बरोबर सव्वातीन-साडेतीन वर्षे झाली असतील पण सगळे जसेच्या तसे आठवतेय. तो सतत हुलकावणी देणारा पाउस, त्या घनगडावर चावलेल्या मधमाश्या, ते एकोल्याचे आणी केवणीचे टेबल लँड, ती चुकलेली वाट आणि सगळे काही....
---------------------------------------------------------------------------------------
ह्याची सुरुवात कधी झाली ते नक्की आठवत नाही पण काही वर्षांपुर्वी सांगाती सह्याद्रीचा वाचत असताना बहुदा माझ्या मनात ठिणगी पडली असावी. २००६ साली सवाष्णी घाट केला तेव्हाच तेलबैला, सुधागड परीसराने मोहीनी घातली होती.