Skip to main content

राज ठाकरेंचं मौन?

लेखक अविकुमार यांनी गुरुवार, 10/01/2013 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या ४-५ महिन्यांपासून राज ठाकरे 'जरा' शांत वाटताहेत. विशेषतः राज्यातील सरकारविरुद्ध त्यांनी 'ब्र'सुद्धा काढलेला नाहीये. कधीतरी 'बिहारी' म्हणून ओरडतात पण त्यातही पूर्वीसारखा 'दम' नाही वाटत. मी मनसेच्या सुरुवातीपासून 'मनसे'चा प्रशंसक राहिलो आहे हे ईथे मुद्दाम नमुद करावे वाटते, नाहीतर निव्वळ कुरापत काढण्यासाठी काढलेला धागा अशी माझी संभावना व्हायची. मला राजकारणातलं फार काही कळत नाही. तरीही माझ्या अल्पमतीनुसार काही संभाव्य कारणांचा अंदाज केला. १. काका गेल्याचे दु:ख ?(शक्यता फारच कमी आहे) २. काकांनी जाण्यापुर्वी काही विनंती केली का? (शिवसेना आणि उद्धवसाठी) (अगदीच फिल्मी वाटतंय) ३.

दुर्गम दुर्ग - देवगिरी!!

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 10/01/2013 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
"दौलताबादही पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतू तो उंचीने थोडका, रायगड दौलताबादचे दशगुणी उंच." महाराजांनी आपली राजधानी रायगडावर हलवण्याआधी सभासदाने रायगडाची आणी दौलताबादेच्या किल्ल्याची केलेली तुलना!! औरंगाबाद दौर्‍याच्या आधीच्या दोन दिवसात आम्ही अजिंठा आणि वेरूळ केल्यानंतर तिसरा आणि शेवटचा दिवस आम्ही देवगिरी या अद्भुत दुर्गासाठी राखून ठेवला होता. मग ठरवल्याप्रमाणे सकाळी ८ वाजता औरंगाबाद सोडलं आणि अर्ध्या-पाऊण तासात देवगिरीच्या पायथ्याला पोहचलो. औरंगाबादपासून वेरूळला जाणार्या रस्त्यावर साधारण १०-१५ किमी गेलं कि डाव्या बाजुला शंखासारख्या आकाराचा देवगिरीचा डोंगर दिसतो.

पुन्हा एकदा पाकिस्तान

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 09/01/2013 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तान शत्रु असला, जरी तो आपल्या देशात अतिरेकी पाठवत असला तरीही ते त्या देशाचे राष्ट्रिय धोरण आहे आणि त्याचा संबंध त्या देशातील कलावंत आणि खेळाडु यांच्याशी जोडु नये अशी सहिष्णु व मानवतावादी, कला-क्रिडा प्रोत्साहक भूमिका मांडलेली दिसते. पाकिस्तानी खेळाडुंना इथे येण्यास वा पाकिस्तानी कलाकारांना इथल्या सिने/ करमणुक क्षेत्रात काम करु देण्यास विरोध करणार्‍यांना संकुचित म्हटले जाते. कालची बातमी हादरवणारी आहे. वैमनस्य असलेल्या दोन राष्ट्रात चकमकी घडणे समजण्यासातखे आहे. मात्र रानटीपणे हल्ला करुन सैनिकांचे शिरच्छेद करणे व शिर कापून नेणे हे कसले द्योतक आहे?

चिकन खिमा पराठा

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 09/01/2013 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः चिकन खिमा - १/२ किलो (चिकनच्या thigh meat चा खिमा केल्यास जास्त चांगले) मैदा - २ वाट्या कांदा - १/२ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो - ३ चमचे बारीक चिरुन दही - ३ चमचे आले-लसुण पेस्ट - १ चमचा हळद - १/२ चमचा लाल तिखट - २ चमचे गरम मसाला - १ चमचा चाट मसाला - १/२ चमचा हिरवी मिरची - २ बारीक चिरुन कोथिंबीर - २ चमचे बारीक चिरुन मिठ चवीनुसार कृती: १. चिकनच्या thigh meat चा मिक्सर मधे खिमा करुन घ्यावा. २. मैद्यामधे चवीपुरते मिठ, १ चमचा तेल टाकुन निट मिक्स करुन घ्यावे. लागेल तसे गार पाणी वापरुन त्याची मऊ कणिक मळुन झाकुन ठेवावी. ३. कढईत तेल गरम करावे.

दगड्या !

लेखक तर्री यांनी बुधवार, 09/01/2013 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
कवडा हया पक्ष्याचा संदर्भ आज खूप वर्षांनी आला आणि भूतकाळात घेवून गेला. मी ८ वीत असताना तुकाराम ( उर्फ तुक्या दुसरे उपनाम दग्ड्या ) हा एक काळाकभीन्न व मजबूत गडी आमच्या वर्गात दाखल झाला. मिसरूड फुटलेला हा पोरगा बाप्या शोभत असे. त्याच्या गावात ७ वी पर्यन्त शाळा होती आणि म्हणून सुमारे दहा की.मी. वरून चालत तुक्या आमच्या गावातील शाळेत येत असे.घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. तो त्याची आई आणि इतर ३ भावंडे . घरात कमावणारे कोणी नाही. वडील त्याच्या लहानपणीच वारले होते.बहुतेक हे कुटुंब १ वेळच जेवायचे.

ड्रॅगनच्या देशात १४ - ली आजीची भेट, मास्टर यांग ची शाळा आणि चेंगदूचे जायंट पांडा केंद्र

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी बुधवार, 09/01/2013 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५...

विचारमैथुन १ - डॉक्टर सान्यांची न्यूज

लेखक खान यांनी मंगळवार, 08/01/2013 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
या धाग्याचं शीर्षक औपरोधिक असलं तरी धागा पूर्ण सिरीयस आहे. बर्‍याच वेळा एखाद्या प्रश्नाबद्दल आपली नक्की काय भूमिका आहे हे आपल्याला ठरवता येत नाही. अशावेळी एक हायपोथेटिकल सीनारिओ बनवून त्या प्रसंगात आपण काय करू, असा प्रश्न स्वतःलाच विचारला तर कदाचित आपल्या मनातला गोंधळ निस्तरायला मदत होऊ शकते/शकेल. या धाग्यात असाच एक सिनारिओ कल्पला आहे. समलिंगी संबध पूर्ण वैध की अवैध, याबद्दल आपल्यापैकी काहींच्या मनात संशय येत असतो. एका बाजूला समलिंगी संबंधांचे पूर्ण समर्थन करणारे लोक, तर दुसर्‍या बाजूला स. सं.

हरवला आहे...

लेखक रविंद्र रुपन् यांनी मंगळवार, 08/01/2013 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
शासनसंस्था, विद्यापीठे,कुटुंबसंस्था आणि ह्या सगळ्यातून उद्भवलेली एक राक्षसी महत्त्वाकांक्षा ह्यांनी प्रयत्नपूर्वक आपल्या प्रत्येकात दडलेल्या रॅंछोला पार पाताळात दडपून टाकले आहे. त्याला आपण कधी शोधणार?
साऱ्या आयुष्याचा घोळ झाला आहे. कशाचाच अर्थ लागत नाही. चांगली कचकचून भूक लागलेली असावी. समोर वाफाळलेल्या नूडल्सची प्लेट यावी अन् कुणी आपल्याला सांगावे की तुला ते खाता येतील, पण एका शर्तीवर. ह्यातील एकेक नूडल वेगळी करून, काट्याभोवती लपेटून किंवा काड्यांनी वेचून खायची. नूडलचे एक टोक आपल्यासमोर, दुसरे कुठे आहे कळतच नाही. वेळ वाया जातो आहे, काय करावे सुचतच नाही.

"माझ्या सर्व विध्यार्थी मित्रांसाठी"

लेखक शिवप्रसाद यांनी मंगळवार, 08/01/2013 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
"माझ्या सर्व विध्यार्थी मित्रांसाठी" (माझी पहिलीच कविता ) ऊठ मुला झडकरी आळस टाक झटकून | परिक्षा येता जवळी वेळ जाईल निघुन || करायचे आहे आईवडिलांचे स्वप्न साकार | तुझ्या शिवाय त्यांना नाही कोणाचा आधार | अभ्यास करि चांगला लाउनी मन | परिक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन || आईवडीलांनी तुझ्यासाठी कष्ट केले अपार | प्रसंगी फक्त तुझ्याचसाठी सोसली उपासमार | शिक्षणाकडे लक्ष दे देऊनी ध्यान | परीक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन || ठेच लागता तुझ, जीव त्यांचा तळमळे | आता तरी सोडुन दे तुझे ऊनाड चाळे | तुला करायला हवे अभ्यासात एकाग्र मन | परिक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन || जिवनात असंख्य परिक्षा द्याव्या लागतात