यासंदर्भात इथे छान लेख आहे. विषय काहीसा अवांतर वाटला तरी भारत-चीन-पाकिस्तान विषयी आहे. चीनला आशियात सत्ता समतोल राखायचा आहे. त्यासाठी पाकिस्तान त्यांना हवा आहे. बाकी त्यांना पाकशी दोस्तीत काहीच रस नाही. थोडक्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर मैत्री वगैरे परस्पर फायद्यावरच जास्त ठरते.
जमल्यास हेही वाचा.
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
हा आहे आमचा स्वभाव
राजकारणात कोणीही कायमचा मित्र नसतो किंवा कायमचा शत्रुही नसतो
सहमत. ह्या मैत्रीमागे केवळ संबंधीत राष्ट्रापासुन होणारा फायदा लक्षात घेतला जातों. नितीमुल्ये,नैतिकता वगैरे आंतराष्ट्रीय राजकारणात गुंडाळून ठेवलेली असते(बर्याच वेळा ती ठेवावी लागते).अमेरिकेचेच उदाहरण घ्या-२० वर्षापुर्वीपर्यंत रशियाविरुद्ध लढणारे अफगाणी 'लढवय्ये,मुजाहुद्दीन' होते.९/११ नंतर Clash of civilization/they hate us वगैरे थियर्या पुढे आल्या.(अमेरिकेला घातलेली ही शेवटची शिवी!!!!)
भारताचे परराष्ट्र धोरण दुसर्या राष्ट्रात नाक न खुपसणे आहे. निदान असे ते म्हणतात तरी.!! जगात लोकसंख्येने दुसर्या असलेल्या भारताला पेट्रोल पुरवणार्या अरब राष्ट्रांशी पंगा घेवून चालणार नाही.जगातील बहुतांशी देश तसे संबंध ठेवूनच आहेत.
मग मला सांगा, भारताचे मित्रदेश तरी कोणते?
बरेच आहेत.ज्या राष्ट्रांत भारतियाना प्रवासी व्हिसा सहज मिळतो ती राष्ट्रे भारताची मित्र मानायला हरकत नाही. अमेरिका,रशिया,ब्रिटन,कॅनडा ,फ्रांस्,जर्मनी हे देश कुठल्या ना कुठल्या कारणाने भारताचे मित्र आहेतच्.मैत्री अनेक प्रकारची असते-राजकिय्,आर्थिक्,सामाजिक्,सांस्क्रुतिक,लष्करी.
दुसर्याच्या घरात न डोकावण्याची प्रथा भारताप्रमाणे इतर देश ही पाळतात. तेव्हा भारतात बाँबस्फोट झाले किंवा दहशतवादी घुसले तर इतर मित्र राष्ट्रांनी भारताच्या वतीने पाक/बांग्लादेशला दम भरावा अशी अपेक्षा भारताने करणे व्यर्थ आहे. नक्षलवाद्,काश्मीर्,फुटेरतावादी चळवळी हे प्रश्न भारतालाच सोडवावे लागतील.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
काय रे मोठ्या मुलांनो, काय गडबड आहे?
आत्ता कुठे शांतता झालीये असं वाटेपर्यंत परत नवा वाद? अरे मला जरा सुखानं जगु द्याल की नाही?
ते असो, कुणाला शिव्या देताय? मी पण येऊ का? ;)
-धम्या.
हल्ली आमचा अवलिया फार पियाला लागला आहे असं ऐकुन आहे. त्यामुळेच मित्रदेशांच्या चर्चेतही अशी प्रतिबिंबं आणु पाहतोय. :D
बाकी, आमच्या देशाला काही कुणा तथाकथित मित्रदेशांची गरज नाही. आम्ही जगाला फाट्यावर मारतो. :D
-(साधा फुलचंदप्रेमी) धम्या.
-------
च्यायला, डांबिसकाका, खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हो...एकही देशाचं नाव डोळ्यापुढे येईना बघा. :?
मला वाटते की जर्मनी आपला मित्र देश असावा ( नसल्यास माझी वैयक्तीक हरकत नाही हे जाता जाता नमुद करतो, तसेच तिथल्या युरोच्या नोटांच्या रंगाबाबत आणि उबेबाबत माझे ज्ञान अगदीच तुटक आहे हे ही आग्रहाने नमुद करतो ) ...
हिटलरने म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी "२ रे महायुद्ध" छेडले होते अशी आतल्या गोटातली बातमी आहे, तशा अर्थाच्या ( पक्षी : आर्य , इथले उच्चवर्णिय विचार वगैरे ) चर्चा "कुठेतरी" वाचल्याचे स्मरते.
संदर्भ नाही म्हणुन जास्त लिहीत नाही, बाकी चालु द्यात ...
तसेच सध्या आमचा आवडता खेडाळु "इब्राहिमोविच" हा स्विडीश असल्याने स्विडनही आपला दोस्त असेल वाटते, शिवाय आज मी डब्यात बटाट्याची भाजी आणि लिंबाचे लोणचे आणले आहे हे आहेच ...
------
( मैत्रिपुर्ण ) छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
राजकारणात कधीच शाश्वत मित्र नसतात, फक्त शाश्वत हितसंबंध असतात अशी इंग्रजी म्हण आहे. (In politics, there are no permanent friends, but only permanent interests.)
त्यामुळेच निक्सनच्या कारकीर्दीत अमेरिकेने चीनबरोबरची खूप जुनी दुष्मनी/वैर सोडून चीनशी नवीन मैत्री केली व त्या मैत्रीतून सोविएत रशियाचा (USSR) काटा काढला. चीननेही रशियाबरोबरची मैत्री स्वतःचे हितसंबंध संपले हे जाणून बंद केली व अमेरिकेची मैत्री 'कबूल' केली. स्वतःला most favoured nation हा दर्जा द्यायला भाग पाडून आपली अमेरिकेतली निर्यात वाढवून आर्थिक संपन्नतेचा एक नवा विक्रम करून दाखविला. पण आता अमेरिकेकडे त्यांचे कर्ज फेडण्यासाठी व नवा माल रोखीने विकत घेण्यासाठी रोकड नाही हे लक्षात येताच त्यांनी जागतिक व्यापारासाठी डॉलर ऐवजी एक नवे चलन असावे ही मागणी जगापुढे मांडायला मागेपुढे पाहिले नाहीं.
आपल्याला नेहमी कमजोर ठेवायला चीनने पाकिस्तानशी दोस्ती केली. पाकिस्ताननेही लोटांगण घालून आपल्या प्रदेशाचा (काश्मीरमधला) तुकडाही चीनला देऊन टाकला व चीनशी मैत्री केली. त्यांच्याबरोबर अण्वस्त्रांबाबत देवाण-घेवाणही केली (कुणी कुणाला काय दिले हे जरा गुलदस्तातच आहे).
मी कधीच अमेरिकेच्या परराष्ट्रनीतीवर सरसकट टीका केलेली नाही. बुश-४१ व बुश-४३ व त्याआधी रेगन साहेबांनी पाकिस्तानला सच्चा साथीदार मानून त्याचे नको तितके लाड केले व आता पाकिस्तान हे अमेरिकेचे "अवघड जागेचे दुखणे" झालेले आहे. धरले तर चावते व सोडले तर पळते या परिस्थितीत अमेरिका तरी काय करू शकणार?
मी ओबामांवर त्यांनी आपल्याला व पाकिस्तानला एका पंक्तीत बसवले एवढ्या एका मुद्द्यावरूनच टीका केली व मी त्यांना एक निषेधपत्रही पाठविले. त्याचा लगेच उपयोग होणार नाही हे माहीत असून सुद्धा.
मी बर्याचदा लिहिले आहे कीं ओबामा हा एक चांगला माणूस वाटतो म्हणून आपण आपले अमेरिकेबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी पावले टाकावीत. हे माझे मत आजही आहे.
पाकिस्तान एका दृष्टीने भाग्यवान आहे कारण त्याचे भौगिलिक स्थानच त्याला महत्व प्रप्त करून देते.
पण पाकिस्तानची कुठल्याही मूल्यांवर न आधरलेली परराष्ट्रनीती, लोकशाही व लष्करशाहीमधील कायमचा "खो-खो"चा खेळ, लाचलुचपतीचा बुजबुजाट अशा कारणांमुळे तो देश हळू-हळू तालीबानच्या कह्यात चालला आहे. आज स्वात प्रांतात शारिया कायदा लागू करायलासुद्धा पाकिस्तान सरकार तयार झाले यावरून त्या सरकारची असहायता सहज कळते.
पाकिस्तानी राजकारणात फक्त जमीनदारांचीच सद्दी आहे. एकीकडे लष्करातही उच्च (श्रीमंत) घराण्यातील लोकांची निवड व राजकारणातही तीच गोष्ट व दुसरीकडे अमेरिकेकडून मिळालेले अब्जावधी डॉलर्स कुठे खर्चले गेले याचा पत्ता नाही हे सर्व तालीबानच्या पथ्यावर पडेल व ते राष्ट्र आज-ना-उद्या तालीबानच्या अधिपत्याखाली असेल. आज जसे "हमास"ने गाझा पट्टीत पाय रोवले आहेत तस्सेच. कारण? पॅलेस्ताईन ऑथॉरिटीचे अध्यक्ष महमूद अब्बास यांचे इस्रायलसंबंधी बोटचेपे धोरण. इस्रायल जॉर्डन नदीच्या पश्चिम किनार्यावर (जिथे जेरुसलेमही आहे) आज धडाधड वसाहती उठवत आहे व त्याविरुद्ध लढाई न करता अब्बाससाहेब गुळमुळीत वाटाघाटी करत आहेत हेच चित्र दिसतेय आज.
या सर्व गोष्टींमुळे अमेरिकेला आपली गरज जास्त-जास्त लागणार आहे व जसे चीनने धूर्तपणे आपले फासे टाकले तसे टाकू शकणारे राजकीय नेतृत्व आपल्याला हवे आहे. जबरदस्त एकीही हवी. आजच्या मितीस या दोन्ही गोष्टी आपल्या दृष्टिपथात येत नाही आहेत, पण ती गरज तोंडावर आली आहे.
आपले मित्र कोण या प्रश्नापेक्षा आपले शत्रू कोण हा प्रश्न जास्त योग्य वाटतो. या प्रश्नाला आपण सहजपणे चीन व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे व आपल्यातील एकीचा अभाव हे उत्तर देऊ शकतो. बाकीचे सगळे "सरशी तिकडे पारशी" यासारखे देश आहेत. आपण जर नेत्रदीपक प्रगती केली तर आपल्यामागे सर्व जग येईल.
असो. ही माझी जराशी भ्रमंती!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
भारताचा मित्रदेश. (आणि आता इटलीसुद्धा ;) )
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
प्रतिक्रिया
यासंदर्भा
सहमत
पार
ईंडीया, माल
काय रे
+१
जर्मनी ...
बिनशर्त पाठींबा
राजकारणात
माझ्या मते
फ्रान्स आहे की!