Skip to main content

कसाही बरसला, तरी मजा ती संपली.

लेखक Sanjay Uwach यांनी शनिवार, 05/06/2021 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
कसाही बरसला, तरी मजा ती संपली. मन घाबरे घाबरे, जीव झाला व्याकुळ कुठे दिसेना रस्ता, सर्व अंधार अंधार. कधी शित सरी मध्ये, नाहुनी निघालो सवगड्यांच्या संगे, चिंब चिंब झालो कधी थंड वारा अंगास झोंबला अंगातल्या रगेने,तो ही तिथे शमला पण आज तुला पाहताना, दूर दूर पळालो जीवाच्या आकांताने, घरा मधे धावलो कुठे आशेचा किरण, हळुच डोकावला काळया कुट्ट ढगा मध्ये, लख्ख विजेचा प्रकाश रोज ऐकुन नवीन नवीन, माणूस सरावला जीवाचा काय तो मोल, गेलेे सारे विसरून कोडग्या मनाला, आता काय ती भीती कसा ही बरसला, तरी मजा ती संपली.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1246
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया