ही नारायण मूर्ती ?
नारायणमूर्ती इन्फोसिस मध्ये परत आले अशी बातमी अत्ताच TV वर पाहिली
भारत हा अत्यन्त दांभिक देश बनत चालला आहे त्याचे हे उदाहरण
नारायणमूर्ती यांच्या कर्तृत्वाबद्दल मी बोलावे इतके कर्तुत्व माझ्यागाठी नाही
मी त्याबद्दल बोलतच नाही
इन्फोसिस मधे किती वर्षापर्यंत काम करता येते या बद्दल नियम आहेत ना ?
माणूस कितीही कर्तृत्ववान असला तरी त्याला काम करणे कधीतरी थांबवावे लागतेना ?
इन्फोसिस आत्ता आहे इतकीच मोठी करणे ही नारायणमूर्ती यांच्या कर्तृत्वाची मर्यादा होती असे म्हणताना मला त्यांच्या या मर्यादा बद्दल बोलावयाचे नसून त्यांनी किती मोठी कंपनी उभी केली एवढेच दर्शवावयाचे आहे
नारायणमूर्ती इन्फोसिस बाहेर गेले
(छोटीशी का होईना) फसवणूक.. ईशारा.
काल अलिबागहून परतताना पेण पनवेल दरम्यान (गोवा महामार्गावर) एक कामत चे हॉटेल आहे. तिथे मगनलाल चिक्कीचे दुकान आहे. तिथून Assorted Dryfruit चिक्कीचा box १७५ रुपयांना घेतला (Dryfruit म्हणून इतका महाग). घरी येउन पुडा फोडला तर फक्त एक ३"x २" चा एक तुकडा dryfruit चिक्कीचा. बाकी मोठे तुकडे खोबऱा चिक्की आणि शेंगदाणा चिक्कीचे. इतका संताप झाला जीवाचा फसवणुकीच्या भावनेमुळे … %&^*($. कोणी गेलाच त्या दुकानात तर कृपया तुमच्या भावाची हि हकीकत सांगून दोन शब्द बोलून घ्या xxला आणि तुमचा माल घेताना पारखून घ्या हे वेगळे सांगणे न लागे . . As much as possible please avoid this shop. For Everyone's Information.
उंदीर मांजराचा खाऊ
उंदीर मांजराचा खाऊ
एकदा थंडी वाजते म्हणून
एका माऊने केली गाऊ
तेथला उंदीर मनात म्हणाला
आता गुपचूप खाऊ खाऊ
खाऊ होता माऊसमोर
धीर केला उंदराने
हळूच गेला चालत चालत
मांजरीकडे पाहीले त्याने
खाऊचा वास त्याने घेतला
सुटले पाणी तोंडाला
खाऊ न द्यायचा कोणाला
विचार त्याच्या मनातला
डोळे मिटून सताड पडली
अंग चोरून मनी
मिटक्या मारीत खायचा खाऊ
उंदराने स्वप्न पाहीले मनी
होती निसरडी घराची फरशी
तीवरून त्याचा पाय सरकला
आवाजाने माऊ जागी झाली
आयता खाऊ तिला मिळाला
- पाभे
आपल्याला राष्ट्रीय चारित्र्य आहे का ?
हि १९९९ च्या मी महिन्यातील गोष्ट आहे.मी विशाखापटणमच्या नौदलाच्या कल्याणी या रुग्णालयात काम करीत होतो. कारगिलचे युद्ध ऐन जोरात होते. त्यावेळेला काश्मीरच्या लष्करी रुग्णालयात युद्धात जखमी झालेले जवान मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत होते त्यामुळे ती रुग्णालये(श्रीनगर, उधमपूर आणि जम्मू येथील) भरून गेली होती.त्यातून त्या जखमी रुग्णांचे नातेवाईक तेथे येऊ लागले होते. या सर्व गर्दीमुळे तेथील व्यवस्थेवर ताण पडू लागला होता. म्हणून आता नंतर येणाऱ्या रुग्णांवर जलदगतीने उपचार करण्यासाठी वैद्यकीय प्रशासनाने एक निर्णय घेतला कि जे जे जवान प्रवास करू शकणार होते आणि ज्यांची जायची तयारी होती.
श्रामो: मनस्वी जगणारा अवलिया!
अत्यंत वाइट बातमी : आमचे काही वर्षांपासूनचे निकटचे मित्र श्रावण मोडक हे आता या जगात राहिलेले नाही.
अगदी पाच मिनिटांपूर्वी धुळ्याहून निखिल सूर्यवंशी (सकाळ) यांचा एसएमएस आला. फक्त चारच शब्द; ‘श्रावण मोडक पास्ड अवे’ मी हादरलोच. अतिशय दु:खद संदेश. किती वाइट बातमी. त्यानंतर पुण्याहून दीपक मुणोतनेही ही बातमी कळविली. अगदी चार दिवसांपूर्वीच माझी निखिलशी भेट झाली होती, तेव्हाही श्रावण हाच चर्चेचा केंद्रबिंदू होता.
काही कामानिमित्त घाटकोपरला असताना काल सायंकाळीच श्रावणला हृद्यविकाराचा झटका आला. आज सकाळी पुन्हा दुसरा झटका आला. मधुमेहाचा त्रास असलेल्या श्रावणला सलग असे हे दोन झटके पचविता आले नाहीत.
श्रावण मोडक - काही मोडक्यातोडक्या नोंदी
श्रावणची पहिली ओळख झाली ती आंतरजालावरूनच, आणि तीही दुरूनच, म्हणजे एखाद्या धाग्यात आलेल्या प्रतिसादापुरती; खरडी, व्यनिंतून वगैरे नाही. आंतरजालावरच्या वावरावरून एखाद्या व्यक्तीविषयी फारसे आडाखे बांधायला मला अावडत नाही. कारण एखाद्याचं लिखाण आवडलं म्हणून व्यक्तीशी जुळेल असं नाही; आणि लिखाण खास वाटलं नाही म्हणून व्यक्तीशी संवाद होणार नाही असंही नाही. तरीही आडाखे बांधले जातातच. त्यात आंतरजालावर पुष्कळ तथाकथित लेखकांची उगीचच आणि गरजेपेक्षा फार जास्त स्तुती केली जाते असाही माझा अनुभव होता.
अमानवीय-काही उत्तरे
काही उत्तरे या भागात मागील भाग http://www.misalpav.com/node/24838 तील काही प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न. यातुन भुत आणि मानवात स्नेह वाढुन एक दिवस हा स्नेह भारत-पाकिस्तान मैत्रीलाही मागे टाकेल याची खात्रीच आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
भुतांची सायकॉलॉजी थोड्याफार प्रमाणात माणसांसारखीच आहे. उदा. आपल्यात कोणी गल्ली चुकलं की लोक स्वत:हुन म्हणतील, "काय ब्वा, हिकडं कसं काय?" तसच भुतांमध्येपण आहे. आपण त्यांच्या एरीयात गेलो की आलेच ते आपली चौकशी करायला.
मिसळपाव