Skip to main content

भोलेबाबा अमरनाथ दर्शन २००१

लेखक खुशि यांनी शनिवार, 20/09/2014 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी अमरनाथसाठी निघालो, श्रीनगर शहरात रस्त्यावर मोठमोठे चिनारचे व्रुक्ष आहेत.रस्त्याच्या मधोमध असले तरी रस्ता रुंदीकरणासाठी त्यांची कत्तल केलेली नाही तर जागोजाग रस्त्यालाच वळण दिलेले आहे.गन्दरबल येथे माताश्री खिरभवानीच्या दर्शनासाठी गेलो.निसर्गरम्य ठिकाण आहे.छोटीसी स्वच्छ वाहत्या पाण्याची नदी आहे घाट आहे,सरोवरात खिरभवानी मातेचे छोटेसे मन्दीर आहे.५१शक्तिपीठा पैकी एक आहे.येथे साबुदाण्याच्या खिरीचा प्रसाद मिळतो.प्रसादालयाच्या जवळ एका ठिकाणी उभे राहुन वर आकाशाकडे पाहिले असता झाडांच्या फांद्यांमधुन भारताचा नकाशा दिसतो.घनदाट व्रुक्षराजी आहे.भरपुर कावळे आहेत पण ते पिवळ्या चोचीचे आणि गोड आवाजाचे आहेत

हापिस-हापिस

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 20/09/2014 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
शतशब्दकथा ( आतिवासताईना गुरु करून) ‘अरे आज ऑफिसला नाही का जायचे ?’ ‘अलीकडे मला ऑफिसला जावेसेच वाटत नाही बघ ! काही मजा नाही राहिली !’ ‘ते का ?’ ‘अरे, तिथे मी कुणाला आवडत नाही. सगळे मला टाळतात... ...माझ्याबरोबर कुणी बसत नाहीत. मी बोलावल्याशिवाय कुणी माझ्याकडं येत नाहीत. आले तरी कामापुरतं येतात. अन लगेच जातात. कामापुरतंच बोलतात. मी ऑफिसात आलो की हसणे खिदळणे बंद करतात अन गंभीर चेहेरे करून फायलीत खुपसतात. चहाला जाताना मला दिसू नये अशी दक्षता घेतात. ....मी एकटाच डबा खातो. सिगारेट ओढतो. अन परत कामाला लागतो.’ ‘अरे पण पूर्वी तू किती उत्साहानं ऑफिसला जायचास !’ ‘हम्म..

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - २

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 20/09/2014 05:49 या दिवशी प्रकाशित केले.
९ मे १६१९ ला जेन्स मंक हा डेन्मार्कचा दर्यावर्दी युनिकॉर्न आणि लॅम्प्रे या दोन जहाजांसह नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर निघाला. नॉर्थवेस्ट पॅसेजमधून चीन आणि भारताचा किनारा गाठण्याचा त्याचा बेत होता. डेव्हीसच्या सामुद्रधुनीतून उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमणा करत त्याने ६९ अंश उत्तर अक्षवृत्त गाठलं. फ्रॉबीशरच्या उपसागरातून त्याने हडसनच्या सामुद्र्धुनीत प्रवेश केला. मात्रं या सामुद्रधुनीतून वाट काढण्यास त्याला तब्बल एक महिना लागला. सतत बिघडणारं हवामान आणि जोरदार आर्क्टीक वार्‍यांमुळे त्याच्या जहाजांची दयनीय अवस्था झाली होती.

भोले बाबा अमरनाथ दर्शन २००१

लेखक खुशि यांनी शुक्रवार, 19/09/2014 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा मित्र श्री.गिरीश वडनेरकर १९९६ पासुन दरवर्षी अमरनाथ यात्रेला जातो बरोबर काही लोकानाही नेतो{ना नफा ना तोटा या तत्वावर} हे माहित होते,गेल्यावर्षी शेजारचे रावेरकर जाऊन आल्यावर त्यानी केलेले सुंदर काश्मीरचे वर्णन ऐकून आम्हाला कधी आपणही जाऊ असे झाले होते आणि यावर्षी भोलेबाबानी आम्हाला बोलावले. मंगळवार ३जुलै २००१ संध्याकाळी ७-१५च्या सेवाग्राम एक्सप्रेसने प्रस्थान ठेवले.मनमाडस्टेशनवर सर्वसहयात्रीशी ओळखदेख झाली.रात्री ११-३०च्या झेलमएक्सप्रेसने जम्मूसाठी प्रयाण केले.

आयुष्य म्हणजे....

लेखक चेतन677 यांनी शुक्रवार, 19/09/2014 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
"आयुष्य म्हणजे काय असते, आयुष्य म्हणजे असतो एक संघर्ष... जन्मापासुन ते जन्माच्या शेवट पर्यंतचा, आयुष्यातलं ध्येय गाठताना बरीच माणसे भेटतात, काहीजण आपल्याला या प्रवासात एकटेच सोडुन निघुन जातात, काहीजण शेवटपर्यंत साथ देतात... आयुष्यातली खरी मजा आपले ध्येय गाठल्यावर नसते, तर त्या प्रवासात असते...... तसे तर जन्माला अनेकजण येतात आणि मरतातही, पण खरे जीवन तेच जगतात जे संघर्षात जगतात....."

ह्रुदया मध्ये घर बांधु या,अशा घराला दार कशाला?

लेखक खुशि यांनी शुक्रवार, 19/09/2014 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
जन्म कसा आणि कुठे घ्यायचा, हातामध्ये नसे आपुल्या, ह्रुदयामध्ये घर बाम्धु या, अशा घराला दार कशाला? कोण धर्म आणि जात कोणती, हाती काहीच नसे आपुल्या, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला? जातिभेद अन धर्म विसरुया, साथ देउ या सुखदुखःला, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला? जिव्हाळ्याचा गाव असावा, राग आणि रोष कशाला, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला? परस्पराना समजुन घेऊ, वाद आणि तक्रार कशाला, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार

क्षितीज चांदणी......

लेखक माझं आभाळ यांनी शुक्रवार, 19/09/2014 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
फिरुनी उगवली पुन्हा लाजरी चांदणी ती क्षितीजावरी … डोळे तिचे भिरभिर अवघे शोधी साजणा दूर नभी …. सैरभैर निळ्या नयनी तिच्या तो येण्याचे भास खेळती …. क्षणात हसरी क्षणात बावरी तिच्या चेहर्याचे रंग बदलती …. हळूच लपलेला ढगा आडूनी चांद हासला खट्याळ परी …. लपंडाव प्रीतीचा अबोल आभास गोड अंतरंगी …. चंद्राच्या चांदण्यात मग अवघी रात्र न्हाऊन निघाली …. थरथरनाऱ्या ओठांपरी चांदणीही शहारून गेली …. प्रेमात आकंठ बुडुनी रात्र मग अवघा रंग निळा झाला …. चंदेरी झालर स्वप्नांची लेऊन गंध श्वासात मिसळूनी गेला ….

"अखेर सेना-भाजप युती तुटली?" .........

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 19/09/2014 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
"अखेर सेना-भाजप युती तुटली?" अश्या आशयाची बातमी मटा च्या वेबसाईट झळकली आहे, थोडक्यात खालीलप्रमाणे मजकूर आहे. "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या युतीची मुहूर्तमेढ रोवली होती, ती शिवसेना-भाजप युती तुटल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या महासंग्रामात हे दोन्ही पक्ष स्वबळावर रणांगणात उतरणार आहेत.

......आणि आमची पितरं जेवली.

लेखक भिंगरी यांनी शुक्रवार, 19/09/2014 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
. पितृपक्षात पितरांना जेवायला घालतात. एक पिढी गेली कि पुढच्या पिढीचा नंबर...... माझे सासूसासरे असताना आमच्याकडे द्वादशीला पितरं असत. ते दोघेही गेल्यानंतर (सासरे चतुर्दशीला व सासूबाई पितृपक्षात नवमीला गेल्या.)श्राध्द कोणत्या दिवशी घालावे हा प्रश्न पडला. कारण प्रत्येकवेळी वेगवेगळे करणे सगळ्यांच्या दृष्टीने सोपे नव्हते.म्हणुन ब्राह्मणाने अष्टमीला दोघांचे एकत्र करायला सांगितले .त्याप्रमाणे १९९८ च्या पितृपक्षात अष्टमीला केले. आम्ही वेगळे राहत असलो तरी सासू-सासरे आमच्याकडे राहत असल्याने सगळी कार्ये आमच्याकडेच होतात.त्याप्रमाणे हेही कार्य झाले.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 19/09/2014 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
मानवाने ज्या दिवसापासून सागरसंचाराला सुरवात केली आहे, त्या दिवसापासून पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या जलतत्वाच्या या सर्वात रौद्र अविष्काराशी त्याचं अनोखं नातं निर्माण झालेलं आहे. सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये आणि ग्रंथांमध्ये मानवाच्या सागराशी असलेल्या बंधाचे उल्लेख आढळतात. इजिप्शीयन आणि ग्रीक संस्कृती बहरल्या त्या भूमध्य समुद्राच्या सान्निध्यात तर द्रविडीयन संस्कृती बहरली ती हिंदी महासागर आणि त्याचे भाग असलेल्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या काठी. पूर्णत्वास गेलेल्या संस्कृतींनी नित्यनवीन प्रदेशाची आस बाळगली होती.