बहुतेक लोकांचा असा समज असतो, की अभिजात सन्गीत म्हणजे फक्त मुरक्या आणि जोरदार ताना घेणे. आणि जास्तीत जास्त राग येतात हे दर्शवणं. प्ररन्तु प्रथम सूर तर साधला पाहिजे ना? खरं गाणं आलापीत आहे.स्वर संवाद समजला पाहिजे.म्हणजे भाव आपोआप उमटेल.
पहिला षड्जच असा सुन्दर लागला पाहिजे, की गाण्यात भाव आणण्यासाठी वेगळ्या कुठल्याही गोष्टीची गरज राहू नये.कार्यक्रमातील कुठल्याही गायकाचा सूर पक्का नाही. मग तो श्याम कल्याण असो,नाहीतर बडबड गीत.
फक्त वसन्तराव, भीमसेन, कुमार, लता, आशा ह्यांची गाणी गाऊन मोठं कसं होता येईल? त्यासाठी डोळस रियाज पाहिजे. पंडितांची गाणी गायली म्हणजे ग्रेट असं नव्हे. ते पंडित का झाले ह्याचा विचार केला पाहिजे.
इथे मला किशोरीताईंच्या भूपातील ह्या बन्दिशीची आठवण होते.
प्रथम सुर साधे
जब होवत ग्यान
तब अलंकार कर दिखये ।
शड राग् छत्तीस रागिणी
तीन ग्राम बाईस श्रुती
कर दिखाये ॥
प्रतिक्रिया
षड्ज
सहमत
Pagination