Skip to main content

सन्तूर

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 06/07/2022 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
स्वरतत्वाचे तुषार अगणित भवतालाला व्यापुनी उरले रोमरोम पुलकित करणार्‍या स्वरपुंजांनी गारूड केले स्वरचित्रातील अवकाशाच्या सुप्त मितीचे दर्शन झाले स्वरलहरींचे जललहरींशी निगूढ नाते पुनश्च कळले स्वरशिल्पातील अमूर्ततेचा चिरंतनाशी घालुनी मेळ शब्दावाचून सहज रंगला विलक्षणाचा अद्भुत खेळ
लेखनविषय:

वाचने 2165
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

अशीच काहीशी अवस्था काही वर्षांपूर्वी चिंतामणी जयंती समारोहाच्या वेळी उस्ताद रईसखान यांचे सतार वादन ऐकताना झाली होती. ते दोन तासांहुन अधिक काळ वाजवत होते आणि श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते, इतके की मैफिल संपली तरी टाळ्या वाजवण्याचेही कोणाला भान उरले नव्हते. तुम्ही ती भावना शब्दात चपखल उतरवली आहे. पैजारबुवा,

भान हरपून जायला लावतात. उदा. महेश काळे यांनी (सारेगमप दरम्यान) सादर केलेलं कानडा राजा पंढरीचा. किंवा आशा भोसलेंचं जीवलगा.. किंवा भीमसेन जोशींचं भाग्यदा लक्ष्मी बारम्मा किंवा लता मंगेशकरांचं सख्या रे घायाळ मी हरिणी