✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुकोबांचे अभंग (चौकशी)

ल
लिखाळ यांनी
गुरुवार, 11/20/2008 - 23:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10977 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

आ
आजानुकर्ण Fri, 11/21/2008 - 00:05 नवीन

वाचले आहेत

तुकारामांना समर्थ भेटतात याविषयी शंका आहे. मात्र दुष्काळात बायको व मुले मृत्यूमुखी पडल्याने संसाराबद्दल आलेल्या एकंदर विरक्तीबद्दल तुकारामांचे अभंग वाचल्याचे आठवत आहेत खालीलप्रमाणे. बाप मेला न कळतां । नव्हती संसाराची चिंता ॥१॥ विठो तुझें माझें राज्य । नाही दुसऱ्याचें काज ॥धृ॥ बाईल मेली मुक्त जाली । देवें माया सोडविली ॥२॥ पोर मेलें बरें जालें । देवें मायाविरहित केलें ॥३॥ माता मेली मजदेखतां । तुका म्हणें हरली चिंता ॥४॥ आपला, (स्मरणशील तुकोबाप्रेमी) आजानुकर्ण आंबिले
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत Fri, 11/21/2008 - 00:27 नवीन

संत तुकाराम

नेटावर संत तुकारामांचे अभंग इथे मिळू शकतील. पण तुम्हाला हवेत ते आहेत ते मला माहित नाही .. http://www.tukaram.com/ - अभिजीत
  • Log in or register to post comments
म
मीनल Fri, 11/21/2008 - 02:02 नवीन

मदत

प्राजु याबाबतीत नक्की मदत करू शकेल अस वाटत.तीचा बराचसा अभ्यास आहे या विषयावर. मीनल.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 11/21/2008 - 02:39 नवीन

समग्र तुकाराम गाथा...

लिखाळा, समग्र तुकाराम गाथा (देहू प्रत) खाली दिलेल्या दुव्यावर अपलोड केले आहे. उतरवून घे. तुला हवे असलेले अभंग त्यात मिळतील अशी आशा करतो. :) http://www.sendspace.com/file/wr4v5s त्यात एक फाँट आहे तो आधी इन्स्टॉल कर. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 11/21/2008 - 02:55 नवीन

बिपिन दा..

धन्यवाद. मी ही घेतली आहे ती फाईल डाऊनलोड करून. लिखाळ, http://www.aathavanitli-gani.com/Lists/Sant%20Details/Tukaram.htm इथे बघ तुला हवे असलेले अभंग आहेत का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 11/21/2008 - 03:48 नवीन

आभार

आपण त्वरेने माहिती पुरवल्याबद्दल अनेक आभार. खरेतर तुकाराम डॉट कॉम या स्थळाला मी वारंवार भेट देत असतो. आणि तेथेच मी ते अभंग मागे पाहिले होते. ते जालावर आहेत हे पाहून मी सुखावलो होतो. मध्यंतरी बरेच महिने मी ते अभंग वाचले नाहित आणि तो विषय विसरून गेलो. गेले काही आठवडे मला पुन्हा इच्छा झाली आणि ते अभंग मिळेनात म्हणून आपली मदत मागितली. आता शांत डोक्याने पुन्हा शोध घेतला आणि ते अभंग मिळाले. मी या अभंगांसाठी अशी आख्यायिका ऐकली होती की समर्थ आणि अजून एक संत तुकोबांना भेटायला येतात. आणि त्यांना स्वतःच्या पूर्वेतिहासाबद्दल काही सांगण्याची विनंती करतात. तेव्हा तुकोबा अभंगरुपात त्यांना आपले संक्षिप्त चरित्र सांगतात. ते पुढील प्रमाणे... याति शूद्र वैश्य केला वेवसाव । आदि तो हा देव कूळपूज्य ॥१॥ नयें बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुम्ही संतीं ॥धृ॥ संवसारें जालों अतिदु़खें दुखी । मायबाप सेखी कर्मलिया ॥२॥ दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली।३॥ लज्जा वाटें जीवा त्रासलों या दु:खें । वेवसाय देख तुटी येतां ॥४॥ देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावेंसें ॥५॥ आरंभी कीर्तन करीं एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं । कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें । विश्वासें आदरें करोनियां ॥७॥ गातीं पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥८॥ संतांचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली॥९॥ टाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनि ॥१०॥ वचन मानिलें नाहीं सहुदांचें । समूळ प्रपंचें वीट आला ॥११॥ सत्य असत्यासीं मन केलें ग्वाहीं । मानियेलें नाहीं बहुमतां ॥१२॥ मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ॥१३॥ यावरि या जालीं कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिलें चित्तीं विठोबाचें ॥१४॥ निषेधाचा कंहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ॥१५॥ बुडविल्या वह्या बैसलो धरणें । केले नारायणें समाधान ॥१६॥ विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आता पुरें ॥१७॥ आता आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणें ॥१८॥ भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥१९॥ तुका म्हणें माझें सर्व भांडवल । बोलविलें पांडुरंगें ॥२०॥ यातल्या शेवटल्या ओळी मला फार आवडतात. आपण सर्वांनी नेटावर शोध घेऊन मला मदत केलीत याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. बिपिन, तुकोबांची गाथा उतरवून घेईन नक्की. -- (आनंदित)लिखाळ.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/21/2008 - 07:19 नवीन

मला हा अभंग आवडतो :)

एका संकेतस्थळावर एक चर्चा वाचत होतो की, जेवणापूर्वी हात साबणाने धुतले पाहिजे त्यामुळे शरिराला आजार होत नाहीत. पण मनातल्या विकृतीचे / किटाणूंचे काय ! ते कशाने धुणार ? त्यावरुन आमच्या लाडक्या तुक्याचा अभंग आठवला !!! :) नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥1॥ तैसी चित्तशुद्ध नाहीं । तेथें बोध करील काइऩ ॥ध्रु.॥ वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥2॥ वांजे न होती लेकरें । काय करावें भ्रतारें ॥3॥ नपुंसका पुरुषासी । काय करील बाइल त्यासी ॥4॥ प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥5॥ तुका ह्मणे जीवनेंविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥6॥ (अभंग संदर्भ जालावरुन साभार ) -दिलीप बिरुटे (संत तुकारामाचा फॅन )
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा