Skip to main content

भान

लेखक mohite jeevan यांनी रविवार, 29/12/2013 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
'हे बघा तुमची मुलगी खुपच वेगळी वागते,'सासु म्हणाली, 'तुम्हाला म्हणायचे नेमके काय?एवढे दिवस काही नव्हते बरं ती काय नविन आहे का?,'मुलीचा बाप बापु म्हणाला, 'आता पर्यत खुप सहन केली, आता या पुढे जमणार नाही,'महेश मध्येच म्हणाला, 'बापु ह्याचं काही एकु नका हे तुमच्या समोर एक बोलतात आणि माघारी माझ्या समोर एक वेग़ळच बोलतात,'मुलग़ी ग़ीता म्हणाली, 'हो हो हो तुझावरच विश्वास ठेवतील बघ,शेवटी तुझा बाप,'सासु म्हणाली, 'आहो तसे नव्हे,दोघांचंही ऐकुण घेतोच की ,हे बघा महेशराव आतापर्यत देवाच्या आशिर्वादान ग़ोडी ग़ुलाबीन चालु होत, हो की नाय,'बापु हात करत, 'मग़ ह्या दोघाचं आता का पटंना?कारण दोघांनी ही एकमेकांना समजावुन घेत

भटकंती १

लेखक इन्ना यांनी रविवार, 29/12/2013 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
भटकंती -१ लहानपणी सायकल चालवता यायला लागली तो माझा पहिला प्रवास! आपापलं, मनसोक्त, अकारण भटकणे!! हळूहळू त्या प्रवासाची म्हणा, अथवा अनुभवाची, चटकच लागली. शाळेतून येताना, पुणे ३० ते गुलटेकडी, रोज नवीन रस्ता असो, वा गडकिल्ले असो, आजीच्या गावाला म्हशींच्या मागे जाणे असो वा शाळेतून गुंजवणी खोर्‍यात विविध उपक्रमांसाठी जाणे असो.

अंथर

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 29/12/2013 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
धुके सभोवर चराचरावर दोघे कातर एकांतावर गूढ वेदना हृदयी अनवट खोल कुठे निश्वास अनावर काळ दाटला पडद्यापाठी स्मरण अडखळे प्रतिमा धूसर शब्द स्तब्ध प्रतिबिंब आभासे; संरचना कांचेचे झुंबर लोलक फिरवी तरंग गहिरे द्वैत विचारांचे मन संगर ताल आडाणे अवघडलेले रान दुंदुभी वणवा मंथर आहे नाही संभ्रम अवघे सहवासाचे दुर्लभ अंथर उलाल रेषा अगतिक निष्फळ जुळवू पाहे समान अंतर …………………………. अज्ञात
काव्यरस

बिंब आणि प्रतिबिंब

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 29/12/2013 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
सहज वाटलं जीवनाची वाट चालताना एक प्रसन्न, सुंदर, सुगंधित फूल द्यावं तुला आणि तुझ्याकडे पहातच राहावं, तू ते फूल पहात असताना आणि मनातल्या मनात सांगत रहावं काळ पुरुषाला थांब, जरा थांब, अरे थोडासा तरी थांब का रे सतत घड्याळाचे काटे पुढे ढकलत रहाण्याची घाई तुला? असेच सतत राहू दे ना पहात मला बिंब आणि प्रतिबिंब, बिंब आणि प्रतिबिंब

लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य

लेखक माहितगार यांनी रविवार, 29/12/2013 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी अलिकडे पर्यंत गीतारहस्य म्हणजे लोकमान्य टिळकांनी लिहिलेला ग्रंथ एवढच सामन्यज्ञान होत.पण एकेकाळी ह्या ग्रंथाने विक्रिचे तत्कालीन विक्रम केले असावेत असे वाटते. लोकप्रभा साप्ताहीकातील एका लेखात डॉ.यशवंत रायकर यांनी, '१९१५च्या जून महिन्यात प्रसिद्ध झालेल्या गीतारहस्याच्या सर्व प्रती संपल्यामुळे लगेच सप्टेंबर महिन्यात पहिले पुनर्मुद्रण करावे लागले.' अशी माहिती दिली आहे.या ग्रंथाचा जो भाग (बहुधा शेवटील भाग) ऑनलाईन उपलब्ध झाला ते १९२४ सालचे पुर्नमुद्रण आहे त्यावर ५००० प्रती असा आकडा आहे.

तुमको देखा तो ये खयाल आया …

लेखक निमिष ध. यांनी शनिवार, 28/12/2013 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
एक गरीब मध्यममार्गी विद्यार्थी, आपले एम ए चे शिक्षण घेणारा. छंद म्हणून शायरी करणारा. आपल्या घरापासून दूर कॉलेज असणाऱ्या शहरात राहणारा. नेहमी चहासाठी कॅन्टीन मध्ये दोस्तांबरोबर गप्पा मारत बसणारा. त्या नायाकामध्ये आणि आमच्यात खूप साधर्म्य होते कॉलेज जीवनात त्यामुळे की काय पण इतर बी ए पास आणि नुसत्या गाड्या उडवणाऱ्या हिंदी चित्रपट नायकांपेक्षा तो खूप जवळचा वाटायचा. जरी त्याच्या चित्रपटांत आणि आमच्या कॉलेज जीवनात एक-दीड पिढीचे अंतर होते तरीही तो जणू आपले प्रतिनिधित्व करतो आहे हे पाहून बरे वाटायचे.

गपचिप

लेखक आतिवास यांनी शनिवार, 28/12/2013 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमची आई येकदम वाईट. च्या काय देत नाही कदी. ही मोटी मान्सं बरी च्या पित्यात. आमाला मात्र न्हाई. आण्णा म्हन्त्यात, “चहा नको पिऊ; काळी होशील.” त्यादिशी पाटीलकाका आल्ते. आई च्या दिऊन बोलत बसली तितचं. मला म्हन्ली, “बेटा, तेवढी कपबशी आत नेऊन ठेव मोरीत. न फोडता ने.” आता पावणे होते; तेंच्यासमोर आईचं ऐकाया पायजे ना! वाईट असली ती तरी! पाटीलकाकांनी कपात उलिसा च्या तसाच ठुला व्हता. म्या पिऊन टाकला तो गपचिप. येकदम झ्याक. तवापासून आले पावणे, की उचल कपबशी ... प्या च्या..... पावणे नाय आले तर? म्या रस्त्यावर जाऊन कुणालाबी सांगतिया “आई-आण्णा बोलावत्येत” म्हनूनशान. आई करतेच च्या. म्याबी पिते. उलिसा. गपचिप.

अभिनेता फारुख शेख काळाच्या पडद्या आड....

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 28/12/2013 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
एक धक्कादायक बातमी आपल्या सहज अभिनयाने प्रत्येक प्रसंग सुंदर करणारे फारुख शेख काळाच्या पडद्या आड गेले. र्‍हदयविकाराने त्यांचे दुबईत निधन झाले. त्यांची प्रथम ओळख सई पराम्जपेंच्या "चश्मेबद्दूर" या चित्रपटाने झाली त्यापूर्वी त्यानी चित्रपट केले होते मात्र त्याना खरी ओळख या मुळे मिळाली. "किसीसे ना कहना, नूरी , बाजार , उमरावजान या चित्रपटांमधून त्यानी आपली वेगळी ओळख प्रस्थापीत केली.

मेरा नाम चिन चिन चू…….

लेखक Atul Thakur यांनी शनिवार, 28/12/2013 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
हिन्दी चित्रपटाच्या पडद्यावर शृंगार आणि विभीत्सपणा यांच्या सीमारेषा बरेचदा फारच पुसट झालेल्या आढळतात. यात शुद्ध शृंगाराचा अनुभव हेलनने तीन दशकं प्रेक्षकांना दिला. वासना हा शब्द मला वापरण्याची इच्छा नाही कारण त्याला अनेक अर्थांची पुटं चढली आहेत. मात्र माणसातली “काम” ही आदीम प्रेरणा जागवण्याची कला या मदनिकेत होती. प्रदीर्घ काल हेलन स्वतः निवृत्त होइपर्यंत तिला या कलेत अनेकांशी स्पर्धा करावी लागली. हेलनच्या समोर उभ्या असलेल्या अभिनेत्री साध्या नव्हत्या. सौंदर्यात मधुबाला, अभिनयात मीना कुमारी, नृत्यात वैजयंती माला असे अनेक मानदंड त्यावेळी प्रतिष्ठा पावले होते.