Skip to main content

सकाळी सकाळी कोठे वेळ असतो ....!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 21/11/2014 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी कोठे वेळ असतो थोडाही मोकळा मोकळा ...? ठेवायचा असतो चहा कधी कमी कधी जास्त साखर मात्र थोडी इकडे थोडी तिकडे नंतर असतोच स्वयंपाक नव-याचा भरायचा असतो डबा डब्यात थोडेसे हे थोडेसे ते निघता निघता खिडकीतून बघत बसते कोप-यावर वळले की मात्र थोडा दम खाते मग मुलांचे - थोडे थोडे दटावते मुलाना कधी धम्मक लाडू देते पाठीला सुतासारखे होतात सरळ स्वताला आवरून घेण्यासाठी थोडी थोडी मदत मात्र घेतात पोरांचे करता करता जीव मात्र हैराण होतो त्यांच्या डब्यात त्याना हवे तेच हवे असते रोज रोज बटाटा त्यांचे अगदी फेव्हरेट असते …. मुले गेली तरी सुटका होते कोठे ..?

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १०

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 21/11/2014 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
५-४ असा एकागुणाने आनंद मागे. १२ डावांपैकी आज दहावा डाव. दहाव्या आणि बाराव्या डावात आनंदची पांढरी मोहोरी. सस्पेन्स याहून जास्त काय असू शकतो? आज विशीला सुलतानढवा करावा लागणार. कोणते ओअपनिंग? कोणत्या हिकमती?

दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष:

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 21/11/2014 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष: १) हे लोक त्याच गोष्टी म्हणतात किंवा करतात ज्या दुसऱ्यांनी करू नये असे यांना वाटते. २) हे लोक त्या गोष्टी आणि नियम कधीच पाळत नाहीत ज्या इतरानी पाळाव्यात असे यांना वाटते. 3) यशस्वी लोकांवर हे नेहेमी टीका करतात आणि त्यांचा द्वेष करतात. ज्या गोष्टी ते प्राप्त करू शकत नाहीत त्याबद्दल ते द्वेष आणि तुच्छता बाळगतात. ४) हे लोक इतरांच्या आयुष्याचे अंधानुकरण करतात.

नातं - भाग २

लेखक शिरीष फडके यांनी शुक्रवार, 21/11/2014 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
नातं - भाग २ प्रत्येक व्यक्तिची साधारणतः किंवा प्रामुख्याने चार प्रकारची आयुष्यं असतात. वैयक्तिक आयुष्य, कौटुंबिक आयुष्य, सामाजिक आयुष्य आणि व्यावहारिक किंवा व्यावसायिक आयुष्य. या चार निरनिराळ्या आयुष्यातील प्रत्येक नातं म्हणजेच चार वेगवेगळ्या प्रकारची नाती. वैयक्तिक नातं, कौटुंबिक नातं, सामाजिक नातं आणि व्यावहारिक किंवा व्यावसायिक नातं. या प्रत्येक नात्यामध्ये एक ठरावीक भूमिका प्रत्येक व्यक्ती बजावत/निभावत असतो. पण जर त्या भूमिकांची सरमिसळ झाली तर काय होतं ते या कथेतून समोर येतं.

बिड्या मारायला, तंबाखू मळायला निवांत टपरी

लेखक आगाऊ म्हादया...... यांनी शुक्रवार, 21/11/2014 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून दचकू नका. मी माझ्या प्रोजेक्ट साठी एक विषय घेतला आहे. Barriers to intention to quit tobacco among adult tobacco users. आता यासाठी किती जणांना विचारू ना की तुम्ही सेवन करता का म्हणून...म्हणून मीच टपर्यांवर जाणार आहे. आपण पीत असलो काय नसलो काय, चांगल्या निवांत टपऱ्या नक्की माहित असू शकतात, खास अड्डे असू शकतात. ४०० लोकांचा इंटरव्यू मला घ्यायचा आहे. सर्वांची माहिती अत्यंत गुप्त ठेवली जाईल, अन माझ्या रिसर्च साठी त्याचा उपयोग केला जाईल. Intenet based survey हे भारतात तरी सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास असमर्थ ठरतात.

बलबन का मकबरा

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 21/11/2014 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
क़ुतुब मीनारपासून थोड्याच अंतरावर महरौली Archeological Park आहे. तिथे आडवाटेला , काटेरी झुडपांत अनेक भग्नावशेष विखुरलेले दिसतात. आपण त्यातून मार्ग काढत पुढे जावे.एका मकबर्‍याचे भग्नावशेष दिसतील. खचलेल्या भिंती दिसतील. भिंती कसल्या! दगडमातीचा निव्वळ रचलेला थर ! त्यावर दिलेला मुलामा पार उडालाय. कधीकाळी भिंतींना मुलामा दिलेला होता, त्यावर नक्षीकाम होते ह्याची साक्ष देणारा एक छोटासा तुकडा तेवढा एका भिंतीवर दिसेल. छत कधीचेच उडालेय. या चार भिंतींच्या आत, आकाशाच्या छताखाली , लाल वालुकाश्मात बांधलेली एक कबर दिसेल. कबरीचे काही दगड गायब झाले आहेत, काही मोडकळीस आलेले आहेत.

गांधारेश्वर

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 21/11/2014 03:57 या दिवशी प्रकाशित केले.
चिपळूणला गांधरेश्वर नावाच शंकराच देउळ आहे.मूळ शहरापासून जरा बाजूलाच आहे.वाशिष्ठी नदीकिनारी हे वसलय.माझ एक आवडत देउळ.खर तर देउळ साधास आणि छान आहे.पण त्याभोवतीचा परिसर जास्त रम्य आहे. शंकरच देउळ असल्याने सहाजिकच सोमवारी इथे जरा गर्दी असायची आणि श्रावण सोमवार असेल तर जास्तच.नदीकिनारी असल्याने नदीत उतरायला छोटासा घाट आहे.७/८ पायरया असतील जांभया दगडाच्या.तिथून मस्त नदीच रुंद अस पात्र दिसत.पायरया उतरुन नदीत पाय धुवायचे आणि मग देवाच्या दर्शनाला जायच अस आमच ठरलेल असे.देवळात गेल की आधी छान मांडव आणि मग समोर आधी नंदी आहे.त्याला नमस्कार करून पुढ ४ पायरया उतरुन मग गाभारा आहे.आत शंकराची कळिभोर

घटकाभरचं झुरणं..

लेखक Targat Porga यांनी गुरुवार, 20/11/2014 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम! हा शब्द तुम्ही फक्त ऐकलेला,वाचलेला असतो.त्या बाबतीत तुम्ही जास्त विचारही केलेला नसतो ती केवळ एक रम्य कल्पनाच आहे अशीच तुमची समजूत असते.ह्या गोष्टीची तुम्हालाही अनुभूती मिळावी ही कल्पना तुम्हाला कधी कधी शिवून जाते पण तुम्ही मात्र 'श्या !आपलं काम नाही हे प्रेम बीम ' अस मनातच म्हणून ती कल्पना करणं सोडून देतात.त्याचे फक्त वाईटच परिणाम असतात असं म्हणून तुम्ही स्वतःला समजावतात.

सीट

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 20/11/2014 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
(कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांची माफी मागून) खचाखच भरलेली बस स्टॉपवर उभी राहून पहा बघ माझी आठवण येते का? हात लांबव, पावलांवर झेलून घे बुटांचे मार इवलसं दुःख पिउन टाक बघ माझी आठवण येते का? रिक्षाने उडणारा धुळीचा लोट अंगावर घे, पदर सांभाळ, हात दाखव इतक करुनही तो नाहीच थांबला तर चालत जा, स्टेशनवर ये तिथे गर्दी उसळलेली असेलच, फलाटावर पाय रोवून उभी रहा सारी गर्दी सरकेल एकाच डब्यात, बघ माझी आठवण येते का? मग चालू लाग, नजरेच्या अगणित सुया टोचून घे चालत रहा टॅक्सी मिळेपर्यंत, ती मिळणार नाहीच, ऑफिसला ये केस सेट करु नकोस, घाम पुसू नकोस, पुन्हा त्याच गॅलरीत ये आता तो तारेवर बसलेला कावळा बघ बघ माझी आठव