तुमच्या खाद्यप्रवासाचे लेखनाची मी अक्षरशः पारायणे केलियेत.
आभारी आहे! हीदेखील भाईकाकांचीच कृपा. त्यांचंच 'माझे खाद्यजीवन' वाचून चार अक्षरं खरडण्याचा मीही प्रयत्न केला होता इतकंच!
माटुन्ग्यातले ते साउथ इंडिय उपहार ग्रुह एकदमच स्टेशनच्या बाहेर नाहि. थोडे चालुन जावे लागते.
आपण नायकच्या श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊसबद्दल बोलता आहात का? ते तर अगदी माटुंगा स्थानकाच्या बाहेरच आहे. असो..
बाकी माफी वगैरे मागू नका. माझा आपल्यावर किंवा छोटा डॉनवर किंवा अन्य कुणावर कुठलाही राग नाही.. प्रत्येकाची मतं आहेत आणि ती त्याने इथे अवश्य मांडावीत..पुलंच्याच आशीर्वादाने सुरू झालेल्या मिपावर त्याला अटकाव होणार नाही. त्याचप्रमाणे माझीही काही मतं आहेत ती मीदेखील मांडली आहेत..
तात्या.
येथे उशिरा आल्याबद्द्ल क्षमस्व. छोटा डॉन काहि काळ प्रचंड अस्वस्थ झाले होते ते दिसते आहे. मला वाटते प्रतिक्रियाची प्राथमिक फेरी फार छान झाली आहे. माझी प्रतिक्रिया विचार करुन आणि नंतर टाइप करून टाकतोय (सवय नाहिये). डॉन साहेब पुन्हा एकदा धन्यवाद
पुलंविषयी ह्या प्रकारची मते या आधीहि ऐकण्यात आली होती.
पुलंचे लेखन हे फक्त मध्यमवर्गा भोवती घुटमळत राहते असा आरोप काहि टिकाकार नेहमीच करत आले आहेत.
परंतु हे विधान
"लताला पॉप ढंगाची गाणी चांगली गाता येत नाहित/किशोर कुमारला शास्त्रीय बाजाची गाणी झेपत नाहित/सचिन तेंडुलकरला वेगवान गोलंदाजी नीट खेळता येत नाहि"
ह्या विधानांइतकेच तकलादु वाटते.
अत्रेंनंतर पुल हे एकच साहित्य,नाटक,चित्रपट,संगीत ह्यांसारख्या विविध क्षेत्रात लीलया वावरताना आढळतात.
माझ्या वडिलांच्या पिढीने अत्रे पाहिले,आमच्या पिढीला मिरासदार,पुल,शंकर पाटील वगैरे मंडळींचे साहित्य चाखायला मिळाले.
परंतु पुढच्या पिढ्यांना एवढी चतुरस्त्र मंडळी पहायला मिळतील कि नाहि ह्याची चिंता वाटते.
अभिज्ञ.
प्रतिक्रिया
कितीतरी
तुमच्या
येथे उशिरा
पुलंविषयी
+१