काळजीपूर्वक विचार करता असे वाटते, की स्वतःच्या ज्ञानाबद्दल अतिरेकी अभिमान हा खर्या वस्तुनिष्ठतेबरोबर राहू शकत नाही. विज्ञानाच्या शिक्षकांनी भविष्यातील वैज्ञानिकांमध्ये नम्र वस्तुनिष्ठतेचे मूल्य गिरवून द्यायला हवे.
धन्याशेठ, लै भारी लिहिलं आहेस रे! तुझ्यातल्या विचारशक्तिला आणि बुद्धीवादाला आपला सलाम..!
आपला,
(धन्याशेठचा फ्यॅन) तात्या.
वा! वा!!
अतिशय शास्त्रशुद्ध आणि विचारप्रवर्तक लेख!!!!
(स्वगतः आम्हाला या लेखातलं काहीही कळलं नाही, सगळं डोक्यावरून गेलं!!
म्हणून आम्ही आमचीच अब्रू झाकण्यासाठी वरील अभिप्राय वापरतो आहोत!!!!)
:B
-अंगठाछाप डांबिस
घातल्याबद्दल धनंजयचे आभार!
तुझी आठवण चांगली लिहिली आहेस. तुझे पत्रही नेमक्या भाषेत विचार मांडणारे आहे.
मानवी शरीरासारख्या अतिशय गुंतागुंतीच्या रचनेशी संबंध असणारे वैद्यकशास्त्र हे खरोखरच एक अजब रसायन आहे. समोर दिसणार्या शरीरातल्या कित्येक घडामोडी ह्या सद्यस्थितीतल्या ज्ञानाच्या आवाक्यात येत नाहीत, निकषांच्या तराजूत तोलल्या जात नाहीत आणि तरीही त्या घडताहेत हे समजत असतं!
विश्वास ठेवावा तर ज्ञानाशी प्रतारणा होते की काय? न ठेवावा तर अहंमन्यतेचा ठपका लागेल की काय? अशा कात्रीत पकडणार्या काही घटना घडत असतात. आपल्या ज्ञानावरची श्रद्धा हाच ह्यातून एकमेव मार्ग आहे असे मला वाटते. आपल्याला ठाऊक नाही पण ते असू शकेल, पण त्याचवेळी सरसकट काहीही असू शकेल असे न समजता डोळस अभ्यास हाच पुढे नेऊ शकेल हे तत्त्व घट्ट असणे महत्त्वाचे.
शेवटी खरे ज्ञान तुम्हाला नम्र आणि सश्रद्ध बनवते!
चतुरंग
प्रतिक्रिया
काळजीपूर्
वा!
अतिशय रोचक विषयाला हात