सविस्तर लिहिण्याचे मुद्दाम टाळले आहे.
कारण गाण्याचा भावार्थच असा आहे की प्रत्येकाची अनुभूती वेगळी असेल.
त्यात आपली अनुभूती लादून कुणाचा रसभंग करावासा वाटला नाही.
छान लिहिले आहे.
आवडले लेखन.
अशाच सुंदर गाण्यांबद्दल आणि रागांबद्दल लिहित रहावे ही विनंती.
तात्यांना ,बघू तुमच्या पासून स्फुरण घेऊन बसंताचं लग्न पूर्ण करण्याची बुद्धी होते का? :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
काय सुरेख नाव आहे कृष्णरंजनी! भूपेश्वरी पण मस्तच. नवीन रागाची माहिती झाली. अशीच मोलाची नवनवीन माहिती आपल्या लेखातून मिळत राहो!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखारूह की शायरी
छान लिहीलय.
सोप्या शब्दात वर्णन केल्याने माझ्या सारख्या सामान्य श्रोत्यालाही थोडफार समजल.
अशीच अजून माहिती येऊ द्या.
आणी हे गाणं तर केवळ महान आहे.
this is undoubtedly the most sensuous song in the world.
सुजय
छोटेखानी परंतु छान प्रकटन..
या गाण्याबद्दल आणि याच रागातले 'चढता सूरज धीरे..', या दोन्ही गाण्याबद्दल मी एकदा मिपाच्या मुखपृष्ठावर लिहिले होते! :)
तात्या.
तात्या आम्हाला ते वाचायला मिळाले नाही
ते वाचायला मिळाले असते तर एवढे डोकेफोड करावी लागली नसती
आणि या रागाची माहिती कुणाकडेच मिळाली नसती तर आपल्यालाच विचारणार होतो याबाबतो
असो
आपण लिहिलेल्या लेखा दुवा मिळेल काय
खर्जातल्या पंचमापासून वरच्या गांधारापर्यंत या गाण्यात लताबाईंचा सूर किती सहज फिरतो! साधारणपणे सलग सूर घेत जाणारे हे गाणे, 'दूर दूर तारकात, बैसली पहाट नहात' या ओळीत जरा निराळी स्वरसंगती घेते. 'बैसली' मधल्या 'बै' वरची तार 'रे' ते कोमल 'ध' ही मींड गाण्यात वैचित्र्य निर्माण करते. बाळासाहेबांना हे गाणे करतांना ही ओळ या मींडेसह अशी का घ्यावी वाटली हे त्यांची प्रतिभाच जाणो.
भूपातला गांधार कोमल झाला तर जसा 'शिवरंजनी' होतो, तसा 'धैवत' कोमल केल्यास 'कृष्णरंजनी'. तो कृष्णरंजनी या गाण्यात येतो.
भूपेश्वरी रागालाच प्रतीक्षा किंवा क्रुष्णरंजनी म्हणतात़, असे जागोमोहन प्यारे यांनी म्हटले आहे.
असे असेल तर प्रतीक्षा राग शंकर अभ्यंकर यांनी शोधला़, असे कसे म्हणता येईल.
मालक, आपण जाणकार आहात. कृपया भूपात कोमल ध घेतला की भूपकली/प्रतीक्षा होतो असं जनरलायझेशन करू नका. विशेषतः ज्याला आपण 'लाईट' संगीत म्हणतो त्याच्यावरून तर मुळीच करू नका. राग ही संकल्पना याच्यापेक्षा बरीच मोठी आहे. जरी स्वर सारखे असले तरी भूपकली/प्रतीक्षा सारखेच असायला हवेत असं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे दोन्ही राग मूळ भूप रागापेक्षा नुसते अंगापिंडानेच नव्हे तर रंगानेही बरेच वेगळे आहेत.
अन्वय'
हे ह्रदयाचे थोके चुकविणारे गाणे म्हणजे बाळासाहेबांची अगाध निर्मिती आहे. तरीपण मला सतावणारा एक प्रश्न ह्या गाण्याच्या वेळेस आणखी त्रास देतो; अफाट प्रतिभेच्या संगीत काराच्या डोक्यातून प्रसवलेली चाल जर 'लता ' नांवाचा स्वर पृथ्वीवर नसता तर त्या चालीचे काय झाले असते ?
ह्या गाण्याच्या रागाबद्दल मी ही अतिशय उत्सूक होतो. सुरेख माहिती ,आणि छान शब्दात दिलीत , खुश !
केशवराव,
अबके हम बिछडे या गझलेची लिंक सोबत दिली आहे
ही गझल ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की
ती मालवून टाक दीप या गाण्यासारखीच आहे.
त्यामुळे या गाण्याची चाल मालवून टाकच्या संगीतकाराला सूचली, असे म्हणता येणार नाही.
या चालीचे श्रेयच द्यायचे असेल, तर मेहेदी हसन यांना द्यावे लागेल, असे मला वाटते.
त्यामुळे या गाण्याची चाल मालवून टाकच्या संगीतकाराला सूचली, असे म्हणता येणार नाही.
तसं तर या संगीतकाराच्या बर्याच गाण्यांबद्दल म्हणता येईल...
अवांतर : (शिवाय एका टीव्हीवरील कार्यक्रमात त्यांच्या मानलेल्या भाच्याने त्यांचे एका वेगळ्या गाण्याबद्दल कौतुक करताना असेही म्हटले होते की ," बघा, स्पष्टपणे सांगितले यांनी की या गाण्यात त्यांना कोणत्या संगीतकारांची मदत झाली .. काय हा प्रामाणिकपणा"...)
...कोण रे तिकडे म्हणतोय की इतरांना श्रेय द्यायला थोडा उशीर झाला म्हणून...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
अब के बिछडे ( अमिताभ बच्चनचे गाणे.. पिक्चर कुठला?) बरोबर मी कन्फ्युज झालो... ते शिव रन्जनीत आहे.... तुम्ही सान्गताय ते अब के हम बिछडे वेगळे :)
कोमल ध भूप रागालाच प्रतिक्षा, कृष्णरन्जिनी, भूपकली ही नावे आहेत.... मालवून टाक आणि चढता सूरज ही याच रागात आहेत.. आणखी एक सुन्दर गाणे..... श्रीधर फडकेन्ची सुरवरदा रामा या राम्दास स्वामीन्च्या रचनाच्या अल्बम मध्ये आहे..... स्वर रन्गवावा, ताने स्वर रन्गवावा.. आरती टिकेकर.... अप्रतिम गाणे... ऐकाच ! :)
पूर्वीच्या काळी उत्तर भारतात दोन राग होते... सुबह की भूपाली आणि शाम की भूपाली... या दोन्ही रागानाच सुबह/ शाम की भूप असेही म्हणत.... सुबह की भूपाली मध्ये आरोही सूर प्रामुख्याने असतात.... प ध प ध प ग रे सा... असा अवरोह मध्य ष्ड्जावरच थाम्बतो.. खालचे ध आणि प शक्यतो येत नाहीत....... हा राग म्हणजेच देशकार राग.... खरे तर सगळ्या भूपाळ्या याच रागात असतात... त्यामुळे चढत्या सूर्याचा भास होतो... शरयू तीरावरी अयोध्या, ज्योति कलश छलके मध्ये हे जाणवेल...
श्याम की भूपाली ( भूप) मध्ये अवरोही सूर प्रामुख्याने असतात... मध्य ष्डजाला जोडून मन्द्र ध आणि प घेणे हा याचा गुण.... त्यामुळे उतरत्या सूर्याचा भास होतो.... सायोनारा आणि इन आखो की मस्ती के मध्ये हे जाणवेल... याच रागाला आज आपण भूप म्हणतो.... खरे तर हा सन्ध्याकाळचा राग आहे....
बर्याचश्या भूपाळ्या यान्च्या मध्येच कुठे तरी रेन्गाळतात... त्याना आपण भूप रागातच आहेत असे म्हणतो , पण वेळ मात्र सकाळची सान्गतो....
बरे झाले सुधारणा केली
कारण मेहेदी हसनचे अबके हम बिछडे वाजविताना
त्यातील शुद्ध गंधार ठळकपणे जाणवतो
मीही जरा गोंधळलो होतो
हे गाणे भूपेश्वरीतच आहे
बरे झाले सुधारणा केली
नाहीतर मीही हा शिवरंजनी असल्याचे समजून चाललौ असतो
धन्यवाद
प्रतिक्रिया
छान
सविस्तर लिहिण्याचे
छान लिहिले
अरे वा!
घ्या आस्वाद
छान
अरे वा
आणखी एक
छोटेखानी
दुवा मिळेल काय
मी ते जतन
दूर दूर तारकात ...
हेच म्हणतो
छान लेख. या
असे कसे
मालक, आपण
राग नसावा.
अतिशय छान माहिती .
केशवराव,
संगीतकार आणि श्रेय
"मालवून
धन्यवाद
अब के
धन्यवाद
बरे झाले सुधारणा केली
सारेगपधसा..