Skip to main content

तू मला वगळून उरणे शक्य नाही

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 24/05/2014 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
तू कुणावर प्रेम करणे शक्य नाही जन्मभर वणव्यात जळणे शक्य नाही तू सुखाच्या सोबतीने चाल राणी मी दगा दुःखास देणे शक्य नाही हे तुझे आंगण तुला लखलाभ आता ते पुन्हा केव्हा बहरणे शक्य नाही जीवना, हा छान बंदीवास आहे जो उभ्या जन्मात सरणे शक्य नाही मी सुगंधासारखा अस्थिर होतो मी तुझ्या हातात ठरणे शक्य नाही तू हवे तर आण उसनी चार दुःखे ती अशी आतून झरणे शक्य नाही .. तू कितीही बांध भिंती अस्मितेच्या तू मला वगळून उरणे शक्य नाही डॉ.सुनील अहिरराव

मला काही काळ शांती भेटली होती ……!

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 24/05/2014 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
आणि अचानक मला शांती भेटली …. रोहिणी हॉटेलच्या समोरून ती शांत पणे एकटीच चालली होती . तिला पाहून मी एकदम चमकलो ! शांती, आमची शाळेतील मैत्रिण ! नावाप्रमाणे शांत , शाळेत असताना सरळ मार्गी जाणारी, ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या मध्यात , आपण बरे आणि आपला अभ्यास बरा. पण आज दिसलेली शांती एकदम वेगळीच वाटत होती शांते ए शांते , मी बिन्धास भर रस्त्यात तिला हाक मारली तिने मला पाहिले , अरे अमोल कसा आहेस ?

लटके आरोप ताठ मान !!

लेखक माहितगार यांनी शनिवार, 24/05/2014 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
मच्छरांनो :) ससुलापंत दिसतो कसा ? जजाने कोठडीत ठेवलाय जसा ! ससुल्या गडी करतो कडी, काढीन म्हणतो न्यायाची खोडी ! तुमचं न्यायालय हवं कशाला ? मी चावलो, तो गुन्हेगार झाला ! गुन्हेगाराला चावून, काय गून्हा केला ? प्रसिद्धीत रहायचय पुन्हा त्याला ! तक्रार यांची, त्यांचेच चूक चावल्याने भागते लालसेची भूक ! ससुलाल नाटक करतो छान, लटके आरोप ताठ मान !! :)
काव्यरस

तिहारी लावणी

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 24/05/2014 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
पक्षही हरला, मीही बुडालो, तरी मोडीत काढू नका! अन राया मला, जेलात धाडू नका... राया मला, जेलात धाडू नका | अहो सख्या मला, जेलात धाडू नका || गुरू अण्णांना उपासा बसविले, प्राण तयांचे पणास लाविले... साथ न देता लाभ उठविला कृतघ्न ठरवू नका... अन राया मला, जेलात धाडू नका | अहो सख्या मला, जेलात धाडू नका || जने विश्वासली, दिल्लीची सत्ता, कशी राबवू, मला न पत्ता... खोटी आश्वासने, राजीनामा नाटक 'भगोडा' हिणवू नका... अन राया मला, जेलात धाडू नका || अहो सख्या मला, जेलात धाडू नका || सिंहासामोरी दंड थोपटले तरी तयाने मज दुर्लक्षियले, मिडियाशी बोंबललो तरीही गंगा न गिळे माझ्या चुका... अन राया मला, जेलात धाडू
काव्यरस

जेल मधी जाऊ या, दिल्लीची बिल्ली

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 24/05/2014 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
जेल मधी जाऊ या राजनीती खेळ खेळू या. जेल मधी गेला नेहरू गादी मिळाली देशाची. जेल मधी गेला लालू गादी मिळाली बिहारची जेल मधी गेला केजरी मिळेल का गादी दिल्लीची? काशी मधी गेली दिल्लीची बिल्ली. वाघाला म्हणाली मी तुझी मावशी पड माझ्या पाया. वाघाने दिला मिशी वर ताव जोरात फोडली डरकाळी एक. मावशी उडाली हवेत तशी जाऊन बुडाली दिल्ली तळी.

बस झाली निवडणुक....

लेखक बाबा पाटील यांनी शुक्रवार, 23/05/2014 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
च्यामारी मागचे ४-५ महिने या इलेक्शनने नुसता वात आणलाय राव.चला जरा टाइमपास करु प्रत्येकाने लहानपणापासुनची स्वतःची टोपन नावे सांगा म्हणजे लोकांच्या दृष्टीने तुम्ही कसे होता ते कळेल्,कारण टोपण नाव माणसाच्या बर्‍यापैकी व्यक्तीमत्वाची ओळख करु देत.(अस कोणत्या महाराजांनी नाही सांगितल हे माझे वैयक्तिक मत आहे.)कारण मागचे काही महिने आपण मि.पा.वर मोदी,गांधी आणी केजरु यांचे इतके विश्लेषण केले आहे की बिचार्‍यांना खरच कधी कळल तर आत्महत्या करतील. तरी माझी स्वतःची बरिच टोपण नावे होती ती पुढील प्रमाणे.- १)पिनु- जन्मापासुन जवळपासचे सगळे २)मम्हंबळ्या- आज्जी म्हणायची. ३)दादा- भावकीतले सगळे ४)पाटील- गावकरी मंडळ

आय टी आणि आम्ही

लेखक nasatiuthathev यांनी शुक्रवार, 23/05/2014 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
आय टी आणि आम्ही शेवटचे वर्ष संपत असत ... Placement नामक पर्व सुरु होत असत .... ह्या पर्वात सगळ्या जणांना उडी घ्यायची असते किंबहुना तशी धडपड तरी ते करीत असतात .... कंपनी'ज येतात .... आपल्यातले (आमच्यातले ???) काही जण select होतात .... आम्ही मात्र अजूनही त्या कॉलेजच्या बेफिकीरीतच असतो ... अरे होईल रे .... कंपनी कुठे पळून चालल्या आहेत का ...... अरे आपल्याला ती कंपनी च नको होती यार ... असे संवाद कट्ट्यावर ऐकायला/ऐकवायला सुरुवात होते .... select झालेल्या मुलांचा आता एक वेगळा ग्रुप तयार झालेला असतो ....

राजमाची उन्हाळी भटकंती: १

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 23/05/2014 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
१)सुधागड तेलबैलाची भटकंती करून एक सवावर्ष होऊन गेलं .त्यानंतर सह्याद्रित कुठेच भटकलो नव्हतो .अगदी २०१३चा पावसाळाही कोरडाच घालवला .नाही म्हणायला कर्नाटक ,राजस्थानात सहकुटुंब पर्यटन झालं .परंतु चार धोंडे ठेचकाळून ,पायात काटे मोडून घेत सह्याद्रिच्या दऱ्या धुंडाळायला मिळाल्या नाही तर काही तरी चुकल्यासारखं होत राहतं .शेवटी नवीन सरकारला सोळा मेला दिल्लीला पाठवून राजमाचीचा बेत आखला . भिमाशंकर आणि राजमाची या ठिकाणी वर्षभरात तीनही ऋतुंमध्ये जाता येते .प्रत्येकवेळचा निसर्ग वेगळा असतो .पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भटक्यांची फारच गर्दी असते .उन्हाळ्यात इकडे दोन विशेष गोष्टी पर्यटकांची वाट पाहात असतात .एक

दु:खद बातमी

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 23/05/2014 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिभावान संगितकार -श्री.आनंद मोडक यांचं निधन... https://fbcdn-sphotos-b-a.akamaihd.net/hphotos-ak-prn2/t1.0-9/296378_158885857537751_1274174221_n.jpg माझ्यासाठी आनंद मोडक म्हणजे, मुक्ता आणि साजणवेळा .. मुक्ता हा चित्रपट सर्व बाबतीत श्रेष्ठ दर्जाचा होता.आणि त्यातलं आनंद मोडकांचं संगीत म्हणजे,त्या काळातही अत्यंत वेगळ..आणि चालू मराठी चित्रपट संगीतामधे उजवं,असं होतं.मला त्यातल्या गाण्यांची प्रथम ऐकल्यापासून जी भुरळ पडली ती आजही कायम आहे.

वादविवादाच्या आसमंतातील पोकळी

लेखक आनन्दा यांनी शुक्रवार, 23/05/2014 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर मागचे ७-८ महिने फार मस्त गेले. नमो>नी पंतप्रधानपदासाठी उमेदवारी जाहीर केली, आणि त्यांची मोहीम चालू झाली, त्यावर आणि एकंदर गुजरात मॉडेल, वगैरे गोष्टींवर साधक-बाधक चर्चा इथेच झाली. मोदींवर अनेक शतकी, द्विशतकी धागे निघाले, घमासान वादळे झाली. वादविवादाची आवड असलेल्या मराठी माणसाला अगदी मन भरेपर्यंत काथ्याकूट झाले. त्यातच मफलार्धारी>चा जन्म झाला आणि वातावरण पुन्हा ढवळून निघाले, त्यांचे लोकप्रियतेचे दावे, ते बोलणे, ते खोकणे सारेच काही नवे. पुन्हा एकदा मिपामध्ये जान आली, पुन्हा एकदा धागे द्विशतक गाठू लागले, त्यातच निवडणूका जवळ आल्या आणि मग तर मिपावर एकदम तडाखेबंद फलंदाजी सुरू झाली.