Skip to main content

भविष्य दर्शन

लेखक उडन खटोला यांनी रविवार, 09/02/2014 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकांना दिवसा डुलक्या काढायची सवय असते . कामावर असताना अशा डुलक्या काढताना बॉस ने पाहिले तर महागात पडू शकते . इतकेच नव्हे तर गाडी चालवत असताना येणाऱ्या डुलक्या प्राणघातक अपघातास निमंत्रण देवू शकतात . पण हीच डुलकी तुम्हाला भविष्यात घडणार्या घटनांचे प्रतिबिंब देखील दाखवू शकते . नुकत्याच अमेरिकेतील एका संशोधनात सुमारे ८०,००० लोकांचे अनुभव नोंदवण्यात आले। त्यापैकी सुमारे ६०% लोकांनी डुलकी म्हणजेच microsleep च्या काही सेकंदात पुढे काही दिवसात घडणार्या घटनातील काही अंश पाहिल्याचे सांगितले .

वासकसज्जा

लेखक रामदास यांनी रविवार, 09/02/2014 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी एका संध्याकाळी एका पत्रकार मित्राचा फोन आला. "रात्री साडेआठ वाजता आमच्या पाणवठ्यावर येणे." (माझा पाणवठा वेगळा आहे.).वेळेवर पोहचलो. मित्रासोबत आणखी दोघं तिघं बसले होते.पुनराचम्य... वगैरे झाल्यावर चर्चा मुद्द्यावर आली." रामदास, एका चित्रपटाचे संवाद लिहायचे आहेत." मी नकारार्थी मान हलवली.मग बराच आग्रह झाल्यावर मला पटलं की माझ्यात काहीही काम करण्याचे सामर्थ्य आहे.

"वल्लीं" बरोबर....घारापुरी कट्टा....दि. १ मार्च किंवा ८ मार्च..२०१४

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 09/02/2014 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, कालचा आमचा फोर्ट कट्टा छान पार पडला.काय काय बघीतले आणि कोण-कोण आले होते, ह्याचा व्रुत्तांत येईलच.फिरता-बोलता-पहाता आणि खाता कट्टा असल्याने, पुढील कट्टा पण लगेच ठरला. वल्लींना फोन केला आणि आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने ते "घारापुरी" लेणी दाखवायला तयार झाले.मार्च मधली १ली तारीख किंवा ८वी तारीख. साल २०१४....

असे करु शकतो का ?

लेखक ज्ञानव यांनी रविवार, 09/02/2014 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतल्या एका प्रथित यश महिला मंडळाचे इंटरनल ऑडीट सध्या करतो आहे. त्यात एक गोष्ट निदर्शनास आली कि ह्या विश्वस्थ संस्थेचे २५ लाखाचे (रुपये १०००० ते १०००००)फिक्स्ड डीपोझीट एका बँकेत आहेत. त्या बँकेने रुपये २५००० चे एक मूळ एफ.डी. टी डी एस च्या नावाखाली खाऊन टाकले आहे. बरे त्याचे सर्टिफिकेट विश्वस्थ संस्थेकडे तसेच आहेत. ह्यावर मी त्यांचा सीए आणि बँक व्यवस्थापक ह्यांना काही विचारले असता त्यांनी ते बरोबरच आहे असे सांगितले आहे.

अकबराचा मोबाईल हरवतो

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 09/02/2014 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
अकबराचा मोबाईल हरवतो नेहमीप्रमाणे अकबर बादशाह दरबारात बसला होता. इतर सारे दरबारी आपाअपल्या खुर्च्यांवर बसले होते. दरबाराचे कामकाज चालू होते. नविन टॅक्स सिस्टीम कशी राबवायची, रेपो रेट कमी करायचा का नाही, आधार कार्ड स्कीम बंद करून नविन आयडेंटी कार्ड लागू करावे काय, अनुदानातले गॅस सिलेंडर, अभिनेत्री करूना कपुर हिला पद्मश्री पुरस्कार आदी बरेच विषय चर्चेला होते. एका दिवसात हे सारे विषय काही संपणारे नव्हते हे बादशाहाला अन बाकीच्या दरबार्‍यांनाही सवयीने माहीत झाले असल्याने टंगळमंगळ, विनोद करत चर्चा चालू होती. बिरबलाचे बादशाह अकबराकडे बारकाईचे लक्ष होते.

आय लव्ह यू........

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 09/02/2014 02:16 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : http://misalpav.com/comment/551311#comment-551311 ( पिवळा डांबीस काकाने प्रेरीत केलं त्यामुळे लिहायला घेतलं) फेब्रुवारी असूनही आज आकाश ढगाळलंय. कुंद म्हणता येणार नाही पण प्रफुल्लीत एकदम उत्साही. असं वातावरण असलं की कसं भाग्य फिदा असतं अशावेळेला दुधात साखर म्हणजे ऑफिसमध्ये क्लायंट ने मीटींगची डेट पोस्टपोन केलेली असावी.

विचित्रवीर्याची चित्र-विचित्र कहाणी (महाभारत भाग-३)

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 08/02/2014 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
विचित्रवीर्याची विचित्र कहाणी . चित्र १: विचित्रवीर्याची विचित्र मिरवणूक (चित्रकार: जेम्स गुर्ने) यापूर्वीची कथा: कुणी घडवून आणले 'महाभारत'? (भाग १) मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २) मदनकेतु उवाच: मुनिवर, तुम्ही शांतनुच्या मुलांची नावे ‘चित्रांगद’ आणि ‘ चित्रवीर्य’ होती म्हणून सांगितलेत, परंतु मी तर ‘विचित्रवीर्य’ असे नाव ऐकत आलेलो आहे? नारदमुनी उवाच: अरे, ती तर एक मोठी कथाच आहे.

दुर्योधन,: महाभारतातला

लेखक शरद यांनी शनिवार, 08/02/2014 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्योधन : महाभारत काय म्हणते ? श्री.मृत्युंजय यांचा दुर्योधनावरील लेख वाचून थोडी निराशा झाली.. रामायण व महाभारत हे आपले नुसते धार्मिक ग्रंथच नव्हेत तर सांस्कृतिक धन आहे. त्यावर आपले विचार अवष्य मांडावेत पण तसे करतांना " ग्रंथात असे आहे पण मला त्यातून हा अर्थ लावावा असे वाटते " असे लिहले पाहिजे. दुर्गा भागवत वा इरावती कर्वे या महाविदुषी देखील हाच मार्ग चोखाळतात. याने दोन गोष्टी साधतात. वाचकाला ग्रंथात काय आहे व मग तुम्हाला काय म्हणावयाचे आहे ते सापेक्ष कळते. नच, तुम्ही मांडता ते ग्रंथात आहेच अशी चुकीची समजुत होऊं शकते. श्री.

टोमॅटो भात

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 08/02/2014 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी मी तसा आळशी या सदरात मोडणारा,त्यांमुळे एक सोपी पाकृ ईथे देत आहे. भारतात वेगवेगळ्या प्रांतात भाताचे अनेक प्रकार प्रचलित आहेत त्यापैकी एक हा टोमॅटो भात. साहीत्य---शिजवलेला भात ,४ टोमॅटो,१ मध्यम आकाराचा कांदा ,कडीपत्ता,कोथिंबीर, थोडे शेंगदाणे,उडीद डाळ, मुगडाळ कृती--भात शिजवुन घ्यावा. (कालचा शिळा असल्यास उत्तम :) . दाणे व डाळ भिजत घालावी. कांदा व टोमॅटो बारीक चिरुन घ्यावे. कढीपत्ता, कोथिंबीर व ईतर तयारी करुन घावी. एका पातेल्यात (नॉन- स्टीक असल्यास बरे) तेल तापत ठेवावे. तेल तापल्यावर जिरे,मोहरी व हिंगाची फोडणी करावी.