Skip to main content

...तर सौदीत कुमारी राहणार नाहीत

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 04/12/2011 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑन लाईन म.टा. वाचताना अजून एका बातमीने लक्ष वेघले. त्या बातमीतील जावईशोध वाचून मी उडालो. त्यात म्हणले आहे "स्त्रियांनी वाहन चालविले तर सौदी अरेबियात एकही कुमारी महिला शिल्लक राहणार नाही, असा विचित्र दावा सौदी अरेबियातील 'मजलिस अल-इफ्ता अल-आला' या सवोर्च्च धार्मिक संस्थेने एका अहवालात केला आहे. वाहन चालविण्यासाठी स्त्रियांवरील बंदी शिथील केली, तर अनेक स्त्रिया आणि पुरुष समलिंगी बनतील किंवा पोनोर्ग्राफीकडे वळतील, असाही दावा या तथाकथित अहवालात करण्यात आला आहे. आपला अहवाल 'वैज्ञानिक' असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

चेतना

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 04/12/2011 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
विस्तीर्ण नभावर मेघदळे घनदाट पवनास न बंधन धावतसे फुंफाट क्षितिजास फडकल्या भोर ध्वजा कनकाच्या नांदी दिवसाची उगवे रमल पहाट तिमिरास किनारी कांचनमय अल्हाद भरल्या अंबरभर पुन्हा नव्या अभिलाषा तो अथक प्रवासी चाले आपली वाट पल्लवीत कुसुमे जीवन; नवओघात सृजनाचे दालन; उमले रोज प्रभात चेतना सकल हृदयात; चेतवी वात दुरितांस ऊब तरुछाया कधि अपघात चिरअनंत चाले योगभारला संवाद मी अंश तयाचा आक्रमतो एकांत विसरतो कसा मग मावळणे अभिजात जे ज्यास हवे ते द्यावे आपल्या हातांनी उत्तुंग वागणे राहिल चिरस्मरणात ............................अज्ञात
काव्यरस

चॉकलेट हिरो देव आनंद यांचे निधन.

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 04/12/2011 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच ऑन लाईन म.टा मधे बातमी वाचण्यात आली. सदाबहार देवानंद काळाच्या पडद्याआड सदाबहार, चिरतरुण, चॉकलेट हिरो असे ज्यांचे वर्णन केले जायचे ते ज्येष्ठ सिनेअभिनेते देवानंद यांचे लंडन येथे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अखेरच्या क्षणी देवानंद यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुनील आनंद होता.

दिग्गजांची ओळख :- छत्रपती शिवाजी

लेखक मन यांनी रविवार, 04/12/2011 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या एका स्थळावर एका चर्चेत शिवाजी महाराजांबद्द्ल काही बोलणे सुरु असताना एका प्रतिसादात शिवाजी महाराजांचा एक प्रोफाइलच तयार झाला. त्यांच्या बद्दल लघुनिबंध म्हणता येइलसा किंवा संक्षिप्त परिचय म्हणता येइल असा तो आहे.

परीणाम ( गफलत भाग २ )

लेखक चाफा यांनी रविवार, 04/12/2011 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
निषाद देवनार यांच्या डायरीतून : आदित्य, माझा खास मित्र, सध्या काहीतरी सैरभैर झाल्यासारखे वागतो. एकदम नक्की सांगायचं झालं तर तो त्या `झांबीडी' नावाच्या गावाला जाउन आल्यानंतरच. त्याच्या लेखाला योग्य तो प्रतीसाद न मिळाल्यामुळे असु शकेल कदाचीत. आणि तसं असेल तर त्यात अशक्य असं काही नाही कारण आपल्या लेखाच्या प्रसिध्दीसाठी कुठे कुठे फ़िरला हा माणुस.... पण त्याला योग्य न्याय मिळाला नाहीच. त्या दिवशी मी त्याच्याकडे गेलो तेंव्हाच त्याची अवस्था पाहुन मला वाईट वाटले. खरोखर उत्तम आणि अभ्यासपुर्ण लेखन असते त्याचे अर्थात त्याची मेहनतही तितकीच असते त्या मागे.

भेट !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 03/12/2011 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
भेट ! ३० जून १९४३. बॅलार्ड पिअरच्या पोस्टऑफिसच्या समोर जो रस्ता आहे, तेथे तो पोलीस नेहमीप्रमाणे करडी गस्त घालत होता. खांद्यावरच्या तार्‍यांनी तो एक आधिकारी आहे हे सहजच लक्षात येत होते. तसा रस्त्यावर शुकशुकाटच होता. पण त्याला काय फरक पडणार होता म्हणा. तो त्याचे काम सवयीने चोख पार पाडत होता. रात्रीचे १० वाजायला आले होते आणि हवेतला गारठा ही उत्तरेकडे झुकत होता. समुद्रावरचे गार वारे सुटले होते आणि पावसाच्या शक्यतेने त्या रस्त्यावर नेहमी असणारे नेहमीचे लोकही आज गायब होते. दरवाजांकडे लक्ष देत स्वारी हातातील दंडुका मधेच गरागरा फिरवत डौलात चालली होती.

मन

लेखक navinavakhi यांनी शनिवार, 03/12/2011 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
मनात गुंतते मन .. जनन अन मरण अभिलाषेच्या हिंदोळ्यावर चढणं अन उतरणं गुंतलेल्या मनाला आता सावर पुढे अवघड असेल वळण भावनांच्या पुराला आवर दुःखाचे अन्यथा हेच होई कारण मन होईल कावरं बावरं पण ऐक सांगते हेच असे जगणं !!

भोलू गोपाळाची गोष्ट

लेखक हरिकथा यांनी शनिवार, 03/12/2011 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
वृंदावनातल्या श्रुंगारवट या स्थानी नित्यानंदवंशीय श्रीनंदकिशोरदास गोस्वामी यांचा आश्रम आहे. त्यांच्याकडे त्यांच्या गायींच्या देखभालीसाठी भोलू नावाचा एक ब्रजवासी मुलगा राहत होता. भोलू हे काही त्याचं खरं नाव नव्हतं पण लोकं या गुराखी मुलाला भोलूच म्हणायची कारण तो स्वभावाने अतिशय भोळा होता. त्याच्याजवळ फारशी व्यावहारिक चतुराई नव्हतीच पण बुद्धीनेही तो अगदीच सामान्य होता. कुणी त्याला मस्करीतही काही गोष्ट सांगितली तरी तो ती खरी मानायचा. शंकेखोरवृत्ती तर त्याच्याजवळ नावालाही नव्हती.

साडेसाती

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शनिवार, 03/12/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
साडेसाती अजून काय लिहायचं? हे नावच इतकं महान आहे.. . इथे साडेसातीबद्दल सगळी चर्चा असावी. १. साडेसाती आणि शनी २. साडेसातीची कारणे ३. या कालात काय होते? ४. साडेसातीवर उपाय व शनी उपासना कशी करावी? ५. इतर काही धर्मिक उपाय ६. आपले काही अनुभव, किस्से ७. सध्या साडेसाती कुठल्या राशीना आहे? अशा समदु:खी लोकानी काय करावे? ८. साडेसातीचे एकंदर जीवनावरील दूरगामी परिणाम. ९. साडेसाती सत्य की थोतांड १०. इतर धर्मातील लोकाना साडेसाती लागते का? असे आणि या विषयी असलेले इतर अनेक मुद्दे विचारात घेता येतील.

भीती

लेखक जयनीत यांनी शनिवार, 03/12/2011 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
बंदिस्त पिंज-यात वाघ दुखा:त दिवस कंठीत होता . किती काळ झाला आपल्याला इथे येऊन ? आलो तेव्हा पानगळीचे दिवस होते . त्यानंतर दोनदा पाऊस येऊन गेला , आता तर पुन्हा पावसाचे दिवस येण्याची लक्षणं दिसताहेत . बाप रे ! बराच काळ झाल की आपल्याला . किती सुंदर दिसायचं आपलं रान पावसाच्या दिवसात , हिरवगार ! अन इथे ! इथल्या वृक्षांना रानातल्या वृक्षांची सर कुठून येणार ? त्यांचे बुंधे किती डेरेदार ? किती तरी पक्षी त्यांच्या आंगाखांद्यावर खेळायचे ? अन ती खोडकर माकडं ! किती किती गंम्मत होती त्या रानात .