वा! मस्त विषय!
मलाही माझ्या शाळेच्या अश्या आठवणी आहेत पण माझ्या मुलाला मात्र त्याची पहिली शाळा तिथल्या भरपूर जाड पण प्रेमळ असलेल्या बाई असं काहीही आठवत नाही. त्यांच्याबरोबर काढलेला एकमेव फोटो मात्र आहे. त्यावेळी ,"आई, तू मिस् मरियासारखी जाड का नाहीस?" अशी तक्रार सारखी करायचा. हेही त्याच्या लक्षात नाही. आता सांगितलं तर जोरात हसतो.
रेवती
फारच सुंदर निरीक्षण आहे. मला असे वाटते की हे नैसर्गीक आहे. आपण मोठी माणस जरी "लहान पण देगा देवा" असे म्हणत असलो तरी मोठे होणे हे लहानांसाठी फारच कष्टाचे असते. साधे दात पडुन नवीन उगवण्याचे बघा. तशा प्रकारच्या वेदना आपण मोठे झालो की सहन करुच शकणार नाही. अशा अनेक घटना लहान मुलांच्या आयुष्या मधे घडत असतात की ज्या त्यांना न आठवलेल्याच बर्या. याचमुळे की काय निसर्गतः त्यांच्या मधे भुतकाळ विसरुन जाण्याची रचना असावी. जेणे करुन ते भविष्याला हसत हसत सामोरे जाउ शकतील.
मोठे झाल्यानंतरच्या आठवणी आजुबाजुचा समाजच आपल्याला विसरु देत नाही. ( आता हेच पहा ना माझे लग्न झाले आहे याचा विसर पडु लागे पर्यंत समोरील युवती मला काका म्हणुन हाक मारते)
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
प्रतिक्रिया
वा! मस्त
ग्रेट
फारच सुंदर
फार सुंदर
व्रत
आठवणींचा
खूप छान
अभिजीत दादा
छायाचित्रे