Skip to main content

अध्याय निहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे सादरीकरण - अ ६ ...पान १ ते ५

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 10/03/2021 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
6.1 6.2 6.3 6.4 6.5
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1514
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

म्हणजे चरित्र नायक श्रीपाद (हे त्यांचे आडनाव) श्री वल्लभ अगदी बालपणाच्या काळात अशा गल्ली बोळातून फिरत कि जिथे उच्च वर्गातील लोक जात नसत. म्हणून धोबी घाटावरचे तिरुमलदास सौम्य शब्दात असे करणे आपल्याला बरे दिसत नाही म्हणून समजावतात. पोथीत श्रींच्या १६व्या वर्षात ते पंचम जातीच्या वसाहतीत जातात. गावाच्या बाहेर वस्तीत दत्त संप्रदायाची दीक्षा फुटक आणि एका बैठकीत देतात. याचा गहजब होऊन गावातील प्रतिष्ठित राजू, श्रेष्ठी वर्मा, सर्मा यांच्या कुटुंबीयांना वाळीत टाकले जायची वेळ येते. तेंव्हा श्रींच्या आई वडिलांना माहीती असूनही ते तू घरातून बाहेर जाऊ नकोस म्हणून मागे लागतात. आणि वचन भंग झाला म्हणून आणि आपले पीठापुरम चे कार्य संपन्न झाले म्हणून तडक काशीला निघून जातात. यातून आणि अन्य घटनांतून ते या अवतारात समाज सुधारक म्हणून जास्त प्रकर्षाने समोर येतात. नरसिंह सरस्वती अवतारात ते कर्मकांडावर भर दिले म्हणून जाणवतात. तर स्वामी समर्थ अवतारात ते स्वेच्छाचारी वागणुकीतून आपले व्यवहार करताना दिसतात. याच तिरुमलदासांचा मुलगा नंतर कृष्णा नदीच्या पात्रातून बुट्टी नावेतून भाविकांना कुरवपूर बेटावर नेण्याचे काम करत असतो. असेच एकदा तो एक मुस्लिम राजा नौकानयन करून राहायला आपल्या लवाजम्यासह दिसतो तो सोहळा पाहून नावाडी रवीदासाला पुढील जन्मी तू हे ऐश्वर्य उपभोगायला जाशील म्हणून म्हटले तो नंतर बीदरचा बादशहा झाला वगैरे वगैरे...