आपल्या भावना खरंच बोथट झाल्या आहेत का? असा प्रश्न स्वतःला विचारला तर उत्तर "हो" आलं.. काय बोलणार?
कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
इतकी भावनाशून्य माणसे असतीलही पण बरीच असतील असे वाटत नाही.
सध्या खर्या चेहर्यांतच वावरतो असे वाटते. (किमान खर्या चेहर्याने वावरतो.)
सारे असेच होते ,
जे भेटले तिथेही ,
हायसे वाटले मलाही
कि त्यांच्यातलाच मी ही
कविता छान आहे.
-- लिखाळ.
दुरुन उपचार सारे ,
मग अंघोळ तरी कशाला..?
मी करुनी विचार ऐसा ,
बाजार सण्डेचा केला .
!!!
गोखलेसाहेब,
कविता नेहमीप्रमाणे उत्तमच आहे हे प्रथम नमूद करून एक नम्र सूचना कराविशी वाटते.
सामजिक आशयच्या, आपण बोथट, मुर्दाड बनलो आहोत, अश्या आशयाच्या आपण ज्या कविता करता त्या उत्तमच असतात, अंतर्मुख करायला लावतात जे कबूल. मी त्या कवितांना वेळोवेळी दादही दिली आहे.
अहो पण अधनंमधनं केव्हातरी छान निसर्गकविता, जीव ओवाळून टाकावा अश्या प्रेमकविताही करत जा की प्लीज! आयला, आजकाल आपली कुठली नवी कविता दिसली की आता काहितरी डोळ्यात अंजन घालणारं जळजळीत वाचायला मिळणार या भावनेने अलिकडे मला प्रथम धडकीच भरते! :)
तेव्हा जमल्यास माझ्या सूचनेचा अवश्य विचार व्हावा!
काय म्हणता?
(फ्यॅन) तात्या.
आपण माझ्या प्रत्येक कवितेचे कौतुक केले आहे..मी आपला आभारी आहे .. हे खर आहे कि माझ्या बहुतेक कविता
सामाजिक आशयाच्या असतात. त्यात कधी कधी वास्तवतेचे अतिरंजित वर्णन ही कदाचित होत असेल्..पण माझ्या सारख्या
असंवेदनशील माणसाला प्रेम कविता, निसर्गकविता कशा सुचणार..? ती जबाबदारी प्राजुताई, क्रांति यांच्याकडे आहे..
असो.. पण तुमच्यासाठी मी प्रयत्न करतो..!!
काय बोलणार यावर आता?
कविता आणि
सहमत आहे
इतकी
दुरुन
तात्या..