'ब्ल्यू प्रिंट कि कार्बन प्रिंट ?'
'ब्ल्यू प्रिंट कि कार्बन प्रिंट ?'
म.न.से. ची तथाकथित ब्ल्यू प्रिंट आली एकदाची.
९ वर्ष काम चालू होत यावर.(म.न.से. स्थापन होऊन ८ वर्ष झाली; तारीख ९ मार्च २००६)
ते असो.
२००९ च्या निवडणुकीत म.न.से.नी 'वचकनामा' जाहीर केला होता,त्यावेळी 'मराठी' हा मुद्दा महत्वाचा होता;आणि "खळ फट्याक" ला साजेसा होता.
कालच्या जाहीरनाम्याच्या कव्हरवरचे ब्रीद वाक्य "हो हे शक्य आहे" आणि निळ्या रंगातला राज ठाकरे यांचा फोटो म्हणजे चक्क बराक ओबामाच्या जाहीरनाम्याची कॉपी आहे.
म.न.से.
आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ६
--------
१८५२
--------
१० जानेवारीला बर्फावरुन वाटचाल करत जॉन रे फोर्ट गॅरी इथे पोहोचला. तिथून रेड नदीच्या काठाने पदयात्रा करत त्याने सेंट पॉल गाठलं. सेंट पॉलहून निघून शिकागो - हॅमील्टन - ऑन्टारीयो - न्यूयॉर्कमार्गे मार्च अखेरीस तो लंडनला परतला.
इंग्लंडला परतल्यावर रे ला बीची बेटावर फ्रँकलीनच्या मोहीमेचे अवशेष आणि तीन कबरी आढळून आल्याची बातमी कळली. पुढच्या वर्षी आर्क्टीकमध्ये परतून फ्रँकलीनचा शोध घेण्याची आणि नॉर्थवेस्ट पॅसेज जोडणार्या शेवटच्या भागाचा शोध घेण्याची त्याने योजना आखली.
वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर मॅक्क्युलरच्या तुकडीची स्लेजवरुन भटकंती पुन्हा सुरु झाली.
नवीन महाराष्ट्र
नुकतीच युती आणि आघाडी तुटल्याची बातमी आली आहे.
नवीन संभावित सरकार माझ्या मता प्रमाणे असे असु शकते.
भाजपा + राष्ट्रवादी + इतर (मनसे+रिपाई+स्वाभिमानी+शेतकरी) असल्यास.
कारण भाजपा केंद्रात असल्याने व मोदींचे बळ व जनतेची भाकरी फिरवायची ईच्छा. तसेच शिवसेनेचा आजवरचा वरचष्मा मोडीत काढ्ण्याची सुयोग्य संधी. त्यामुळे भाजपा आनंदाने एकटी लढणार. राष्ट्रवादीला माहित आहे की आपण सत्तेत येण्याची संधी फारच कमी आहे. मग आताच एकटे लढ्लो तर निकाला नंतर जो जिंकेल त्या सोबत पाट मांडायला मोकळे. महत्वाचे म्हणजे राष्ट्र्वादी सत्तेशिवाय टिकु शकत नाही हे मान्यच करावे लागेल. काँग्रेस ला वाली नाही हे नक्की दिसते.
अस्तित्व नसलेला माणूस (दिर्घकथा) भाग - १
“कुठून सुरवात करावी? कुठून ही सुरवात केली तरी तुम्हाला काय फरक पडणार म्हणा. येथे फक्त फरक पडणारा एकच व्यक्ती आहे आणि तो म्हणजे मी. कारण ते सगळे आठवून आठवून मला सांगावे लागणार प्रत्येक क्षण, मिनिट, तास, दिवस, महिने आणि वर्षे पुन्हा एकदा जगावे लागणार... तो आनंद, तो त्रास, ती यातना आणि ते अतीव सुख! आपल्या आपल्याच बद्दल खूप विचित्र अश्या कल्पना असतात आणि त्या विचित्र आहेत याची आपल्याला जाणीव देखील नसते. प्रत्येकाला एक आरंभबिंदू असतो आणि एक त्याची ओळख असते. आणि ती ओळख आयुष्यभर त्याला सावली सारखी साथ देत असते.
नक्षत्रांचे देणे
काल नक्षत्रांचे देणे बघताना शांता शेळकेंच्या ओळी ऐकत होतो..
जुन्या आजोळाची आता
पार झाली पडझड
ओटी अंगण ओसरी
एक राहिले ना धड
हरवले बाळवय
खोल जिव्हारी लागले
उठे मुकाट तिथून
मन शिणले भागले
क्षणभरही वळून
नाही पाहिले मी मागे
काय राहिले तिथेच
काय आले मजसंगे
काय राहिले तिथेच, काय आले मजसंगे? विचार करता करता हे काहीसं सुचलं.
कमिटी (शतशब्द्कथा )
'कमिटी येनार' म्हटल्यावर सगळी संस्था कामाला लागली. बऱ्याच फाईली हालल्या.
कमिटीचा दिवस सणासारखा सजला होता.
मिटिंग हॉलमधे लंबगोल टेबल- त्यावर सफेद बेडशिटं टाकालीवती.
पाटील सर फाईली ठीक करत होते. काजू बदामाच्या बाउल्समधून थोडे तोंडात टाकून लेव्हल बरोबर करत होते.
इतक्यात ''कमिटी आली..'' असा गलका झाला.
सदस्यांनी जागा घेतली. फाईली चाचपल्या. पाकीट ओक्के असल्याचं सराईतपणे हेरलं.
चेरमनसायाबाकडं बघून कसनुसं हसले.
चष्म्याच्या वरून बघत महाजनसाहेब म्हटले "यावेळी संस्थेने प्रगती चांगली केलीय. पण... तेव्हढा टीचिंग स्टाफ आणा जरा ''
''तुमचं मार्गदर्शन असल्यावर काय सर?
आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा. बाकी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. मध्ये असलेल्या अंधश्रद्धा विरुद्ध लढणे त्यांना उपयोगशून्य वाटत असावे. असे असेल तर त्यांनी त्यांचे संघटनेचे नाव बदलून हिंदूधर्मश्रद्धाविरोधी संघटना असे नाव द्यावे. धार्मिक अंधश्रद्धांपेक्षा ह्या इतर क्षेत्रातल्या अंधश्रद्धा जास्त भयानक आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत.
अनवाणी नवरात्र
नमस्कार मंडळी,
आजपासून नवरात्र सुरु होतयं. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. गरब्याच्या साथीने हे नउ दिवस जाउन दसरा कधी उजाडतो ते कळतहि नाहि. दसर्याच्याहि सर्वांना आगाउ शुभेच्छा.
वेल तर ह्या कालावधीत काहि लोकं नॉनवेज तर खात नाहिच पण ९ दिवस सगळीकडे अनवाणी फिरतात; अगदि ऑफिस ला सुद्धा बिना चप्पल / बूट येतात. हा नक्कि काय प्रकार आहे? हे असं करण्यामागे नक्कि काय भावना आहेत?
व्यक्तिश निदान मला तरी हे पटत नाहि.
मी पयला... ???
मी पयला... हा प्रतिसाद अनेक धाग्यांवर मी पाहिला, मला याचा अर्थ नाही समजला. किंवा हा नियम जेव्हा लागू झाला असेल तेव्हा मी मिपावर येत नसेन त्या वेळचा असेल. पण एखाद्या उत्तम धाग्याची सुरवात अश्या प्रतिसादाने होते तेव्हा काय होते माहिती आहे? अनेक वाचक हे आधी प्रतिसाद वाचतात व मग लेख वाचायला घेतात. त्यांना हा "मी पयला..." असा प्रतिसाद दिसला की ते धागा सोडतात व दुसरा उघडतात, कारण मी असेच करत होतो. आपण एकदम जाणवले व असे धागे आवर्जून वाचले तर धागे खरच उत्तम व माहितीपूर्ण होते पण अश्या पहिल्या प्रतिसादाचा सोस पाहून असेल त्यांच्या गप्पा-टप्पाचा विषय म्हणून मी सोडून दिले होते.
मिसळपाव