Skip to main content

खूप दूध शिल्लक आहे

लेखक गम्मत-जम्मत यांनी शनिवार, 23/09/2017 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
घरी २ लिटर दूध शिल्लक आहे. खाणारी तोंडे २ च आहेत. कृपया आरोग्य दायक पाकृ/ पर्याय सुचवा. १. पिउन टाकणे हा पर्याय करून झाला आहे. जास्त प्यायला जमत नाही. २. नवरोबा जास्त गोड खात नाही. हे मला प्रश्नोत्तरे मध्ये लिहायचे होते. पण access denied. धन्यवाद.

स्पर्शाला पारखा... पुरुष

लेखक मराठी कथालेखक यांनी शनिवार, 23/09/2017 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्श ही सुद्धा एक संवादाची भाषा आहे असं म्हंटलं जातं. चित्रपट, मालिका यांतली पात्र अनेकदा एकमेकांना स्पर्श करताना दाखवतात, अनेकविध नात्यातले (मैत्री) स्त्रीपुरुष हातात हात घेतात , कधी आलिंगन देतात , कधी स्नेहाने, प्रेमाने, कधी सांत्वन करण्यासाठी , तर कधी धीर देण्यासाठी..काही वेळा तर रोज 'गुड मॉर्निंग/नाईट' म्हणत 'हग करणे' ही दाखवतात. आणि यात पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी हे तर आलेच पण त्याशिवाय आई-वडील आणि मुलगा/गी, मैत्रमैत्रिणी, आजी आजोबा आणि नातवंड इतकेच काय तर कधी दीर-वहिनी वगैरे वगैरे असे अनेक नात्यात होणारा स्पर्श अगदी सहज दाखवतात. मला त्यावर अजिबात टीका करायची नाही.

संघर्ष : भाग ०४

लेखक दिपक लोखंडे यांनी शनिवार, 23/09/2017 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ०३ पासून पुढे.. १०:४० ला अनिकेतची गाडी सेंट्रल कॅफे समोर येऊन थांबली राधा कॅफेच्या दाराशीच उभी कोणाचीतरी वाट बघत असताना दिसली. अनिकेतने गडबडीने त्याची गाडी पार्क केली आणि तो राधा जवळ येऊन थांबला. त्याला समोर बघून राधा म्हणाली ‘अनिकेत तू लेट आहेस..’ ‘आज अनुला कॉलेज पर्यंत सोडावं लागलं म्हणून थोडा वेळ झाला’ अनिकेत राधाला समजावण्याचा सुरत म्हणाला.. राधा त्याच्याकडे बघत हसली आणि म्हणाली ‘अरे इट्स ओके..

ग्राम"पंचायत" लागली..!! -2

लेखक विशुमित यांनी शनिवार, 23/09/2017 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
ग्राम"पंचायत" लागली..!! -1 यंदा बिनविरोध होणार नाही, हे माझ्या अगोदर नानांनी त्या होलपाटण्या मन्याला का सांगितले असावे? घरातल्या माणसांना किंमतच नाही दिली कधी नानांनी. कधी कोणासमोर चांगल्या कामाचे कवतुक नाही केले. स्वतःला सांगलीच्या आबांचे पाईक समजत राहिले आयुष्यभर. वडाच्या झाडाखाली रोपटे येत नाही हे मान्य पण कोणालाच वर येऊन नाही द्याचे, असे एकंदरीत वडाचे लॉन्ग टर्म धोरण असावे बहुतेक. कधीच कुठल्या मिटिंग मध्ये सहभागी होऊ नाही दिले.

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग १ )

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 23/09/2017 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
तिला न पाहता होणारी तगमग न समजणारी होती , काय होतंय आपल्याला ? नक्की काय होतंय ? आपण तिच्या प्रेमात , ... छे उगाच काहीतरीच काय ,.... पण मग असं का होतंय .. समोर असतो तेव्हा तिच्याशी पटत नाही आणि भांडण होतात आपली , असं वाटत कि ती नसलेली बरी, पण ती नसली कि असं का वाटतय ? कि काहीतरी चुकतंय .. नाही माहित पण असं वाटतय हे नक्की आहे ..... " ए हाय , कसा आहेस ? " " कुठं होतीस ? " " का आता काय आहे ? काय झालाय का ? हे बघ असं प्रत्येक गोष्टीसाठी मलाच जबाबदार धरू नकोस . मला तर माहितही नाही काही ....." " तू नव्हतीस तर ठीक वाटत नव्हत .

चल, घरी चल .....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 22/09/2017 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
तू मरून, मोजून १३ वर्षे, ५ दिवस आणि काही तास झालेत. काय काय घडत नाही इतक्या काळात? म्हटलं तर फार काही. म्हटलं तर काहीच नाही. मरणाच्या क्षणापाशी काल गोठून जातो. पण, तू निघून गेल्यापासून back up ठेवल्यासारखा भेटतोयस. आधी फार जड गेलं. मी अनंत काळ अशीच रडत राहणार असं वाटलं. पण तसे नाही घडले. तू परत भेटलास! माझ्या घरासमोर मंदिरापाशी, रात्रभर पावसात वाट पहात उभारलेला. का तर, मी एकदा तरी खिडकी उघडेन, किती पाउस पडतोय असं म्हणत बाहेर बघेन, आणि तुला दिसेन. पहाटे पाऊस टीपटीप करीत थांबला. पुजारी आला. एवढ्या पावसात चहाचा रिकामा कप कोण ठेवून गेलं, म्हणून इकडे तिकडे विचारीत राहिला.

"जलवंती" वर प्रवेश करण्याआधीचे इशारे

लेखक Shashibhushan यांनी शुक्रवार, 22/09/2017 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
महासागराचे अथांग पाणी........ संकटे एकटी कधीच येत नाहीत पाण्याइतक्याच खोल अशा नियतीची सदैव साथ घेऊन येतात वरचे असीम आकाश.......मनातल्या साऱ्या आकांक्षा चुरडून टाकणारी निराशेची पोकळी दूर राहिलेला किनारा.......कधीकाळी पाहिलेली स्वप्ने ........ आठवणीतच राहिलेले आप्तस्वकीय तरीसुद्धा तरीसुद्धा प्रवास कुणी टाळत नाही पाय थांबत नाहीत हात थकत नाहीत डोळे शिणत नाहीत मन मात्र स्वप्नांचे पंख लावून दिशाहीन असीम आकाशात विहार करतच रहाते अशा प्रवासाला शेवटचा मुक्काम नसतो असते ती फक्त अर्ध्यातून सुटलेली सोबत कधी घरादाराची कधी सख्या-सवंगड्यांची जिवलगांची कधी कधी तर स्वतःची सुद्धा.

"जलवंती"ची ओळख

लेखक Shashibhushan यांनी शुक्रवार, 22/09/2017 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
"जलवंती" एक अजस्र नौका जी कधीही बुडणार नाही असा तिच्या निर्मात्याचा विश्वास होता "Titanic, can never sink" "Titanic" केवळ नौका नव्हे, हे एक स्वप्न! केवळ एका मानवाचे नव्हे तर नियतीला सतत आव्हान देणाऱ्या समस्त मानवजातीचे स्वप्न हि तिची कथा जलवंतीची त्या कलाकाराची त्या नौकेची जी कधीच बुडू शकणार नव्हती कधीच ! ! !

जलवंती

लेखक Shashibhushan यांनी शुक्रवार, 22/09/2017 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
“जलवंती” च्या निमित्ताने साल आता नेमके आठवत नाही. १९९२ किंवा ९३ असेल. “Titanic” नावाचा नवीन सिनेमा आला होता. पाहिला. त्यात न आवडण्यासारखे काहीच नव्हते. प्रचंड आवडला.

स्वयंपाकातील आयुधं

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 22/09/2017 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
खल आणि बत्ता करतात ठणाणा आम्हाला काहीतरी काम सांगाना  स्टोव्ह शेगडीला लागली घरघर ग्यास सिलेंडर आला घरोघर काड्याची पेटी हिरमसून बसली लायटरने माझी जागा पटकावली यांत्रिक युगाला झाली सुरवात जुन्या बुढयाना करुया बाद वीज नी यंत्रे रुसतात जेव्हा जुने ते सोने म्हणतात तेव्हा लहानपणीच हे बडबड गीत म्हणताना मजा यायची. तरीही त्यावेळच्या त्या स्वयंपाक घरातल्या आयुधांचे अनन्यसाधारण महत्व मान्य होतेच. मला अजूनही आठवत खास पाहुणे आले की माझी आई खास कॉफी करायची. त्यासाठी खल-बत्यातून मस्त वेलची कुटायची आणि खिसणीवर जायफळ खिसून ते त्या कॉफीच्या पाण्यात टाकायची. आमच्या लहानपणी सर्रास चहा-कॉफी मिळत नसे.