सोहळा
जाई बरसुनी मेघ
करी धरेशी सलगी
धरा येता मोहोरुनी
विरे मेघ तो बैरागी
आसुसल्या धरणीशी
गाठ पडता जळाची
बीज अंकुरुनी येई
कुस चिरीत आईची
हात जोडुनिया कोंब
सांगे भूमीचे मार्दव
जरा थांब क्षणभर
करी मेघाला आर्जव
वीण बांधुनी भुईशी
करी लवलव पाते
नवलाईचे हे बंध
झाले नव्हत्याचे होते
पूर्ण होता ऋतुचक्र
पुन्हा लागती डोहाळे
करी नेमाने तरीही
सृष्टी साजरे सोहळे
अतीव सुंदर कविता.
अप्रतिम
अति सुंदर....
सहज,सुंदर,समर्पक!
फार सुरेख!!
वाह. क्या बात है.
सर्व वाचकांचे अन् प्रतिसाद
अप्रतिम कविता