मिपा ही एक चळवळ आहे व ह्याच्या माध्यमातून अनेक लोक अनेक अभ्यासपूर्ण विशयान्ची मांड्णी व प्रबोधनाचा प्रयत्न आपल्या बहारदार लेखणीतून करत असतात. अनेक लेख वाचून तर सदस्यांच्या बुद्धिमत्तेचे आशर्य वाटते हेवा देखील वाट्तो. मी एवढा सरस लेखक नेसलो तरी ह्या चळवळीचाच एक भाग म्हणून हा धागा सुरु करून खालील मुद्दे मांडत आहे. ह्या माध्यमातून तरुण मतदरांमध्ये काही जाग्रुती /माहिती पुरवण्याचा धागा सुरु करतोय.
एप्रिल - मे मध्ये लोकसभेच्या निवदणुका आहेत. ह्या निमित्तने सर्व मिकरान्ना विनम्र आवाहन करतो कि प्रत्येकाने न चुकता मतदान करावे .
मतदान करतन्ना किमान खालील काही गोष्टिंची कळजी नक्की घ्यावी.
१. उमेदवाराची पार्श्व भूमी माहीत करुन घ्यवी.
२. आपला प्रतिनीधी सुशिक्शीत असेल ह्याची काळजी घ्यावी.
३. आपण मत देत असलेल्या उमेदवाराचा सामाजिक कार्यात (राजकीय नव्हे) सहभाग कितपत असतो हे माहित करून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करावा.
४. लोकसभेच्या निवडणुका ह्या राष्ट्रीय स्तरावरच्या असतात, त्यामुळे मतदान करतन्ना स्थानिक मुद्द्यांन्ना फारसे प्राधान्य न देता राष्ट्रीय मुद्यांना महत्व दिले पाहिजे.
स्वहितापेक्षा राष्ट्रहित आधिक महत्वाचे आहे ह्याचे सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी व नागरिकांन्नी भान ठेवावे.
५. गुंड प्रव्रुत्तीच्या, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व मलीन चरित्र असलेल्या व्यक्तीस कदापीही मतदान करू नाये. सद्यस्थितीत अशी पार्श्वभूमि नसलेले उमेदवार सापडणे खूपच कठीण आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे..पण ही परिस्थिती आपल्या मतदान न करण्या मुळेच निर्माण झाली आहे हे लक्शात घ्या.
वरील मुद्दे सूज्ञ मिपाकरांच्या द्रुष्टीने फारच प्राथमिक स्वरूपाचे असतील ह्यात वाद नाही. हे मुद्दे मी येथे प्रकट करणे (तात्या व इतर ज्येष्ठ मिपाकरांसमोर) म्हणजे ल.तों.मो.घा. आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहेच.
तरी आपल्यापरीने थोङी जाग्रुती करण्याचा खारीचा प्रयत्न आहे... सींहांनी आपला वाटा उचलावा व आपला अभ्यास्पूर्ण प्रतिसाद देवून मार्गदर्शन करावे ही अपेक्षा वजा विनन्ती.
प्रतिक्रिया
18 Feb 2009 - 5:19 am | विसोबा खेचर
आपली कळकळ समजण्यसारखी आहे हे प्रथम नमूद करतो...
परंतु मत देऊ तर साला कुणाला देऊ? सगळेच सारखेच नालायक आहेत!
की तातल्या त्यात कमी नालायक असलेल्याला मत द्यावं असं आपल्याला म्हणायचं आहे?
अहो मत नक्की देऊ पण आज कोणता उमेदवार लायक आहे? देशाबिशाची कुणाला पडली आहे? प्रत्येक पक्ष हा पुढची ५ वर्ष आपल्याला खुर्ची कशी मिळेल आणि पुढील ४२ पिढ्यांची सोय कशी करता येईल याच चिंतेत मग्न आहे. अश्या परिस्थितीत या पैकी कुठल्याही पक्षाला मत देणं हा देशद्रोहच नव्हे काय?
आणि मिपा काय किंवा इतर पांढरेपेशा समाज काय, आपली संख्या मुठभरच आहे, आणि या राजकारण्यांना तुमच्याआमच्या सारख्या सुजाण, सुशिक्षित परंतु मुठभर लोकांच्या मतांची काहीही पडलेले नाहीये. आपण मत दिलं काय, न दिलं काय! त्यांना मत देणारे भरपूर आहेत. रातोरात लाख्खो रुपये वाटले जातात, साड्यावाटप होतं आणि मत मिळवली जातात..!
तात्या.
18 Feb 2009 - 12:04 pm | आम्हि
आहो तात्या आता पुण्याचेच उदाहरण घ्या ना. पुण्यात एकुण मतदार संख्येच्या ६५% टक्के मतदार सुशि़क्षित मध्यम वर्ग आहे. आणि मागे वाचनात आल्या प्रमाणे १५ लाख मतदारांपैकि जवळ्पास ८ लाख मतदारांनीच मतदान केले होते. मग अश्या परिशितीत आपण सुशिक्षित मतदार मुठ्भरच आहोत असे कसे बरे म्हणता येइल. पण आपल्या मतदान न करण्याच्या धोरणामुळे आपण मुठ्भर होत चाललो आहोत.
चांगला उमेदवार नसण्यावर मतदानच न करणे हा उपाय ठरु शकेल काय?
त्या पेक्शा खाली नमूद केल्या प्रमाणे "जो मागच्या वेळी निवडुन आला त्याला कदापी द्यायचे नाही , अशाने कमीत कमी "आपण काय वाटेल ते केले तरी निवडुन येउ शकतो " ही गुर्मी कमी होउ शकेल. हा पर्याय जास्त संयुक्तिक वाटतो. आपण काहीहि केले तरी खपते असा समज तरी रहाणार नाही ह्या साल्यांचा.
18 Feb 2009 - 6:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपा ही एक चळवळ आहे व ह्याच्या माध्यमातून अनेक लोक अनेक अभ्यासपूर्ण विशयान्ची मांड्णी व प्रबोधनाचा प्रयत्न आपल्या बहारदार लेखणीतून करत असतात. अनेक लेख वाचून तर सदस्यांच्या बुद्धिमत्तेचे आशर्य वाटते हेवा देखील वाट्तो.
इतकेच वाक्य आवडले !
बाकी, दर निवडणूकीला असे मुद्दे मतदात्यांच्या समोर येत असतात. आपणास नाउमेद करत नाही. किती पारखून घेतले, सद्सदविवेक बुद्धीने मतदान केले तरी निवडून आलेल्याचा रस्ता गटारीकडेच जातो असे वाटते. निवडून दिलेल्या उमेदवारास माघारी बोलावण्याचा अधिकार मिळाला पाहिजे असे वाटते.
-दिलीप बिरुटे
18 Feb 2009 - 6:26 am | मराठी_माणूस
वर म्हटल्या प्रमाणे सगळेच नालायक आहेत मग कोणाला मत द्यायचे , तर जो मागच्या वेळी निवडुन आला त्याला कदापी द्यायचे नाही , अशाने कमीत कमी "आपण काय वाटेल ते केले तरी निवडुन येउ शकतो " ही गुर्मी कमी होउ शकेल. कारण जे नीवडुन येतात ते आपली तुंबडी भरण्या व्यतरीक्त काहीच करत नाहीत. जर परत नीवडुन यायचे असेल तर लोकांची योग्य कामे करावीच लागतात हा संदेश गेला पाहीजे.
18 Feb 2009 - 8:47 am | सुनील
अशाच प्रकारची एक योजना काही महिन्यांपूर्वी ऋषिकेश यांनी मांडली होती.
सुखवस्तू सोसायट्यांमधिल मतदार सुटीचा दिवस म्हणून तंगड्या पसरून आराम करीत असताना, शेजारील झोपडपट्टीतमात्र मतदानासाठी रांगा लागतात, हे दृश्य अपवादात्मक नक्कीच नाही!
"हे काय साले पैसे घेऊन एकगठ्ठा मतदान करतात", असे नकारात्मक विचार व्यक्त करण्यापेक्षा, आपण स्वतः मतदान करणे हे इष्ट. मुंबई परिसरातील अनेक भागांत मध्यमवर्गियांची संख्या लक्षणिय आहे. ह्या सर्वांनी जर का मतदानाकरिता रांगा लावल्या तर, उमेदवारांचे अंदाज/आराखडे आपोआप बदलून जातील.
तुम्हाला जर "त्यांचे" उमेदवार निवडून यायला नको असतील त्यासाठी "तुम्ही" मतदान करणे, हाच एकमेव उपाय आहे.
(मतदार) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
18 Feb 2009 - 11:45 am | विसोबा खेचर
असे नकारात्मक विचार व्यक्त करण्यापेक्षा, आपण स्वतः मतदान करणे हे इष्ट.
अहो पण कुणाला मतदान करणार? हल्ली सगळ्याच राजकीय पक्षाचे उमेदवार नालायक आणि पैसेखाऊ असतात!
तात्या.
18 Feb 2009 - 11:48 am | बेसनलाडू
हा फॉर्म भरून 'वरीलपैकी एकही उमेदवार लायक नाही' असे 'मत देता येते' असे ऐकून आहे ;)
(माहीतगार)बेसनलाडू
19 Feb 2009 - 1:43 am | विकास
अहो पण कुणाला मतदान करणार? हल्ली सगळ्याच राजकीय पक्षाचे उमेदवार नालायक आणि पैसेखाऊ असतात!
त्यातल्या त्यात जो बरा असेल (गुंडा ऐवजी चोराला, चोरा ऐवजी भुरट्या चोराला वगैरे) मत द्या. पुढच्या वेळेस त्याच्या विरुद्ध व्यक्तीस मत द्या. लोकशाही पेरायला सोपी असली तरी त्याचा वटवृक्ष होऊन फळे येयला वेळ लागतो. काही मतदानांनंतर राजकारण्यांच्या लक्षात येऊ लागेल की व्यावसायीक वर्ग पण मते देतो आणि त्यामुळे पंचाईत होऊ शकते. पण ते उद्याच होईल आणि ते ही आपण मत न देता असे म्हणायचे असेल तर ते शक्य नाही.
18 Feb 2009 - 11:51 am | प्रकाश घाटपांडे
.
वरील पैकी कोणी ही नाही असे शेवटच बटन मशीनवर हवे. मागच्या वेळी ते नव्हते या वेळी ते हवे.
प्रकाश घाटपांडे
18 Feb 2009 - 1:24 pm | मराठी_माणूस
वरील पैकी कोणी ही नाही असे शेवटच बटन मशीनवर हवे. मागच्या वेळी ते नव्हते या वेळी ते हवे.
अगदी बरोबर पण नीवडणुका ह्या मतदारांच्या सोयी साठी नसुन भ्रष्टाचार करण्याचा परवाना मिळवण्यासाठी असतात त्यामुळेच कुठलाच पक्ष ही मागणी करत नाही.
हा पर्याय उपलब्ध आहे असे समजले तर निश्चीत पणे मतदानचे प्रमाण खुप वाढेल आणि ही वाढलेली मते ह्याच पर्यायासाठी असतील.
18 Feb 2009 - 5:43 pm | विसोबा खेचर
अगदी बरोबर पण नीवडणुका ह्या मतदारांच्या सोयी साठी नसुन भ्रष्टाचार करण्याचा परवाना मिळवण्यासाठी असतात त्यामुळेच कुठलाच पक्ष ही मागणी करत नाही.
हा पर्याय उपलब्ध आहे असे समजले तर निश्चीत पणे मतदानचे प्रमाण खुप वाढेल आणि ही वाढलेली मते ह्याच पर्यायासाठी असतील.
यू सेड इट! :)
पूर्णत: सहमत..
मतदान केलं पाहिजे, तो आपला हक्क आहे, ते आपलं कर्तव्य आहे, हे सगळं खरंच. पण लायक व्यक्ति तर हव्यात ना!
तात्या.
18 Feb 2009 - 12:31 pm | धमाल मुलगा
मतदानाला जाऊन 'मत रद्द करणे' /'ह्यापैकी कोणीही नाही' अशी काही (गुप्त) सोय अजुन नाहीय्ये का?
ते फॉर्म ४९ वगैरे खोटं आहे असंही मध्यंतरी वाचनात आलं होतं. आणि समजा, ते खरं असलं, तरी कोणता 'सुशिक्षित, पांढरपेशा' असा फॉर्म जाहीररित्या मागू शकेल? जरी मागितला, तरी मतदानाच्या ठिकाणी भिरभिरणार्या 'फुकटच्या बाजीराव' कार्यकर्त्यांना ही माहिती कळणार नाही का? कळाल्यास ते 'सुशिक्षित, पांढरपेशा' म्हणजेच त्यांच्या भाषेत 'डरपोक, बिनकण्याच्या' मतदारांना बदडल्याशिवाय राहतील का?
पुर्वीच्या शिक्के मारण्याच्या पध्दतीमध्ये एक फायदा तरी होता. सरळ दिसेल त्या प्रत्येक चित्रापुढं शिक्का मारुन मतपत्रिका बाद करुन टाकायची. ज्या वेगाने मतदानयंत्रांची उपलब्धता करुन देण्यात आली त्या वेगाकडे पाहता, ह्या पांढरपेशी बदललेल्या जनमताचा धोका उमजला म्हणुन ही चाल खेळली गेली की काय अशी शंका आल्यावाचून रहात नाही.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
18 Feb 2009 - 1:35 pm | नरेन
सर्वानीच ह्यावर आत्मपरीक्शण करण्याची गरज आहे घरात बसण्यापेक्शा मतदान करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे हा मनाशी निश्चय केला पाहीजे . जोपर्यन्त ही जनजाग्रुती होत नाही तोपर्यन्त लायक व्यक्ती निवडुन येणारच नाहीत.
18 Feb 2009 - 5:15 pm | महेंद्र
मतदान हे केलेच पाहिजे. जो घटनेनी दिलेला अधिकार आहे त्याचे पालन करणे हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य ठरते.
कोणाला करावे? हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. आत्ताच काश्मिर मधे ६५ % वर मतदान झाले. हा एक चांगला पायंडा आहे.जर काश्मिरला इतक मतदान होऊ शकतं तर रेस्ट ऑफ इंडियामधे त्याहुन जास्त व्हायला हवं...
महेंद्र
18 Feb 2009 - 6:26 pm | अविनाशकुलकर्णी
१. उमेदवाराची पार्श्व भूमी माहीत करुन घ्यवी.
अ] उमेद वाराचि पार्श्व भूमी माहित असणे गरजेचे..पण मत पक्षाला[पार्टी]
त्यांच्या ध्येय धोरणा कडे बघुन द्यावे..
ब] प्रादेशिक पार्ट्यांचे उमेदवार निवडुन आले तर घोडे बाजाराला उत येणार आहे
उमेद वार निवडि पासुन ते मतदार संघ, व एकुण निवडणुक प्रक्रीया हि जातिवर आधारीत आहे.. मतदार संघाचे विश्लेशण व रचना बघताना वर्तमान पत्रे सुध्धा आधि जात वार पहाणी करुन विजयाचे अंदाज बांधतात...उमेदवार जाहिर झाले कि अश्या वेळी रसवंति पाझरत असते.
गरीबि हटाओ..या मुद्यावर ४० वर्षे मतदान झाले..आता आतंक वाद हटाओ हा नारा आहे..व जो आतंक वाद हटवेल व मातृ भुमीवर होणारे अत्याचार थांबवेल अश्या पार्टीला मतदान करु यात...
"अजुन हि मतदाराच्या नावासमोर खुण चिन्ह असते..याचा अर्थ मतदार साक्षर नाहि असा घ्यायचा का?..अविनाश"
18 Feb 2009 - 6:38 pm | पात्र
"जो मागच्या वेळी निवडुन आला त्याला कदापी द्यायचे नाही , अशाने कमीत कमी "आपण काय वाटेल ते केले तरी निवडुन येउ शकतो " ही गुर्मी कमी होउ शकेल. हा पर्याय जास्त संयुक्तिक वाटतो. आपण काहीहि केले तरी खपते असा समज तरी रहाणार नाही ह्या साल्यांचा.
असे पुण्यात एकदा त्री होउन जाउदे
मी त्र व्र लिहिलेला म्ज्कुर फ्लेक्ष रुपात प्र्द्र्शित क्रावा असा विचार क्र्तोय.
18 Feb 2009 - 9:35 pm | आम्हि
हा मजकूर प्रसिद्ध तर कराच पण आचरणात आणलात तर अधिक उपयुक्त ठरेल.....