अजितदादांची मुक्ताफळे-- "राजू शेट्टींनी कारखाना काढला, की दूध संघ? का निवडून दिले?"

सुहास's picture
सुहास in काथ्याकूट
11 Jul 2009 - 12:26 am
गाभा: 

आजच्या "ई-सकाळ" मध्ये "राजू शेट्टींनी कारखाना काढला, की दूध संघ? का निवडून दिले?" या मथळ्याची बातमी बघितली.. अजित दादाचा फोटो बघितला म्हणून वाचली... सांगली जिल्ह्यातील एका उद्घाटन समारंभाच्या वेळी दादा असे म्हणाले हे कळले.. राजू शेट्टींवर टीका असती तर ही बातमी ठीक-ठाक होती..

पण पुढे दादा काय म्हणाले ते मात्र आपल्याला विचार करण्यास भाग पाडतेय.. दादा म्हणतात..

"तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू, सगळीकडे पाणी देऊ; पण तुम्हीही मते देऊन पाठिंबा द्या."

पवार यांचे स्वागत करताना टाळ्या वाजल्या नाहीत. त्याचा संदर्भ देत ते म्हणाले, ""मला वाटले लोक माझ्यावर नाराज असावेत म्हणून टाळ्या वाजल्या नाहीत; परंतु जयंत पाटलांच्या सत्कारा वेळीही टाळी वाजली नाही. मला वाटले, तुम्ही झोपला आहात काय. तुम्ही आम्हाला मते द्या. विकासकामे भरभरून देतो. फुकटात वाटायला आम्ही साधू-संत नाही.''

पवार म्हणाले, ""आम्हाला मते दिली तर एका वेळी दोन कंटेनर जातील, अशी व्यवस्था करू.'' आमच्याशी दगबाजी केली तर सायकलही जाणार नाही याची व्यवस्था करू, असे म्हणताच लोकांत हास्याची लकेर उमटली.

राजू शेट्टींबद्द्ल दादा काय म्हणाले? "पोकळ घोषणा करणाऱ्या राजू शेट्टींचे काय काम आहे दाखवा. त्यांनी दूध संघ, साखर कारखाना काढला? शिक्षण संस्थांचे जाळे उभारले? काय केले होते म्हणून त्यांना तुम्ही निवडून दिले? असे पुढे चालणार नाही. जे काम करतात त्यांच्या पाठीशी उभे राहा, तरच ते आणखी काही तरी मोठे काम करतील."

संपूर्ण बातमी इथे वाचता येईल..
http://beta.esakal.com/2009/07/09234934/western-maharashtra-ajit-pawar.html

राजकारणातील सरंजामशाही आणि घराणेशाहीची पाठराखण दादांच्या आणि राष्ट्रवाद्यांच्या गेल्या १० वर्षांच्या कारकिर्दीत झाली आहे हेच राजू शेट्टी निवडून येण्याचा मूळ कारण दादा विसरतायेत..! आपण ते विसरू नये हीच अपेक्षा म्हणून हा काथ्याकूट..!

ता.क.-- हा संपूर्ण कार्यक्रम शासकीय होता आणि याची 'अशी' बातमी फक्त "ई-सकाळ" मध्येच आहे..

प्रतिक्रिया

खालिद's picture

11 Jul 2009 - 1:16 am | खालिद

शेतकऱ्यांच्या शेताला पाणी आम्हीच पाजावे काय

नको नको त्यापेक्षा शेतकर्‍यांना दारु पाजा; मतेच मते

तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू, सगळीकडे पाणी देऊ; पण तुम्हीही मते देऊन पाठिंबा द्या.
आम्हाला तर वाटतं होतं की पाणी, वीज वगैरे गोष्टी कर भरला तर मिळतात. मते आणि पाठिंबा देऊन मिळतात हे आज पहिल्यांदाच ऐकतोय.

पवारसाहेब केंद्रात मंत्री आहेत. भारत निर्माण, पंतप्रधान सडक योजनेतून त्यांच्या मदतीने निधी आणू, असे आश्‍वासन त्यांनी दिले
पवारसाहेब केंद्रात आणि आपण राज्यात गेली ५ वर्षे मंत्रीच आहात ना की मंत्रालयाची शौचालये साफ करता?

स्वातंत्र्य मिळून साठ वर्षांनंतरही लोक उघड्यावर शौचाला जातात ही दुर्दैवी बाब आहे
त्यातली एक चतुर्थांश वर्षे तर तुमचेच आणि माननीय काकांचेच राज्य आहे ना? की असे म्हणायचे आहे "आता लोकांना संडासापर्यंत ह***** आम्हीच घेऊन जावे की काय?"

आमच्याशी दगबाजी केली तर सायकलही जाणार नाही याची व्यवस्था करू
आजचा सुविचार

फुकटात वाटायला आम्ही साधू-संत नाही.
नशीब आमचे; आपण वेळीच सांगितले नाहीतर इतिहासच्या पुस्तकांमध्ये बंदी घालण्यात येणार्‍या संत रामदासांऐवजी आम्ही ह.भ. प. (हळूच भलतीकडे पाहणारा) संत अजितदादाचंद्ररावजी पवारजी साहेबजी बारामतीकर यांचा समावेश करायचे घाटत होतो.

लोकसभेला रा कॉ चे पुणे-मावळात झालेले पानिपत पाहता अजित पवार बरेच दिवस गप गुमान होते.
त्या पारर्श्वभुमीवर हे भाषण फारच विनोदी वाटले.
-----
काय? आज तुम्ही आय टी वाल्यांना शिव्या घातल्या नाहित? अनिवासिंच्या नावाने खडे फोडले नाहित? ...अरेरे! स्वतःला पुरोगामी कसे म्हणवते तुम्हाला?

एकदा शरद पवार जाउ दे या दादाला कुत्र एकणार नाहि, खुपच गमजा करतोय, राज्य स्वताचे असल्यासारखे.

नितिन थत्ते's picture

11 Jul 2009 - 2:38 pm | नितिन थत्ते

>>एकदा शरद पवार जाउ दे

अरेरे..... काय हा नैतिक अधःपात!!! :)
कुणाच्या जाण्याची इच्छा करू नको रे मामू. :D

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

सँडी's picture

11 Jul 2009 - 4:04 pm | सँडी

सत्ता आणि पैशांचा माज म्हणतात तो हाच!

ह्या टाईपाचा हा नेता आहे. बोलायला तोंड उघडतो की दुसरे काय तेच कळत नाही.सगळा मुर्खपणाचा घमघमाट सोडतो. =))

वेताळ

यशोधरा's picture

11 Jul 2009 - 5:16 pm | यशोधरा

लेकीच्या भवितव्यासाठी पुतण्याचे पंख सकाळच्या माध्यमातून व्यवस्थित कापले जाताहेत, असं दिसतय! म्हणजे म्हणायलाही मोकळे की आम्ही घराणेशाही न करता निस्पृहपणे बातम्या छापतो! आणि पुतण्याही तेवढाच हुशार, काही बघायलाच नको! सगळाच आनंदीआनंद... :(

सरळ सरळ धमकीवजा भाषण आहे..

हेरंब's picture

12 Jul 2009 - 7:10 am | हेरंब

अशा प्रकारच्या सगळ्या नेत्यांना आपण ,'सामना' मधे हिंदुराव धोंडे पाटील च्या प्रातिनिधिक स्वरुपात बघितलेच आहे. अशा नेत्यांचे शेवटी काय होते ते पण या सिनेमात दाखवले आहे.

राजू's picture

12 Jul 2009 - 10:17 am | राजू

आजपर्यन्त विकासकामे करायचे सोडून दमदाटीच करत आलेत.