आज काय घडले... चैत्र व. ४ यदुवंशविलासु' रामदेवराव दिल्लीस !
लेखनविषय (Tags)
शके १२२९ च्या चैत्र व. ४ रोजी महाराष्ट्रांतील देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यांस मलिक काफूरनें कैद करून दिल्लीला नेले.
तेराव्या शतकांत महाराष्ट्रांत रामदेवराव यादव नांवाचा राजा देवगिरी येथे राज्य करीत होता. शके १२१६ मध्ये मोठ्या फौजेनिशी दिल्लीपर्ताचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरीवर हल्ला करून रामदेवरावाचा पराभव करून अगणित द्रव्य नेले होतेच. यानंतर बारातेरा वर्षांनी अल्लाउद्दीनाने तीस हजार घोडेस्वार बरोबर देऊन मलिक काफूरास देवगडावर रवाना केले. हा काफूर खंबायतच्या एका सावकाराजवळ गुलाम होता. बादशहाची मर्जी त्याच्यावर असल्याने ही कामगिरी त्याकडे आली होती. माळव्यांतून खानदेशच्या वाटेनें सुलतानपुरावरून तो देवगिरीस आला. या सरदाराशी लढा देण्यास आपण समर्थ नाही असे पाहून रामदेवराव हतबल झाला असतां मलिक काफूरने त्यास कैद केले. दिल्लीस गेल्यानंतर तेथे बादशहाने न्याचे स्वागत करून त्यास एक छत्र, गजाधिराज हा किताब, व एक लाख रुपये बक्षीस दिले; तीन महिन्यांनी तो परत आल्यावर शके १२३१ मध्ये रामदेवरावाचा अंत झाला.
रामदेवराव यादव हा कृष्णदेवाचा मुलगा. याच्या राज्यांतच या वेळी ज्ञानेश्वर-नामदेवांच्या प्रयत्नाने भागवतधर्माचा डंका महाराष्ट्रांत झडू लागला होता. श्रीज्ञानेश्वरांनी या राजाचा उल्लेख आपल्या ज्ञानेश्वरीत असा केला आहे. " तेथ यदुवंशविलासु । जो सकळकळानिवासु । न्यायातें पोषी क्षितीशु । श्रीरामचंद्र ।" महानुभाव पंथाचा चक्रधर-कृष्ण व हेमाद्रिसारखे जाडे विद्वान् याच्याच.काळांत होऊन गेले. कृष्णभक्त बोपदेव याच काळांत चमकला. रामदेवराव वारल्यानंतर आठनऊ वर्षांतच देवगिरीचे राज्य नष्ट होऊन महाराष्ट्राचे स्वातंत्र्य हरपले. आणि नंतर इस्लामी संस्कृतीच्या लाटेरवाली महाराष्ट्रांत भयंकर काहूर माजून राहिले.
-२४ मार्च १३०७
प्रतिक्रिया
कालगणनेतील विसंगती
स्पेलिंग मिस्टेक
त्रुटी स्पेलिंगच्या दूर होतातही
धाडस आणि शौर्याच्या अभावापोटी
अध्यात्मासाठी शौर्य व धाडस हे