सावळ्या तुझ्याविना...
सख्या कधीच लोपली मधाळ धुंद बासरी
तरी अजून गुंजते मुकुंद नाम अंतरी
अबोलशी पहाट ही उदास रे तुझ्याविना
अजून सांज सावळ्या, शोधते तुझ्या खुणा
सुनी सुनीच वाहते सुनी नदी सुन्या तिरी
अजून माय साठवी घटा घटात क्षीर रे
अधीरता मनात त्या लोचनांत नीर रे
अशांत ती पुकारते फिरून ये पुन्हा घरी
पूर्णतः प्रसन्न मी उदास गोकुळात या
मनात हर्ष-शोक ना, पल्याड मी हरीप्रिया!
कशास शोधु रे वृथा, मनात या वसे हरी...
अदिती
मिसळपाव
तिसरी घटना भीम दुर्योधन गदायुद्धाची आहे. यात तर एकमेकांवर कुरघोडी करण्याची जणु स्पर्धाच लागल्यासारखी दिसते. परंपरेने सांगितलेल्या कथा लक्षात घेतल्या तर असं दिसुन येतं कि दुर्योधनाला कुठेतरी ही जाणीव होती कि शेवटी आपला सामना भीमाशी होणारच आहे. त्यामुळे त्याने अनेक वर्षे लोखंडी पुतळ्यावर गदायुद्धाचा सराव केला होता. गदायुद्धाचं शिक्षण प्रत्यक्ष बलरामाकडुन मिळवलं होतं. गदायुद्धात भीम वगळता दुर्योधनाच्या तोडीचा वीर त्याकाळी जवळपास नव्हताच म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये.
--
"बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलं बघ वाघानं !"
:)
तेव्हापासून मला 'पोटदुखी'चा प्रचंड त्रास सुरु झाला आहे.