Skip to main content

भारतीय प्रसिद्धी माध्यमांचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता

लेखक विकास यांनी शुक्रवार, 11/01/2013 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्ली मधील अत्यंत दुर्दैवी घटनेचे भारतातल्याच काय पण जगभरच्या प्रमुख माध्यमांनी प्रसारण केले आणि बहुतांशी ते योग्यच पद्धतीने केले. पण जस जसे मूळ बातमीचा जोर ओसरू लागला तस तसे भारतीय माध्यमांना राजकीय-सामाजीक नेत्यांमुळे खाद्य मिळू लागले. यात कोणत्या पक्षाची व्यक्ती काय म्हणाली या बद्दल बरेच लिहीता येईल. मात्र माध्यमांचा वादग्रस्त सहभाग हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक मोहनजी भागवत यांना ज्या पद्धतीने गोवले त्यावरून झाला आहे... आता सर्वप्रथम, सर्वांना संघाचे कार्य, ध्येय-उद्दीष्ट, मान्य असायला हवे वगैरे म्हणणे नाही हे स्पष्ट करतो.

"ते" - ६

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 11/01/2013 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
"ते" -१ "ते" -२ "ते" -३ "ते" -४ "ते" -५ एक तरुण जीव घेऊन पळत होता आणि त्याच्या मागे एक विचित्रच जनावर सुटलेलं होतं. आम्ही दोघेही पुढे धावत आल्यावर ते थोड बिचकलं, अंधारात ते नक्की काय आहे ते कळत नव्हतं. उंच, काटकुळं. फुसफुसण्याचाही आवाज येत होता. ते पुढे येण्याचा प्रयत्न करत होतं. तो तरुण आमच्या पायाशी येऊन पडलाच.

पिठल्याची पुरी

लेखक त्रिवेणी यांनी शुक्रवार, 11/01/2013 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- उरलेले पिठले- मी 1 ½ वाटी घेतले, जिरे – ½ चमचा तीळ- ½ चमचा ओवा- ½ चमचा गव्हाचे पीठ- आवशकतेनुसार मीठ- चवीनुसार तेल- तळण्यासाठी कृती- पिठल्यात जिरे, ओवा, तीळ, मीठ घालावे. या सर्व साहित्यात मावेल इतके गव्हाचे पीठ घालून घट्ट मळावे. 10-15 मिनिटे झाकून ठेवावे. कढईत तेल कडकडीत गरम करून पुर्‍या तळाव्यात. (मी उरलेले पिठले बाजरीच्या पिठ + चवीपुरते मीठ मिक्स करून मळून घेते व त्याची भाकरी करते, ते जास्त छान लागते) a

अक्षर

लेखक इनिगोय यांनी शुक्रवार, 11/01/2013 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्कामाचं ठि़काण ठाऊक नसतानाही चालत होते. आजूबाजूला सगळी अनोळखी गर्दी असतानाही चालत होते. सावलीचा स्पर्श तर कोण जाणे अखेरचा कधी झाला होता! पावलांनी चालायचं इमान सोडलं नाही म्हणून वाट सरत होती. इतकंच. आणि अचानक वाळूत अक्षरं उमटलेली दिसली. ती लिहिणारा हात कोणाचा आहे, हे उरलीसुरली ताकद एकवटून पाहायचा यत्न केला. पण दिसलं काहीच नाही. तरी कुणीतरी आहे असं भासलं. वाळूवरच्या अक्षरांची का होईना सोबत तर लाभली. तळावलेले डोळे कितीतरी काळाने किंचित शांत झाले. नजरेला काहीतरी वेगळं दिसलं. त्या लिहित्या हाताला आपसूकच उत्तर दिलं गेलं. तसंच. वाळूत अक्षरं रेखाटत. आह..!

जुन्या काळातील गोष्ट

लेखक अनिल तापकीर यांनी शुक्रवार, 11/01/2013 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
साऱ्यांची घरट्यात परतण्याची वेळ ,म्हणजे शेतकऱ्यांची शेतातून, गुरांची रानातून ,पक्षांची आकाशातून, मुलांची शाळेतून आदी,तर अश्या सांजवेळी आम्ही सारी पोरं सुताराच्या ओट्यावर जमायचो आणि तिथे चार पाच म्हातारे बसलेले असायचे.म्हणजे पत्ते कुटीत बसायचे आम्ही पोरं तिथं गेलो कि ते आम्हाला जागा करून द्यायचे.

आता तरी मानवा सावध होशील का ?

लेखक शिवप्रसाद यांनी गुरुवार, 10/01/2013 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
आता तरी मानवा सावध होशील का? मानवतेच्या धर्माला जागशील का? चराचर नि जीव ईश्वरे निर्मिले । त्यामध्ये बुद्धिमान कोणी न दिसले । ईश्वराने मग ध्यान लाविले । मानव रूप आकारासी आले । तुझ्या रूप-गुणांसी भुललास का? आता तरी मानवा सावध होशील का? विश्वामध्ये सर्व जीव अज्ञानी । म्हणुनी तुजला केले बुद्धीमानी । परी चाले तुझीच मनमानी । तुझ्या निर्मात्यास तूच न मानी । जन्मदात्यास तरी तू मानशील का? आता तरी मानवा सावध होशील का?

प्रांतिक किंवा भाषीय वाद

लेखक पंकज रुगे यांनी गुरुवार, 10/01/2013 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
बिहारींना होतोय बिहारचा भास सरदारांनी घेतलाय पंजाबचा ध्यास मराठ्यांनी धरलीय महाराष्ट्राची कास कोंडतोय यात एका भारतीयाचा श्वास ... आजोबांनी लढली स्वातंत्र्याची लढाई बाबांनी लढली धर्माची लढाई आपण लढतोय प्रांताची लढाई मुले लढतील त्यांच्या भागाची लढाई... शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या थांबेना महागाईचा फुगा आटोक्यात येईना अन्यायाविरुद्ध कोणी संघर्षही करेना प्रांताच्या नावाखाली एकमेकांचा जीव काही सोडेना... दहशतीचा काळ काही केल्या थांबेना सीमाही आता सुरक्षित वाटेना विदेशी कंपन्यांची मक्तेदारी मोडेना तरीसुद्धा आपण प्रांत काही सोडेना... सगळ आता कळतया पण मन मात्र वळेना विचार आपला बदलतोया पण कृत

डीझेल दरवाढ्,महागाई ई. संबंधी चाललेल्या विविध ३ चर्चा- तुमचं मत अपेक्षित ..

लेखक १००मित्र यांनी गुरुवार, 10/01/2013 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी ९-१५ – ग्रुप क्र. १ “हल्ली कोण पण गाड्या घेतं राव” “अरे, जागा विकून पैसे आलेले असतात ना !” “बरोबर आहे १ रू चे १ कोटी मिळाल्यावर काय व्हायचं” “पण सगळे दारू, किंवा पनवेल ला जातात हे पैसे , माहितिये ?” “हं.. इनव्हेस्ट्मेंट्चं नॉलेजच नसतं यार ह्यांना” “जागाच विकतात फटाफ़ट, सोनं का नाही घेत कुणास ठाऊक” “त्यांचं ठीक आहे रे, पण आपल्यासारख्यांनी काय करायचं ?” ——————————————————————– १०-१५ जिम :- ग्रुप क्र. २ :- “काय बरेच दिवसांनी … “जरा कामात होतो… “चांगलं आहे, म्हणजे कामं पाहिजेतच हो “!” “नाहीतर हल्ली अवघडच आहे ना! “५०,००० रू सुद्धा पुरायचे नाहीत. “हो , हो. “घरचा खर्च, इ.एम.आय.