित्या , विजयादित्य आणि भोज २ रा ) कडून बांधण्यात आले .. पौराणिक कथा : देवी सती हि भगवान शिवाची पत्नी होती ..तिचे वडील राजा दक्ष यास भगवान शिव जावई म्हणून पसंत नव्हते .. दक्ष राजाने एकदा मोठा यज्ञ केला आणि शिव -सती ला बोलावले नाही ..सती ने याबद्दल राजा ला जाब विचारला असता त्याने शिवा चा अपमान केला ..ते सहन ना होऊन सती ने यज्ञा मध्ये उडी घेतली .. हे कळताच भगवान शिव क्रोधीत झाले ..आणि दक्ष राजा चा वध केला .. आणि कृष्णा तीरावर येऊन बसले ..तिथे भगवान विष्णू नी येऊन त्यांचा राग शांत केला .. म्हणून या मंदिरा ला "कोप + ईश्वर " कोपेश्वर म्हणतात .. विशेष म्हणजे या मंदिरा मध्ये नंदी नाही .. स्थापत्य : पूर्ण मंदिर ९६ हत्ती च्या पाठीवर कोरले आहे ..१०८ खांब आहेत तसेच कळसावर शिवलीलामृत कोरले आहे .. संपूर्ण मंदिर भर महाभारत आणि रामायणा मधले प्रसंग कोरले आहेत ..तसेच स्वर्ग मंडप ,यज्ञ मंडप (होमा चा धूर जाण्या साठी छत मध्ये उघडा गोल ठेवला आहे ) ..आणि गर्भ गृह आहे .. औरंगजेबा चा सरदार खैदर खान याने या मंदिरा ची तोड फोड केल्याचा ऐकण्यात आले .. आज हि हे मंदिर आपल्या प्राचीन वैभवाच्या खुणा जपत उभे आहे

इण्टरेस्टिंग गोष्ट

लेखक इरसाल यांनी सोमवार, 27/06/2011 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी कुठली गोष्ट कुठे जुळून येईल सांगता येत नाही. झाले असे की २४ जून ला ऑफिस मधे सहजच चाळता-चाळता एका फोल्डर मधे मागील वर्षाचे काही फोटो सापडले. तारीख होती २५ जून २०१०. नेमका ह्या दिवशी आमच्या मागच्या कंपनीत एच. आर. चा पाठवणी कार्यक्रम होता. त्यावेळी हजर असणार्‍या सगळ्यांना म्हणजे हेडना फोन लावला कारण आम्ही बहुसंख्य तिथून आधीच कटलो होतो. सगळे एकदम खुश, बोलले की पुन्हा एकदा मागील वर्षी जिथे भेटलो होतो तिथेच भेटूया. थोडीफार फोनफोनि करून जागा ठरवली. डि. एस. ओ. आय. धौला-कुआ, नवी दिल्ली. तुम्ही मिलीटरी किंवा तत्सम पाठबळचे नसला तर डि.एस.ओ.आय. मधे तुम्हाला प्रवेश नाही.

(हिंदूंना एकत्र आणणारी विश्व हिंदू परिषद).

लेखक नितिन थत्ते यांनी सोमवार, 27/06/2011 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
. . . प्रेरणा आज ओळख करून घेऊ, भारतात जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व हिंदूंना एकत्र आणणारी विश्व हिंदू परिषद. इतिहासात पाहिले असता, महात्मा गांधींच्या खुनानंतर हिंदुत्ववादी लोकांना भारतात तोंड दाखवायला जागा उरली नाही. त्यांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सर्वसामान्य हिंदू घटनेत समावेश केलेल्या पुरोगामी तरतुदींकडे आकृष्ट होऊ लागला होता. पुराणमतवादी हिंदुत्ववाद्यांना असलेला हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी नेहरूंच्या मृत्यूनंतर लवकरच स्वामी चिन्मयानंद यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना पवई मुंबई येथे १९६४ मध्ये केली.