शेतकरी आमचा बाप कधी राहिल टिपटाप ?
आज सगळ जग डेवलप होतय ,
इमान अण राकेटात बसुण आभालाळा गवसणी घालतय ,
अशा या बदलत्या काळात रात्रीचं पण येगळच विश्व सुरू होतय |
तरी माझा शेतकरी बाप अजुन मातीतच घाम गाळतोय ,
रात्रीच पाणी द्यायला इच्चुकाड्याची सोबत घेतोय,
दिवसा ना त्याला उन्हाचा ताप ना रात्रीची त्याला झोप ||
असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ?
मोठाले यापरी ब्यांकीची हाजारो कोटी बुडवतात,
देश सोडुन पळुन जातात न देश खड्ड्यात घालुन मजा मारतात |
पन बी अन् खतासाठी घेतलेले पन्नास हाजार
न फेडता आल्या मुळे तो स्वाभीमानी घेतो गळफास, ||
त्याला होती एकच आस माझ पिक येईन खास ,
अन् सार्या जगाच्या पोटात जाईल सुखाचा घास |
आज तोच झाला खाक अन् त्याची स्वप्न झाली राख,
आज पोर त्याच पोरक कोण देईल त्याला खुराक ||
पाणी नव्हत त्याच्या आडात तरी शेती केली जोमात,
शेवटी अवकाळी आला अन् तोंडातला घास घेउन गेला,
हाच तो सुखाचा घास नाही आज त्याच्या पोराच्या पोटात |
त्याच्या या पोराला आता कोण देइल पाठीवर थाप,
असा हा शेतकरी बाप कधी राहिला नाही टिपटाप ||
टिप :
ही कविता मा.बो. वर आधिच प्रकशित आहे , अनिथ या माझ्याच आय डी ने. धन्यवाद.
मूळ मुद्दा समजून घ्या.
यात एकाही प्रश्नाचे उत्तर नाही
तात्पुरता उपाय म्हणून तुमचा सल्ला योग्य आहे
you have to have employable
महाराष्ट्रातील विभागवार शेतकरी -१
शेती ची भरभराट ही देशाची गरज
सहकार क्षेत्र चा ज्यांनी पाया रचला
आज दूध दर वाढी साठी रस्त्यावर
लाल चिखल
@पियुशा..
मग काय करायचे आता शेतकाऱ्याने
होय
वयक्तिक झालाय रिप्लाय..
@गणेशा "कवीस" म्हणजे तुला उद्देशून नव्हे रे :)
मी म्हणुन रिप्लाय देत नव्हतो
आधीची चर्चा लेख.
प्रश्न जेव्हडा सोपा तेव्हडच उत्तरही
थोड शेतकऱ्या विषयी
सर्व प्रतिसादांबद्द्ल धन्यावाद.
दोन्ही बाजू
ययातीचे मढे
मोठी जमीनदारकी नसेल तर 1।2 ,
2 रुपये
हो मग तेच म्हणतोय ना मी..