दोन महीने पूर्वीची गोष्ट राजीव चौक जवळ असलेल्या हनुमान मंदिरात मारूतीचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडलो, अचानक पटाईssत, अशी जोराची हाक ऐकू आली. मागे वळून बघितले, एक सत्तरीचा वयस्कर माणूस माझ्याच कडे येत होता. तो जवळ आला आणि मला आश्चर्याचा धक्का बसला तो प्रदीप* (टोपण नाव) होता. मला पाहताच तो म्हणाला, पटाईत, तुझ्या चेहर्यात काहीच बदल झालेला नाही. अजूनही तसाच दिसतो. तुला पाहताच ओळखले. प्रदीपची माझी पहिली ओळख कृषि भवन मध्ये कार्यरत असताना झाली होती. 1995 मध्ये त्याची बदली झाली. त्यानंतर काही आमची भेट झाली नाही. तब्बल 29 वर्षांनंतर आज आम्ही भेटलो होतो. त्याला जवळच्या कॉफी हाऊस मध्ये घेऊन गेलो. आम्ही कॉफी हाऊस मध्ये दोन तास बसून एका दुसर्याच्या राम कहाण्या ऐकल्या.
त्याच्या मुलाने आयटीतील डिग्री घेतली आणि त्याला पुण्यात नौकरी लागली. प्रदीप ने ही निवृत झाल्यानंतर पुण्यात घर विकत घेतले. त्याच वर्षी मुलाचे लग्न ही केले. त्यानंतर मुलाने नौकरी बदलली आणि तो अमेरिकेत गेला. मुलाने अमेरिकेत घर विकत घेतले होते. त्याचा भारतात परतण्याचा विचार नाही. प्रदीप ने विचारले, पटाईत, तुझ्या मुलाचे लग्न झाले का? मी उत्तर दिले, गेल्या वर्षी झाले. तो म्हणाला तीसी उलटल्यावर झाले असेल. मी म्हणालो, काय करणार, मुली होकार देत नव्हत्या. विषय बदलण्यासाठी मी त्याला गमतीने विचारले, तू दोन-चार नातवांचा आजा झाला असेल? त्याच्या चेहरा गंभीर झाला, तो म्हणाला नाही रे. मी विचारले "मुलाने लग्न केले नाही का"? तो म्हणाला, केले आहे. गेल्या दहावर्षांपासून अमेरिकेत आहे. पण त्या दोघांची मूल पैदा करण्याची इच्छा नाही. आता तर त्याची चाळीसी ही उलटली आहे. बहुतेक माझा वंश इथेच संपणार. याचा दोष आपलाच. आपल्या पिढीतील अधिकांश नौकरीपेशा मध्यमवर्गीय लोकांनी एकच मूल पैदा केले. त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार. त्याने त्याचाच नातेवाईकांचे अनेक उदाहरणे दिली. नव्या पिढीतील अधिकान्श मुलांचे लग्न 30- 35 उलटल्यावर होत आहे. एकाच्या वर अपत्य नाही. काहींना मूल पैदा करण्याची इच्छा ही नाही. तो पुढे म्हणाला असेच सुरू राहिले तर आपल्या पैकी अधिकान्श शिक्षित मध्यमवर्गीयांचे वंश पुढील 100 वर्षांत संपुष्टात येतील. मी वातावरण हलके करण्यासाठी म्हणालो, याला मोक्ष म्हणतात. प्रदीप ने पुण्यात एक वृद्धाश्रम पाहून ठेवले होते. त्याच संदर्भात तो म्हणाला, आमचे दुर्दैव, आमचा शेवट वृद्धाश्रमात होणार. बहुतेक अग्नि देण्यासाठी कुणी नातेवाईक ही जवळ नसणार. जाता-जाता प्रदीप मला म्हणाला, तुझ्या मुलाला म्हणा, दोन किंवा तीन पोर पैदा कर. मी ही हसत- हसत उत्तर दिले ते माझ्या हातात नाही. आमची कितीही इच्छा असली तरी ही मुलगा आणि सून दोन्ही नौकरी करणारे असल्याने, पुढची पिढीत एकच्या वर वृद्धी होण्याची संभावना कमीच.
त्याची कहाणी ऐकून मला रात्रभर झोप आली नाही. पण त्याचे म्हणणे खरेच होते. माझ्या आजोबांच्या वंशात आम्हा दोन तृतीयांश भाऊ आणि बहीणींचे एकच अपत्य आहे. दोनच्या वर कुणाचेही नाही. पुढची पिढी म्हणाल, तर एकच्या वर कुणाचे ही नाही. हीच परिस्थिति अधिकान्श मध्यमवर्गीय नातेवाईकांच्या घरची आहे. पुढच्या पिढीचा जन्मदर पाहता, पुढील 100 वर्षानी अधिकान्श शिक्षित मध्यमवर्गीयांच्या वंशजांना मोक्षाची प्राप्ती झालेली असेल.
वर्गीकरण
वाचने
5675
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरे आहे. काही वर्षानंतर देशात
अगदी अगदी....
In reply to खरे आहे. काही वर्षानंतर देशात by कानडाऊ योगेशु
कटू सत्य मांडले आहे....
"ह्या विषयाला अनेक कंगोरे आहेत...
In reply to कटू सत्य मांडले आहे.... by मुक्त विहारि
मोक्ष' म्हणत असतील तर ते योग्यच आहे असे माझे वैयक्तिक मत!
In reply to "ह्या विषयाला अनेक कंगोरे आहेत... by टर्मीनेटर
शिक्षित वर्ग आणि लोकसंख्या वाढ....
In reply to "ह्या विषयाला अनेक कंगोरे आहेत... by टर्मीनेटर
कालच माझ्या एका पुणेकर
In reply to कटू सत्य मांडले आहे.... by मुक्त विहारि
असू शकेल...
In reply to कालच माझ्या एका पुणेकर by विवेकपटाईत
वृद्धाश्रम फक्त पेन्शनरांनाच
वृद्धाश्रम फक्त पेन्शनरांनाच परवडतात.
In reply to वृद्धाश्रम फक्त पेन्शनरांनाच by कंजूस
तुका म्हणे उगी रहावे
दोन गोष्टी सहज करू शकतो....
In reply to तुका म्हणे उगी रहावे by चित्रगुप्त
छान लेख
लोकसंख्या नियंत्रण....
In reply to छान लेख by माईसाहेब कुरसूंदीकर
लेखात मी कुठेही लिहिले नाही
In reply to छान लेख by माईसाहेब कुरसूंदीकर
भविष्यात आपल्यापैकी अनेकांचे वंश समाप्त होणार आहे.
In reply to लेखात मी कुठेही लिहिले नाही by विवेकपटाईत
एकूणच बहुप्रसव उत्तर भारतीय
हो...
In reply to एकूणच बहुप्रसव उत्तर भारतीय by रामचंद्र
हा हा
हो....
In reply to हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म
In reply to हो.... by मुक्त विहारि
काही लिंक्स....
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म
In reply to काही लिंक्स.... by मुक्त विहारि
सत्य स्वीकारा....
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
धुळ्यात ४ बांगलादेशी पोलिसांच्या जाळ्यात, कायमचं वास्तव्य करण्या
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
आपण पुत्र / पुत्री पैदा करणार
In reply to धुळ्यात ४ बांगलादेशी पोलिसांच्या जाळ्यात, कायमचं वास्तव्य करण्या by मुक्त विहारि
अल जजिरा आणि बीबीसी आपल्या
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
माझा मित्र गमतीने म्हणतो....
खुप गहन व वास्तव विषय
आगामी काळातील संपूर्ण जगाला