Skip to main content

ओढ

लेखक psajid यांनी बुधवार, 05/02/2014 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
पहिले सूर्यकिरण त्याचे आसुसले नयन, रात्रभर पळाला तो धरणीस भेटण्याला ....... लहानशी कळी उमलतेय तळी, तिची धाव ती वृक्षास व्यापण्याला ....... नदीचे काठ जशी चांदण्यातली वाट, चालण्याचा योग परी आसुसली भेटीला ........ भिरभिरती नजर तिची धाव अवाक्यापर, काव्य धाव घेतेय निसर्ग पिण्याला ........ कशाची तरी ओढ हवी माणसाला, नाहीतर निष्फळ आयुष्य काय अर्थ जगण्याला ........ श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी पलूस, सांगली (महाराष्ट्र)

पाकिस्तान, दहशतवाद आणी सलोखा

लेखक यशोधन वाळिंबे यांनी बुधवार, 05/02/2014 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
काल नेहेमीप्रमाणेच एक घटना घडली, ज्याने बऱ्याच जणांना हुरूप मिळाला, तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना टीकेची संधी, मिडियाला चघळण्यासाठी बातमी, विश्लेषकांना विश्लेषणाची संधी, पाकिस्तानला पुन्हा जगापुढे भारताविरोधात बोटं मोडण्याची संधी, (अहो या सगळ्यात आमच्या तेंडूलकर भाऊंचा विषय राहिला बाजूला.. असो इंडीया फर्स्ट) तर आज शिवसेनेने पाकिस्तानी कलाकारांच्या भारतातील सहभागावर निषेध व्यक्त करत आपला संताप व्यक्त केला. माझ्या मते, शिवसेनेची ही कृती म्हणजे एक अपरिहार्य पाऊल आहे.

माझा लोकलनामा :- भाग २

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 05/02/2014 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझा लोकलनामा:- भाग १
आपण सारे अर्जुन
मुंबईची लोकल म्हणजे मुंबईची जीवन वाहिनी आहे. लोकल ट्रेनने प्रवास करणे हा लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनला आहे. याच लोकल ने मी ही प्रवास करतो, डब्यात चढलं नी पाठीवरची बॅग रॅकवर ठेवली कि माझी नजर पोहचते तिथ पर्यंत मी पाहतो, तेव्हा मला विविध रंगी, विविध ढंगी, विविध जाती, धर्म, पंथाचे लोक एका छोट्या जागेत सामावलेले पाहायला मिळतात.

रजा आणि विश्रांती

लेखक मन यांनी बुधवार, 05/02/2014 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
थकलात ? कंटाळलात? जरा विश्रांती घ्या. रजा घ्या. विश्रांती घेउन थकला असाल तरी विश्रांतीमधून विश्रांती घेउ नका.काम करायला लागू नका. फक्त अधिक विश्रांती घ्या. आराम करा. काम करुन लवकरच थकणार आहात. कामातील बदल ही विश्रांती असते असं गांधीजी म्हणतात. असं काही वाचण्यात आलं तर सर्वप्रथम तुमच्या वाचनाच्या सवयीत बदल करा. वाचनातून विश्रांती घ्या. मिळेल तिथून घ्या. ती फार काही केवढ्याला मिळेल असं नाही. तिची वेगळी थेट किंमत द्यावी लागत नाही. किंवा किंमत देउन विकत नेहमीच घेता येत नाही. तुम्हाला जे मिळताहेत ते सोडणं म्हणजेच विश्रांती. कामातून विश्रांती घेता तशी खाण्यातूनही घ्या.

पळसाला पाने तीन...

लेखक मारकुटे यांनी बुधवार, 05/02/2014 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे काही मित्र आमचे म्हणणे ऐकून घ्यायचे नाहीत. आम्ही समजावून सांगण्याचा खुप प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी. आमचे म्हणणे एवढेच होते की बाबांनो संधी मिळत असली की कुणी सोडत नाही. सत्ता माणसाला भ्रष्ट करतेच. कुणीही फायदा घेण्याचा प्रयत्न करतोच. फार थोडे असतात जे बरबटत नाहीत. आणि ही वृत्ती केवळ कुठल्या वंशाशी, देशाशी वा जातीशी संबंधित नाही. माणुस जिथे आहे तिथे ही वृती आहे. पण नाही. विचारवंती झूल अंगावर पांघरली की जे काही भारतीय असेल ते तुच्छ मानावेच लागते असा काही दंडक आहे की काय कळत नाही.

जीरा आलू (सिंपल)

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी बुधवार, 05/02/2014 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
साधी सोप्पी बॅचलर्स रेसीपी आहे, सटल टू टेस्ट अन झटपट तर जीरा आलु साहित्य :- १. ३ मध्यम बटाटे (उकडुन सालं न काढता केलेले मध्यम तुकडे) २. चिमुटभर हिंग अन दोन अडीच चिमटी (थोडे जास्त ) जिरे (जिरा आलु आहे ना!!!) ३. चवीपुरते मीठ ४. गरम मसाला अर्धा छोटा चमचा (ऑप्शनल) ५.

हर दिल जो प्यार करेगा

लेखक mohite jeevan यांनी मंगळवार, 04/02/2014 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
राज आज काँलेजवर खुपच आकर्षक दिसत होता, त्या ड्रेसमध्ये व हेअर स्टाईल मध्ये तो आग़दी नुकताच लाग़लेला मुव्ही ‘कहो ना प्यार है’ यामधील ‘एक पल का जीना’ या ग़ीता मधील ऋत्विक रोशन जसा दिसतो तसा तो उभे उभ दिसत होता. थोडी उची कमी आसली म्हणुन काय झालं, लुक तर आहे ना हिरो सारखा, सर्व मुलीच्या घोळक्यात त्याचाच विषय, त्याला पाहुन काही मुली तर स्माईल देत पण त्याला सर्व कॉलेजच्या मुलीच माझ्यावर फिदा आहेत आसे वाटे, व आपण एक कॉलेजचा हिरो आहे आसे त्याला वाटे. राजचे खरे नाव राजु पण फिल्मी स्टाईलमुळे त्याचे राज नाव पडले होते.

एक नविन कॉकटेल बनवले, त्या कॉकटेलला नांव सुचवा....

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 04/02/2014 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्याच दिवाळीच्या सुमारास आपला मंगळ कट्टा (http://www.misalpav.com/node/25976) छान पार पडला.तिकडून परत येतांना मला पण काही कॉकटेल्स सुचली.(मंगळाचा गूण...दुसरे काय?)सुदैवाने परतीच्या प्रवासात मी आणि सोत्री एकत्रच बसलो होतो.मला सुचलेले कॉ़कटेल मी सोत्रींना सांगीतले.त्यांनी पण ही संकल्पना उचलून धरली. ऑक्टोबर हीट चालू झाली.आणि मला काही तरी थंड पेय प्यावे असे वाटायला लागले.आणि अशा कडाक्यात आंबा नसेल तर काय अर्थ तरी आहे का? असो. नमनाला थेंबभर तेल खूप झाले. आता जिन्नस.... १. आपल्याला जितकी पचते तितकी व्होडका. २. माझाचा मेंगो ज्युस ३.

पंडित भगवानलाल इंद्रजी

लेखक राही यांनी मंगळवार, 04/02/2014 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
The Asiatic Society of Bombay च्या Gallery of Excellence या नावाच्या एका प्रकाशनामध्ये पण्डित भगवानलाल इंद्रजी यांच्या विषयी एक चरित्रात्मक लेख आहे. हे लिखाण प्रताधिकाराखाली असल्याने थेट भाषांतर देता येणार नाही, पण कदाचित गोषवारा देता येईल. पंडित भगवानलाल यांचा जन्म ७-११-१८३९ रोजी सौराष्ट्रातील जुनागढ येथे झाला. तिथे त्या काळी इंग्रजी शिक्षणाची सोय नव्हती. पण संस्कृत भाषा आणि आयुर्वेदउपचारपद्धतीचे शिक्षण मात्र त्यांना मिळाले. गिरनारच्या वाटेवरील पाषाणलेखाने लहानपणीच त्यांना या विषयी कुतूहल निर्माण झाले आणि पुढे पुराभिलेख आणि नाणकशास्त्राचा अभ्यास हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले.

डोंबिवली कट्टा.... हेमांगी के... ह्यांच्या समवेत....!!!

लेखक विनोद१८ यांनी सोमवार, 03/02/2014 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, श्रीमान मुक्त विहारि यांच्या वनंतीने मी या कट्ट्याचा व्रूत्तांत लिहीत आहे, मिपावर लिहीण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. (काही चूक झाल्यास माफ करावे, ही विनंती.) ठरल्याप्रमाणे हाही कट्टा अगदी व्यवस्थित पार पडला, सगळे म्हणजे श्री. व सौ. हेमांगीके, अजया, मुक्त विहारि, सुबोध खरे, रामदास काका, सूड, भटक्या खेडवाला, भाते इ.