Skip to main content

ब्रु.म.मं २०१५: अधिवेशन गीत स्पर्धा

लेखक बीएमएम२०१५ यांनी गुरुवार, 28/08/2014 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
BMM 2015 Media and Marketing Committee सहर्ष सादर करीत आहे अधिवेशन गीत स्पर्धा हि स्पर्धा उत्तर अमेरिकेतील रहिवाशांसाठी खुली आहे गीताचा विषय “मैत्र पिढ्यांचे” या अधिवेशनाच्या संकल्पनेशी निगडीत असावा. सादर केले जाणारे गीत ही पूर्णपणे नवीन कलाकृती असावी - गीत, संगीत, गायन तसेच वादन. पूर्ण झालेल्या गीताची ध्वनिमुद्रित प्रत प्रवेशिका म्हणून पाठवावी. विजेत्या संघाची निवड परीक्षक मंडळ, तसेच BMMकडून केली जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. निवडलेले गीत अधिवेशनात वाजवले जाईल, तसेच अधिवेशनाच्या प्रसिद्धीसाठी /promotionसाठी वापरले जाईल.

वाचनीय 'सायकॅमोर रो'

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 28/08/2014 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच जॉन ग्रीशम यांची 'सायकॅमोर रो' ही कादंबरी वाचून संपवली. ही कादंबरी बहुधा २०१३ साली प्रकाशित झाली. मी एका-दोघांच्या हातात ही कादंबरी पाहिली होती. आधी याच लेखकाचं 'अ टाईम टू किल' वाचलं होतं. आवडलं होतं. 'किल' मध्ये अमेरिकेतल्या सुप्त वर्णभेदाचे दाहक चित्रण अतिशय सुंदर आणि ओघवत्या शैलीत केले होते. कादंबरीचा नायक जेक ब्रिगेन्स हा एक तरुण वकील आहे. स्वतः गोरा असूनदेखील माणसांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद असता कामा नये हे त्याचे तत्व असते. त्याच्या फर्मचा दारुडा मालक वैयक्तिक आयुष्यात स्वच्छंदी असला तरी त्याला कृष्णवर्णींयांविषयी आपुलकी असते.

क्षमा

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 28/08/2014 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
“तू माझी क्षमा मागितली पाहिजेस”, ती म्हणाली. डोळ्यातले अश्रू लपवत तो “आय अ‍ॅम सॉरी” म्हणाला. “सॉरी नाही, क्षमा माग”, ती तिच्या शब्दावर ठाम होती. “मला क्षमा कर,” तो थरथरत्या आवाजात म्हणाला. “तूही क्षमा मागितली पाहिजेस”, शेजारच्या उदास स्त्रीकडे वळून ती त्याच स्वरांत उद्गारली. “मी तुझी क्षमा मागते,” म्हणताना त्या स्त्रीला हुंदका आवरता आला नाही. तिथे आता सुन्न शांतता होती. एकदाही मागे वळून न पाहता, अगदी सावकाश ती छोटी मुलगी खोलीच्या बाहेर गेली. “हं!

आदिकैलास,ओमपर्वतदर्शन आणि पार्वतीसरोवर परिक्रमा भाग १

लेखक खुशि यांनी गुरुवार, 28/08/2014 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
कैलास-मानससरोवर यात्रा करण्यासाठी १लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो, कारण तिबेटमधील प्रवासासाठी चीन सरकारला ७०० डॉलर द्यावे लागतात. पासपोर्टही लागतो. त्याशिवाय या यात्रेसाठी 'स्ट्रेसटेस्ट' वगैरेसारख्या महागड्या, पण आवश्यक तपासण्या कराव्या लागतात. आमच्याजवळ पासपोर्ट नाही आणि एवढे पैसेही नाहीत. कैलासयात्रा घडावी असे खूप वाटत असे. पण हे आपल्याला शक्य नाही म्हणून गप्प बसत होतो. शिवशंभोला आम्हाला यात्रा घडावी असे वाटत होते, म्हणूनच एक दिवस म.टा.मधील एका बातमीकडे लक्ष गेले. गोरेगाव-मुंबई येथील श्री. वाशीकर यांनी ती बातमी दिली होती. 'आदिकैलास-ओमपर्वत यात्रा आहे.

पेरू : भाग ७ : माचुपिचू

लेखक समर्पक यांनी गुरुवार, 28/08/2014 09:33 या दिवशी प्रकाशित केले.

अर्ध्याहून अधिक पेरू आता तुम्ही पाहिलात. आता या भागात सगळ्यात मूलभूत प्रश्नाविषयी थोडंसं… 'पेरूच का?'

वंगाळ !

लेखक सुहास.. यांनी गुरुवार, 28/08/2014 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
साद झलकेची , मना मंदी चाळं, शरावणातल बेडकं स्साल, वंगाळ वंगाळ गव्हाळ मानंखाली तीळ मस्त काळं चवचाल जीभ स्साली वंगाळ वंगाळ लाजुन पाठमोरी बसली दातखीळं कलिजा खल्लास स्साला वंगाळ वंगाळ पदराला पुरना कापड अंगी रतीच मुळं दमच निघना स्साला वंगाळ वंगाळ दोन चंद्राची रात म्हणं गारवा आनं ढगाळं सरना च आज स्साली वंगाळ वंगाळ
काव्यरस

तपस्या

लेखक जयनीत यांनी बुधवार, 27/08/2014 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
अमका सांगतो एक तमक्याचे ठोकताळे दुसरेच खमका करतो दावा छातीठोक घडते प्रत्यक्षात वेगळेच प्रारब्ध माझे अधर अनिश्चित खडतर काळ प्रतीक्षेचा नाही विचलीत मी अपराजित प्रण मनात घोर तपस्येचा फळतील माझे प्रयत्न भगीरथ घेईन वेध भविष्याचा शोध सुरुच सतत अविरत सिद्धहस्त ज्योतिष्याचा

पुण्यातला गणेशोत्सव -माहिती हवी आहे

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 27/08/2014 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलंय. घराघरात आपल्या लाडक्या दैवताच्या तयारीची लगबग आणि धावपळ अगदी मनापासून सुरु आहे. ज्यांचा घरचा गणपती कोकणात आहे त्यांची तर तऱ्हाच वेगळी….गणपती म्हटला की मनात पहिल्यांदा आठवतं ते पुणं …. ह्या शहराची नाळ त्याच्या आराध्य दैवताशी ज्या प्रकारे जोडली गेली आहे ते पाहता ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असूच शकत नाहीत ह्याची खात्री पटते….

भिमाशंकरचा रानडुकर

लेखक कंजूस यांनी बुधवार, 27/08/2014 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
(१) मार्च महिना होता .थंडी सरली होती .अशा दिवसांत भटकंतीसाठी ठरावीक डोंगर उरतात .१४ तारखेला (२००६) होळी होती .भिमाशंकरला जायचे ठरवले परंतू त्यादिवशी सकाळी निघायला उशीरच झाला .तरी साडेबारा पाऊणला नेरळला पोहोचलो ,दुपारची वेळ त्यामुळे रिक्षा मिळून कशेळे व तिथून खांडसला पोहोचायला पावणेतीन वाजले . नेहमी सकाळी नऊला खांडसहून चढायला सुरुवात करतो आणि रमतगमत तीन वाजता गणपतीघाटाने वर चारपर्यँत जातो .पण आज अंधार पडायच्या आत साडेसातपर्यँत वर जायलाच हवे होते .वाटेत एक गाववाला शेतावरून परतत होता ."एवढ्या उशीरा ?जरा पाय उचला लवकर .पोहोचाल ." हो म्हणालो . तासाभरात गणपती देवळाजवळ आलो .पाचच मिनीटे थांबून निघा