प्रत्येक गोष्टीला एक तात्पर्य असते.
ते त्या कथेतल्या एखाद्या पात्राला लागू पडते आणि त्यापासून बोध घ्यावा अशी अपेक्षा असते.
प्रत्येक तात्पर्याचे एक परस्पेक्टीव्ह असते.
कथेतल्या पात्रानुरूप ते बदलत असते. त्यानुसार तात्पर्यही बदलत असते.
ससा कासवाच्या शर्यतीची गोष्ट आपणा सर्वानाच माहित आहे.
तीच ती .......एकदा ससा आणि कासवाने शर्यत लावली...आणि भरभर धावणारा ससा मध्येच दिसलेले गवत खाऊन झोपी गेला . कासव न थकता संथपणे चालतच राहिले आणि अघटीत घडले. कासव शर्यत जिंकले.
त्या गोष्टीतले आपल्याला माहित असणारे तात्पर्य म्हणजे. "स्लो ऍन्ड स्टेडी विन्स द रेस" पण हे झाले कासवाच्या दृष्टीकोणातून.
गोष्टीतल्या सशाला कोणताच बोध दिलेला नाही.
आपण सशाच्या दृष्टीकोणातून पाहिले तर त्याच्या काय चुका झाल्या ते कळते.
सर्वप्रथम त्याने शर्यत ही महत्वाची प्रायोरीटी असताना ती मध्येच बदलली आणि हिरवे लुसलुशीत गवत खाण्याला दिली. त्याहीपुढे जाऊन त्याने ताणून झोप काढली.
कथेचा फोकस बदलला की तात्पर्य बदलते.
या कथेचे तात्पर्य सशाच्या दृष्टीकोणातून असे असेल.......
"बिगीन विथ द एन्ड इन मिन्ड ऍन्ड नेव्हर चेन्ज युवर प्रायोरिटी इन बीटवीन"
अनेक जुन्या कथांचा असा वेगळा विचार केला तर नवीच तात्पर्ये बाहेर येतील. पहा एखादे नवे तात्पर्य सुचतेय का ?
असेच एक नवे तात्पर्य या कथेचेही http://misalpav.com/node/7910
वाचने
5592
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
अशाच काही
अवलिया,,,,,,,, मस्तच,,
लै भारी
वा नविन
विजुभाऊ
माफ करा
In reply to विजुभाऊ by पर्नल नेने मराठे
बाबा
अल्लाउद्द
मस्त कथा
स्पेशल
विजूभाऊ,