मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सेंटेड प्रेम..

jenie · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सहज एक विरंगुळा म्हणून आणि आज कालची मूलं कशी विचार करतात या साठी ही कविता ...कवितेची सुरवात मी करते तुम्हाला काही सुचते का ते सांगा... पूर्ण आपण करुयात... रोज रोज तुला गुलाबाचे फुल द्यायला एक रुपाया भार पडतो माझ्या खिशाला रोज रोज भेळ -पुरी खायला लाज नाही वाटत मनाला?? काय होत तुला डबा घरुन आणायला??? रोज रोज फिरायला रि़क्षा लागते तुला थोडं फार चालताना काय पाय लागतात दुखायला दर महिन्याला तुला ड्रेस द्यायला काय बापाची जहागीरी समजते मला?? ------------- ----------- ------- -----

वाचने 1191 वाचनखूण प्रतिक्रिया 1

भडकमकर मास्तर 25/04/2009 - 08:23
आज काल मुले फार आगाउ झाली आहेत. पूर्वी असे नव्हते . पूर्वीची मुले फार चांगली आणि समंजस आणि आज्ञाधारक इ.इ. होती. त्यांना पैशाची किंमत नाही. सारखे अरबट चरबट खायला हवे. कष्टाची सवय नाही. पूर्वी मुले फार कष्ट करत असत. कमवायची अक्कल नाही आणि सतत पैसे मागतात. पूर्वी मुले स्वतः लहानपणापासून पैसे मिळवत असत. त्यांना आई-वडिलांकडे पैसे मागायला लागत नसत. ही तुमची भावना कवितेत फार छान व्यक्त झालेली आहे. _____________________________ कुठे संत तुकाराम? कुठे शांताराम आठवले?