चला सकाळ मध्ये चिंटु नंतर दखल घ्यावी अशी काहितरी गोष्ट दाखल झाली तर ! आनंद वाटला
आनंदा चवचाले
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
"कलियुग" म्हणतात.... ते हेच का?
कारण काही का असेना.. पण विजय कुवळेकर "लोकमत"ला जॉइन झाल्यापासुन (४-५ वर्षांपुर्वीपासून..) "सकाळ"अंमळ बदललाये... हे मात्र खरं!
:)
'सकाळ'ची नियमित वाचक,
मृगनयनी.
माझ्याकडेही कालपासून सकाळच्या मुखपृष्ठावर अंमळ कमी कपड्यातल्या बाया दिसत आहेत खर्या....पण हे यापूर्वीसुद्धा ५-६ वेळा झालेलं आहे त्यामुळे एवढं काही वाटलं नाही...बाकी सकाळच्या मुखपृष्ठावर अशा जाहिराती असू नयेत एवढं मात्र पटलं. टाईम्स ऑफ इंडिया पण गूगलद्वारा देण्यात आलेल्या जाहिराती वापरतं, पण त्यांच्या संस्थळावर असं काही दिसत नाही. काय बरं कारण असावं?
मित्रांनो,
सकाळचे श्री, पंकज प्र. जोशी, वरिष्ठ उपसंपादक, ई-सकाळ, सकाळ पेपर्स लि., पुणे यांनी काय तो खुलासा करुन आपल्या शंकांच निरसन केलेलं आहे. मला वाटत हे पुष्कळ आहे. माझ्यावतीनं मी हा विषय इथेच थांबवावा हे चांगल. तेव्हा आपल्या सगळ्या मिपाकरांच आभार...परत एकदा इथे मुद्दाम नमुद करु इच्छितो की कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता आणि तो कधिच नसणार...
एक गोष्ट मला अजुनही कळलेली नाही...सकाळला कस कळल की आपण हा विषय इथे चघळतोय ते?
धन्यवाद..
मुकुल...
एक गोष्ट मला अजुनही कळलेली नाही...सकाळला कस कळल की आपण हा विषय इथे चघळतोय ते?
मिपावरील घडामोडींची दखल माध्यमे घेताहेत, काही काळांपासून.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
ई-सकाळवरील खुलासा ह्या कडीवर आहे:-
http://www.esakal.com/esakal/12132008/MaharashtraMumbaiNagpurNasikPuneTajyabatmyaDB6CB51DFA.htm
आपणास वरिल कडी वाचता न आल्यास गोषवारा खालीलप्रमाणे आहे:-
"पुणे- मागील एक दोन दिवसांत "ई-सकाळ' वाचत असताना जगातील काही भागातील काही वाचकांच्या पाहण्यात आक्षेपार्ह जाहिराती आल्या. मूळच्या "गुगल ऍडसेन्स'मार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या या जाहिराती आमच्या वाचकांच्या सूचनेनंतर काढून टाकण्याचा निर्णय "ई सकाळ' व्यवस्थापनाने घेतला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे.
मुळात आक्षेपार्ह जाहिराती प्रसिद्ध करणे ही गोष्ट सकाळ किंवा "ई-सकाळ'च्या जाहितरातविषयक धोरणात नाही असे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो. म्हणूनच या सारख्या जाहिराती भविष्यात "ई-सकाळ'वर झळकणार नाहीत या बाबत अधिक काळजी घेण्याचा ई-सकाळचा प्रयत्न राहिल."
अवांतर १: आपले तात्या, ई-सकाळवरील खुलासा आणि मा.मनोहर पर्रिकर गोव्याचे माजी मुख्यमंत्री (पहा: पुढील धागा ( http://www.misalpav.com/node/5056 )), हे म्हणजे कलियूगातपण तत्व पाळणारे तत्व्वेत्तेच नव्हे काय ?
अवांतर २: आता मि. पा. ने पण "मि. पा. ईफेक्ट" असे लिहीले पाहीजे. ;)
-( सणकी )पाषाणभेद
प्रतिक्रिया
मला तर
झक्कास
"कलियुग"
अरेरे|
हम्म्म
मित्रांनो...
दखल
ई-सकाळवरील "गुगलच्या' जाहिरातींबद्दल वाचकांना निवेदन...