नमस्कार मंडळी,
काही दिवसांपासून तुकोबांचे काही अभंग शोधत आहे.
तुकारामांना समर्थ आणि एक संत एकदा भेटतात आणि त्यांना तुकाराम थोडक्यात आपल्या बद्दल सांगतात अशी एक कथा आहे. तुकोबांचे त्या वेळचे पंधरा एक सुंदर अभंग आहेत.
त्या मध्ये ते आपली पहिली बायको गेली, व्यवसायात खोट आली, दुष्काळ पडला वगैरे सांगतात. त्यांना झालेल्या सद्गुरुच्या दृष्टांताबद्दल सांगतात. आणि शेवटी म्हणतात,
आता आहे तैसा वाटतो विचार पुढील प्रकार देव जाणे
आणि मग विष्णू माझ्या कडुन हे करवून घेतो आहे आणि त्या प्रमाणेच सर्व घडत आहे असा शेवट आहे.
नेटावर ते अभंग कुठेतरी आहेत. मला पूर्वी मिळाले होते पण आता मिळत नाहियेत.
आपल्याला हे अभंग माहित आहेत का? आपण ते अभंग इथे दिलेत तर आभारी राहीन.
--लिखाळ.
वाचने
10978
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचले आहेत
वाचल्याचे आठवत आहेतखालीलप्रमाणे. बाप मेला न कळतां । नव्हती संसाराची चिंता ॥१॥ विठो तुझें माझें राज्य । नाही दुसऱ्याचें काज ॥धृ॥ बाईल मेली मुक्त जाली । देवें माया सोडविली ॥२॥ पोर मेलें बरें जालें । देवें मायाविरहित केलें ॥३॥ माता मेली मजदेखतां । तुका म्हणें हरली चिंता ॥४॥ आपला, (स्मरणशीलतुकोबाप्रेमी) आजानुकर्ण आंबिलेसंत तुकाराम
मदत
समग्र तुकाराम गाथा...
बिपिन दा..
आभार
मला हा अभंग आवडतो :)