जगात छापण्याजोगे दुसरे विषय राहिले नाहीत, की हल्लीच्या पत्रकारांची बौदिधक कुवत फक्त गल्ली-दिल्लीतले राजकारण आणि गेलाबाजार क्रिकेट याभोवती घुटमळण्याइतकीच आहे?
बर्याच पत्रकारांची बौदिधक कुवत सुमार आहे.'द हिंदु/स्टेट्स्मन' सारखी व्रुत्तपत्रे सोडली तर बहुतांशी व्रुत्तपत्रे सुमार दर्जाची आहेत्(इंग्रजी/मराठी तरी. बाकीच्या भाषांचे माहित नाही).ऑनलाइन ऑस्ट्रेलियन्/ब्रिटिश व्रुत्तपत्रे बघा,क्रिकेट् खेळाडुना आपल्याकडे देतात त्याच्या एक दशांशही महत्व तिकडे नसते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
हम्म.
तरी अजून धोणी वगैरे पैसे घेऊन हरले असा नेहमीचा यशस्वी आरोप केला नाही :)
(अवांतरः २०-२० हा क्रिकेटचा खेळ नसून बॅट आणि बॉलच्या सहाय्याने केला जाणारा एक करमणुकीचा कार्यक्रम आहे असे आमचे वैयक्तिक मत असल्याने जास्त प्रतिक्रिया देत नाही)
खराटा
(रंग माझा वेगळा)
हाहाहा. अगदी शंभर टक्के सहमत. काल तर जोश १८ या वेबसायटीने धोनीबाबत काय एकेक तारे तोडले होते. यंव रे यंव. जिंकत होतो तेव्हा त्याचे गुणगान चालले होते आता संख्यात्मक दृष्टीकोनातून फक्त दोन सामने गमावले तर एवढी टीका. बाकी माध्यमे संवग बनली आहेत हे नक्कीच.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
धोणी माजला असल्याची काही उदाहरणं देता येतील का हो तात्या ? असो ...
आपल्या इथं जिंकलं की डोक्यावर घेणं .. आणि हारलं की पायदळी उडवणं .. ह्या गोष्टी अगदी कॉमन आहेत ... भारत हरल्यावर मी पण थोडा वेळ पॅनिक झालो होतो .. पण त्यानंतर कोणताही न्यूज चॅनल किंवा पेपर वाचला नाही .. ह्यामुळे माझ्या भावना जास्त दिवस एवढ्या टोकाच्या राहिल्या नाहीत ..
जाउन द्या !! ९ महिन्यांनी पुढचा वर्ल्डकप आहे ... तिकडे विजयाची आशा करू !!
(ढोणीपंखा) टारेंद्रसिंग टोणी
धोनी माजल्याचे आठवत नाही. खरं म्हणजे तो सगळ्यात शांत, संयमी तसेच वेळप्रसंगी अतिशय कणखर कॅप्टन आहे.
२०-२० चा फॉरमॅटच असा आहे की त्यात काहीही होऊ शकतं. बलाढ्य समजल्याजाणार्या ऑस्ट्रेलियाचे काय झाले?
त्यामुळे, भारताची कामगिरी काही वाईट नव्हती. आजचा साऊथ्-आफ्रिके बरोबरचा सामना आपण जवळ जवळ जिंकल्यातच जमा आहोत.
धोनीला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा ......
त्यांना रोज नवीन मसाला पाहिजे असतो. दुर्दैवाने आता त्यात वृत्तपत्रांचीही भर पडतीय. झी टीव्हीवरच्या बहुतांशी बातम्या तर दिल्ली आणि आजूबाजूचा प्रदेश इतक्यापुरत्याच मर्यादित असतात. मुळात 'बातमी' कुठली आणि 'अफवा पसरवणं' कुठलं ह्याचं तारतम्य उरलं नाहीये असं वाटतं.
आता क्रिकेटबद्दल -- व्यक्तिशः क्रिकेटवेडा म्हणून आपण हरल्यावर मलाही वाईट वाटलं पण मिडीया ज्याप्रमाणे वागतोय ते विचित्र आहे. मी खात्रीपूर्वक सांगतो उद्या ह्याच संघाने अजून दोन्-तीन आंतरराष्ट्रीय सामने जिंकले की सगळे पुन्हा उदो उदो करायला लागतील. जोपर्यंत क्रिकेटशिवाय इतर खेळ लोकप्रिय होत नाहीत तोपर्यंत मिडीयाचा फोकस पूर्णपणे क्रिकेटवर (किंबहुना क्रिकेटबद्दल पण क्रिकेटेतर विषयांवर -- उदा. धोनी आणि सेहवाग) राहणार !
खरे तर कुठलच माध्यम खेळाशी प्रामाणिक नाही. खेळात एक हरणार हे निश्चितच आहे. प्रत्येक वेळी आपणच विजेते होणार हे कसे शक्य आहे.
ह्या माध्यमांना फक्त त्यांचा जाहिराती आणि टी.आर.पी. दिसत. त्या साठी खेळ चालू असो वा नसो, फाल्तू समीक्षक बसवून नसत्या चर्चा घडवतात. खेळ चालू नसतांना खेळाडू कुठे गेले, कुठे जेवले, कुठे हिंड्ले असल्या गोष्टी चघळत असतात. अतिशय सुमार दर्ज्या चे रिपोर्टिंग करताना आव मात्र एखद्या उत्तम पत्रकाराचा असतो.
शेवटी जे खपत तेच दाखविणार. ते थोडच खेळाच्या प्रचार, प्रसारासाठी समर्पित आहेत. बाकी असे रिपोर्टिंग बघणार्यांचा हातात टी.व्ही. बंद करणे हाच पर्याय असतो.
माध्यम॑, ज्याला माझ्यासारखी साधी माणस॑ "ईलेकट्रॉनिक मिडीया" म्हणतात. आजकाल शेफारत चालली आहे..यावर वेळीच ब॑ध यायला हवा..मी पहातोय ते २६/११ पासुन्,तिकडे लोक मरतायत आणी या॑चे ध॑दे चाललेत टी.आर.पी वाढवायचे. मिडीया मुळेच मुख्यम॑त्र्याचे, ऊपमुख्यम॑त्र्याचे बारा वाजले.गृहम॑त्र्या॑च राहु द्या. त्यादिवशी बहुधा आय्.बी.एन.७ वर बघत होतो.रहस्यमय झील का काही तरी रहस्य काय होत तेच विसरलो..काही तरी असच दिवसातुन एकदा तरी दाखवतात.एक दिवस नदीतला भोवरा दाखवत होते.क्या ये सच है..जमीन पर पाणी क्यो॑ नही रुक रहा है..आणी अस काय काय्...ईलेक्शन च्या वेळेला तर विचारू नका...कोण कुठे जि॑कलय हे समजायला खाली लिहीलेल वाचाव लागायच्..आणी निवेदक मात्र सरकार कस येणार आणी आकडेवारी कशी असेल ह्याच्यात व्यस्त.बाबा सरळ निकाल सा॑ग आणी ब्रेक घे की !!!
घटनाकारा॑नी "पत्रकारीता " हा लोकशाहीचा चौथा स्त॑भ मानला होता..तोच बाकी च्या स्त॑भाना हादरा देण्याच काम करतोय.
सुहास
जगात छापण्याजोगे दुसरे विषय राहिले नाहीत, की हल्लीच्या पत्रकारांची बौदिधक कुवत फक्त गल्ली-दिल्लीतले राजकारण आणि गेलाबाजार क्रिकेट याभोवती घुटमळण्याइतकीच आहे?
हो असेच झाले आहे हे खरे आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
कुवत
हम्म. तरी
करमणुक
शंभर टक्के सहमत
मी तर म्हणतो कि धोनीने म्याच फिक्सींग केली आहे.
बाकी
+१ सहमत
गेल्या
सहमत आहे .....
+१
माध्यमं सटकलीयेत
माध्यम
माझेही मत...
जगात