आत्ताच बघून आली हा चित्रपट.एक आठवड्यापूर्वीच बोक्या सातबंडेचा २ रा भाग वाचला होता.तेच पडद्यावर बघताना मजा आली.आर्यन नार्वेकरने ऊत्तम बोक्या साकारलाय.आलोक राजवाडेचा विजयेंद्र आणि (देवेन बेलवंडेही :)) ) झक्कास होता.बेलवंडे आजोबांनी आबांची आठवण करून दिली.तसेच भाव,हातांच्या हालचाली.
सर्वांनी आवर्जून बघावा असा चित्रपट आहे.
त्यातले काही संवादही मनाला भिडणारे,विचार करायला लावणारे आहेत.उदा.बोक्या जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत गरीब मुलांना मदत करण्याची योजना मित्रांना सांगतो,तेव्हा तो म्हणतो,"शक्यतो मोठ्या माणसांकडे या योजनेबद्दल बोलू नका.उगीच मोडता घालतील.माझा अनुभव आहे.त्यांना अशा कल्पना सुचत नाहीत आणि आपल्याला सुचल्या तर त्यांना आवडत नाही." :?
बोक्या जेव्हा बेलवंडे आजी-आजोबांना चिकन,पापलेट,आईसक्रीम घेऊन जातो,तो प्रसंगही हळवा आहे.
चित्रपटातली गाणीही सुंदर आहेत. 8>
प्रतिक्रिया
सुट्टीचा खुराक
फ्रेंड्स,
नक्की