काल नेहेमीप्रमाणेच एक घटना घडली, ज्याने बऱ्याच जणांना हुरूप मिळाला, तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना टीकेची संधी, मिडियाला चघळण्यासाठी बातमी, विश्लेषकांना विश्लेषणाची संधी, पाकिस्तानला पुन्हा जगापुढे भारताविरोधात बोटं मोडण्याची संधी, (अहो या सगळ्यात आमच्या तेंडूलकर भाऊंचा विषय राहिला बाजूला.. असो इंडीया फर्स्ट) तर आज शिवसेनेने पाकिस्तानी कलाकारांच्या भारतातील सहभागावर निषेध व्यक्त करत आपला संताप व्यक्त केला. माझ्या मते, शिवसेनेची ही कृती म्हणजे एक अपरिहार्य पाऊल आहे. पाकिस्तानमधील निष्पाप नागरिक अजिबात निषिद्ध नाहीत, पण जर कलाकार,खेळाडू,उद्योजक भारतात येऊन त्यांना हव्या त्या गोष्टी साध्य करीत असतील तर त्यांनी अशा गोष्टींसाठी परवानगी मागण्याआधी स्वतःहून दहशतवादाचा निषेध करावा आणी पाकिस्तानामुळे भारताला झालेल्या वेदनांसाठी एक दूत म्हणून माफी मागावी. केवळ पाकिस्तानातीलच नव्हे तर प्रत्येक देशातील नागरिकांनी त्यांच्या देशातून इतर देशात जाताना अशा प्रकारे दुसऱ्या देशाची माफी मागावी, यासाठी नियमच करावा. काही पाश्चात्य देशात जर कायमचे नागरिकत्व हवे असेल तर त्यावेळी सदर देशाचे संपुर्ण राष्ट्रगीत म्हणून दाखवणे अनिवार्य आहे त्याच धर्तीवर जर एखाद्या देशात प्रवेश हवा असेल तर अशाच प्रकारे एखादी अट घालण्यात यावी.
“मी अमुकअमुक देशाचा नागरिक असून मला आपल्या देशात अ/ब/क कारणासाठी प्रवेश हवा आहे, तत्पूर्वी मी माझ्या देशाचा जबाबदार सामाजिक घटक/दूत म्हणून माझ्या देशातील समाजकंटकांकडून आपल्या देशावर झालेले दहशतवादी हल्ले, सायबर हल्ले किंवा इतर कोणत्याही प्रकारे झालेल्या नुकसानीबद्दल दिलगीर असून मी याचा मानवतेच्या दृष्टिकोनातून निषेध करतो/करते आणी त्याबद्दल आपली माफी मागतो/मागते, यापुढे माझ्या देशातील समाजकंटकांकडून माझ्या,आपल्या किंवा इतर कोणत्याही देशाला कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी आग्रही असेन आणी अशा प्रकारांना व्यक्तिशः देखील खतपाणी घालणार नाही”अशा प्रकारची अट मान्य केल्याशिवाय व्हीजा मंजूरच करू नये. यामुळे दोन प्रकारे फायदा होईल,
- ज्यांना आपल्या देशाबद्दल तिरस्कार/मत्सर आहे त्यांना आपल्या देशात येण्यापासून अटकाव होऊ शकेल.
- मानवतेच्या पुरस्कर्त्यांना देशात सहज प्रवेश मिळेल आणी तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांचा आक्षेप दूर होईल. (कारण मानवतेच्या पुरस्कर्त्यांना अशी अट मान्य करायला हरकत नसावी)
वाचने
3876
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
कसलं विडंबन म्हणायचं हे?
बातमी
In reply to कसलं विडंबन म्हणायचं हे? by अर्धवटराव
शिवसेनेनी केलं होय
In reply to बातमी by यशोधन वाळिंबे
दक्षिण आशियाई देशांना चिंतेची बाब
In reply to बातमी by यशोधन वाळिंबे
भावना पोहोचल्या
पुरावा
In reply to भावना पोहोचल्या by क्लिंटन
कसाब
In reply to पुरावा by यशोधन वाळिंबे
कायदा.
In reply to कसाब by क्लिंटन
बरोबर आहे
In reply to कायदा. by अर्धवटराव
सहमत
In reply to कायदा. by अर्धवटराव
>>>साध्या फाशीलाही
In reply to सहमत by यशोधन वाळिंबे
छान प्रस्ताव
In reply to सहमत by यशोधन वाळिंबे
मरेपर्यंत फाशी
In reply to सहमत by यशोधन वाळिंबे
अमेरीकन व्हिसा
In reply to भावना पोहोचल्या by क्लिंटन
यशवंत
हे आपल्याकडच्या मानवतावाद्यांना (?) कोण सांगणार?
In reply to यशवंत by बन्डु
मलाही वाटतं असावं असं......
हमी देतील.
In reply to मलाही वाटतं असावं असं...... by psajid
स्वागतार्ह पाऊलः भारताचा विसा